
Buldhana Bus Fire: मृतांवर आज बुलढाण्यातील स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार होणार आहे.
सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा शहराच्या पश्चिमेस गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. कास, ठोसेघर परिसरात दरड कोसळण्याचे सत्र सुरु आहे. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. याच दरम्यान साताऱ्याकडे येणारा एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
गेल्या आठ दिवसापासून जिल्हयात पावसाने हजेरी लावली आहे. पूर्वेस पावसाची उघडडिप असली तरी पश्चिमेस मात्र, पावसाची संततधार सुरुच आहे. ठिकठिकाणी झाडे, दरड कोसळण्याचा घटना सुरु आहेत. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसळली. मोठमोठे दगड रस्त्यात आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, सातारा तालुका पोलीस व प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी या दगडी बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान यात यवतेश्वरकडून साताऱ्याकडे येत असणाऱ्या दुचाकीस्वार या घटनेत जखमी झाला आहे.

महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे,ही चौकशी आम्ही लावली नाही, मात्र चौकशी सुरु झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट क्रॉंकिटचे रस्ते २० वर्षापूर्वी करायची गरज होती, तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. त्यामुळेमाझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा, असे राज यांनी म्हटले आहे.

‘बीएमसीमध्ये चोरी करतात,करायला लावतात. ठाणे,नागपूर,पुणे महापालिकेवरही एसआयटी लावा. कामं दिसत नाहीत,होर्डिंग दिसतात. उपमुख्यमंत्री म्हणजे दुसरे मुख्यमंत्री. तुमच्या फाईल बनवल्या आहेत. ज्या दिवशी सरकार येईल त्यादिवशी आम्ही आत येणार आणि तुम्हाला जागा दाखवणार,असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी लगावला.

कॅप्टन हंबीरराव मोहिते हे तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तृतीय चिरंजीव रतोजी राजे, यांचे थेट वंशज होते. त्यांच्या घरातील ७ पिढ्यांनी भारतीय लष्करी सेवेत योगदान दिले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. कॅप्टन हंबीरराव स्वतः मराठा लाईट इन्फंट्री तर्फे वयाच्या २० व्या वर्षी दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनी इटली येथील युद्धात हिटलरच्या नाझी सैन्याविरुद्ध ‘प्लॅटून टॅंक कमांडर’ म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. महायुद्धानंतर त्यांची नेमणूक मित्र देशांच्या जपान येथील मुख्यालयात करण्यात आली, तेव्हा त्यांचा जपानी संस्कृती आणि सभ्यतेशी जवळचा संबंध आला, ज्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग झाला.

Buldhana bus accident : तेजसच्या मृत्यूने कुटुंबाला जबर हादरा बसला असून त्यांचा आधार देवाने हिरावून नेला आहे. तेजसच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या आईचा आक्रोश करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Priyanka Chopra Jee Le Zaraa: बऱ्याच वर्षांनंतर प्रियांकाला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये बघण्यासाठी चाहते उत्सुक झाले होते. मात्र, प्रियांकाने या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Shivsena UBT Morcha on BMC : शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे, मात्र या पावसात देखील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही.

sharad pawar on bus accident : अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहून जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थना पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला एक आठवणही करून दिली.