
<p>महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस, हवामान विभागाचा अंदाज.. काही ठिकाणी रेड अलर्ट.. प. महाराष्ट्र, कोकण, विदर्भातही पावसाचा अंदाज.. </p>
Source link

<p>महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस, हवामान विभागाचा अंदाज.. काही ठिकाणी रेड अलर्ट.. प. महाराष्ट्र, कोकण, विदर्भातही पावसाचा अंदाज.. </p>
Source link

मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत,असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

पुढे कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, “कोटुंबिक कार्यक्रमापासून सुनेला आणि नातीला वंचित ठेवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. फक्त पैसे आणि प्रमोशनसाठी लग्न केले आहे. वडिलांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केले आहे. या लग्नामुळे अभिनेत्याला एक सिनेमा मिळाला आहे. पण आता दोघेही या फेक लग्नापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता अभिनेत्याने पत्नी आणि लेकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा भारत आहे. एकदा लग्न झाले की परिस्थिती बदलता येत नाही.”

Sangli news :प्रशासनाकडून कमानीचे खांब पाडणाऱ्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचा आरोप करत न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून बेडगमधील आंबडेकरी समाजातील नागरिकांनी थेट गाव सोडलं आहे.

NDA Meeting Delhi: देशभरातील विरोधी पक्षांनी आगामी लोकसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केल्यानंतर भाजपला सुद्धा आता मित्रपक्षांची आठवण आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच विरोधकांची एकीने भाजपला मित्र पक्षांना आठवण्याची वेळ आली आहे. मात्र, या बैठकीसाठी महाराष्ट्रातील जुन्या मित्र पक्षांचा विसर भाजपला पडला आहे का? अशी शंका उपस्थित झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ बच्चू कडू यांच्या प्रहार तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला बैठकीचे निमंत्रण असल्याची माहिती आहे. मात्र, एनडीएच्या बैठकीसाठी भाजपकडून बहुतांश जुन्या मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आले नसून त्यांना कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेसह, विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम, महादेव जानकर यांच्या रासप, रिपब्लिकन पार्टी ऑफ कवाडे गट या जुन्या मित्र पक्षांना बैठकीचे भाजपकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे एनडीएमधील मित्र पक्षाचे अनेक नेते नाराज झाले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रातून शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादीमधील फुटीर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पलानीस्वामीही दाखल झाले आहेत. त्यामुळे नव्यांसाठी पायघड्या आणि जुन्यांसाठी कात्रजचा घाट आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत अनेक विद्यमान आणि नवे मित्रपक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर), राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेडी), अण्णाद्रमुक, पवन कल्याण यांची जनसेना सहभागी झाली होती. इतर अनेक मोठे पक्ष सहभागी होणार आहेत.
दरम्यान, एनडीएच्या बैठकीपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि इतर नेते उपस्थित होते.
दुसरीकडे, देशातील 26 विरोधी पक्षांची बैठक बंगळूरमध्ये पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या बैठकीत महाआघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी इंडिया विरुद्ध मोदी असा मुकाबला असणार आहे. इंडिया आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीत विरोधकांचा चेहरा कोण असेल? यावर मंथन होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच कारवाई करतील का? हा प्रश्न आहे. या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली असून त्याचं त्यांनी काय केलं, हे सर्वांना माहित आहे. किरीट सोमय्या यांची भाजपमध्ये उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Kolhapur Weather Update: हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पावसाने आगमन केल्यापासून अपेक्षित वेग पकडलेला नाही. हवामान विभागाने मागील आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवूनही कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस झाला नव्हता.
District Rainfall departure map for Maharashtra on 18 July 2023.
Its dynamic.
In next 3,4 days many of the Red, Yellow colours may change to Green or Blue too.
Keep watching rainfall in state pl. pic.twitter.com/GsP5ZpbjXw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2023
दिलासादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात काहीसा जोर पकडला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाला. कोल्हापुरात मोसमात दुसऱ्यांदा राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. पोलिसांनी बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 4 बंधारे पाण्याखाली आहेत. सध्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पातळी 16 फुट 10 इंचांवर आहे. मान्सूनला सुरुवात झाल्यापासून काही दिवसांचा अपवाद सोडल्यास दमदार पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र ऊन-पावसाचा पाठशिवणीचाच खेळ सुरू आहे.
कोल्हापूर शहरात गेल्यावर्षी 15 जुलैपर्यंत 457 मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र अवघ्या 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील तलावामध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्याचा अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहर आणि आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेतही पाऊस झालेला नाही.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी एनडीआरएफची 21 जणांची तुकडी दाखल झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. कोल्हापुरात पावसाचे प्रमाण वाढेल किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती घेतली.निरीक्षक जालिंदर फुंदे आणि पुरुषोत्तम सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. 31ऑगस्टपर्यंत हे पथक जिल्ह्यात असेल. एका पथकाकडे तीन बोटी, तसेच लाइफ जॅकेट आणि लाईफ रिंग अशी साधन सामग्री उपलब्ध असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

परब म्हणाले की, सोमय्यांच्या पत्रात हा व्हिडिओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. हा व्हिडिओ कुणी घेतला, का घेतला, खंडणीसाठी धमकी आहे का हे बाहेर आले पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. अनेक महिलांच्या तक्रारी समोर आल्यात. हे खरे खोटे माहिती नाही. हे शोधण्याचे काम तपास यंत्रणेने केले पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे. सेक्स खंडणी मागितली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ८ तासांचे व्हिडिओ आहेत. केंद्रीय यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार झाला नाही ना असा आरोपही अनिल परब यांनी केला.

श्रेयस आणि अश्विनीला त्यांच्या कुटुंबासकट घराबाहेर काढता यावं, म्हणून शिल्पीने फार मोठा डाव रचला होता. या कटाचा भाग म्हणून शिल्पीने आपला बहरलेला संसार देखील मोडला. विद्युतसोबत घटस्फोट घेतला तर, आपण भविष्यातील तरतूद म्हणून राहतं घर स्वतःच्या नावावर करून घेऊ. इतकंच नाही तर, घर नावावर झालं की, याच घरातून श्रेयस आणि अश्विनीला धक्के मारून बाहेर काढून, असा विचार शिल्पीने केला होता. याच योजनेप्रमाणे तिने विद्युतला घटस्फोट दिला. मात्र, विद्युतसोबत नातं तुटल्यानंतर त्यांचा मुलगा संजू याचा ताबासुद्धा विद्युतकडेच गेला.

<p>Devendra Fadnavis: व्हायरल व्हिडीओची सखोल चौकशी करू; फडणवीसांची ग्वाही</p>
Source link