
<p>Udayanraje Bhosale : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना फासावर लटकवा, उदयनराजेंची पोलिसांकडे मागणी</p>
Source link

<p>Udayanraje Bhosale : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना फासावर लटकवा, उदयनराजेंची पोलिसांकडे मागणी</p>
Source link

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने म्हटले की, ‘अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय ‘वेलकम’ हा चित्रपट होऊच शकत नाही. त्यांना आधी चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांच्यातील ही चर्चा काहीशी फिस्कटली. या ‘वेलकम ३’ चित्रपटासाठी अनिल कपूर यांनी तब्बल १८ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर निर्माता फिरोज नाडियाडवाला यांना चांगलाच धक्का बसला.’ अनिल कपूर यांची ही मागणी निर्मात्यांनी फेटाळल्यानंतर अनिल कपूर यांनी स्वतः यातून काढता पाय घेतला.

सायलीच्या आयुष्यात आता एक नवं वळण येणार आहे. सायली अनाथ नसून, तीच तन्वी आहे आणि तिची आई देखील या जगात आहे, हे लवकरच कळणार आहे. आता अनेक वर्षांनी सायलीची तिच्या आईशी म्हणजेच प्रतिमाशी भेट होणार आहे. मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायली आणि प्रतिमा एकमेकींच्या समोर येताना दाखवल्या आहेत. सायली एका मंदिरात असताना, तन्वी मुद्दाम तिला ढकलून तिच्या हातातलं पूजेचं ताट खाली पाडणार आहे. तर, या धक्क्यामुळे सायली अचानक गोंधळून जाणार आहे.

नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमधून एक चांगला मेसेज केंद्र सरकारला जाणार आहे. त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागेल, असं पटोले यांनी म्हटलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतआहे.

कार्तिकशी आपलं लग्न व्हावं, म्हणून आयेशाने अनेक प्रयत्न केले. कधी तिने दीपाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर कधी कार्तिक आणि दीपामध्ये मोठा गैरसमज निर्माण केला. मात्र, दीपा नेहमीच सगळ्या संकटांना अतिशय धैर्याने सामोरी गेली होती. दीपाने नेहमीच आपला संसार वाचवा म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, यावेळेस आयेशाने तिच्या मुलींच्या आयुष्याचा खेळ करून, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता दीपामधली आई चांगलीच पेटून उठली आहे. ती आता आयेशाला तिच्या सगळ्या कृत्यांची शिक्षा घडवणार आहे. यासाठी ते आता घटस्फोटाचं नाटक रचणार आहेत.

<p>Nana Patole On Onion Purchasing: नाफेडच्या खरेदीने प्रश्न सुटणार नाही; राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी</p>
Source link

दरवर्षी ‘बिग बॉस’मध्ये नवीन थीम आणि काही नवीन नियम बघायला मिळतात. हा शो चाहत्यांचे बह्र्पूर मनोरंजन करतो. यावेळी ‘बिग बॉस’ची थीम ‘कपल विरुद्ध सिंगल’ अशी असू शकते. आता १७व्या सीझनमध्ये या शोमध्ये काय नवीन बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Happy Birthday Megastar Chiranjeevi: साऊथमध्ये चिरंजीवी यांची इतकी क्रेझ आहे की, त्यांच्या चित्रपटांची तिकीटं मिळवण्यासाठी अक्षरशः लोकांमध्ये हाणामाऱ्या होतात.

अभिनेते रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगींच्या पायाला स्पर्श करण्यामागचे कारण सांगितले आहे. नुकतेच रजनीकांत यांनी चेन्नई विमानतळावर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रजनीकांत म्हणाले की, ‘ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी ही माझी सवय आहे. जेव्हाही माझ्यासमोर साधू किंवा योगी असतात, तेव्हा मी त्यांच्या चरणांना स्पर्श करतो. यात वयाचा अथवा पदाचा काहीही संबंध नाही.’

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कृष्णा धनजोडे या तरुणाचं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्यामुळं १९ ऑगस्ट रोजी दोघे एकमेकांना भेटण्यासाठी भंडाऱ्यात आले होते. दिवसभर शहरातील विविध ठिकाणी फिरल्यानंतर दोघांनी शहरातील हिरणवार लॉजमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं दोघांनी हिरणवार लॉजमध्ये रात्र काढली. परंतु सकाळी तरुणीने कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काहीच हालचाल करत नसल्याचं तरुणीच्या लक्षात आलं. त्यानंतर तरुणीने या घटनेची माहिती लॉजमधील कर्मचाऱ्यांना दिली. याशिवाय या घटनेची माहिती समजताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.