
एका यूजरने चित्रपटाबाबत म्हटले की, ‘शाहरुख खानसाठी लोक वेडे आहेत. नाही तर इतक्या पाहाटे कोण आले असते चित्रपट पाहाण्यासाठी.’ सोबतच या यूजरने सोशल मीडियावर थिएटर बाहेरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

एका यूजरने चित्रपटाबाबत म्हटले की, ‘शाहरुख खानसाठी लोक वेडे आहेत. नाही तर इतक्या पाहाटे कोण आले असते चित्रपट पाहाण्यासाठी.’ सोबतच या यूजरने सोशल मीडियावर थिएटर बाहेरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

<p>Devendra Fadnavis Vadala : देवेंद्र फडणवीस वडाळ्यातील कृष्ण मंदिरात, श्री कृष्ण जन्माष्टमीचं निमित्त ABP Majha </p>
Source link

Pune Ganeshotsav Niyamavli : पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण जगत प्रसिद्ध आहे. या सोहळ्या दरम्यान पुणे नवचैतन्याने भरले असते. यावर्षी देखील जल्लोषात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. या निमित्त पुणे महानगर पालिकेने गणेश मंडळासाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे.
Source link

‘Clean, Shaven चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझी न्यूड क्लिप लीक झाली होती. त्यावेळी मला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. लोक किंवा मीडिया माझ्याविषयी काय बोलते याचा मी विचार केला म्हणून नाही तर माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्ट माझ्याविषयी काय विचार करत असतील म्हणून मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली होती.

<p style="text-align: justify;"><em><strong>Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…</strong></em></p>
<p style="text-align: justify;">केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. </p>
<h2 style="text-align: justify;"><strong>राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना</strong></h2>
<p style="text-align: justify;"> महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल </p>
<h2 style="text-align: justify;"><strong> इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस</strong></h2>
<p style="text-align: justify;">मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक</p>
<h2 style="text-align: justify;"><strong> महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस</strong></h2>
<p style="text-align: justify;">महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे</strong></h2>
<p style="text-align: justify;">आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.</p>
<h2 style="text-align: justify;"><strong>आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल</strong></h2>
<p style="text-align: justify;">देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.</p>
<h2 style="text-align: justify;"><strong> उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर </strong></h2>
<p style="text-align: justify;">उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. ‘महेंद्रगिरी’ ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.<br /> </p>
<p style="text-align: justify;"> </p>
Source link

<p>Chandrashekhar Bawankule : मराठा आरक्षण जाण्याला उद्धव ठाकरे दोषी, त्यांनी माफी मागावी</p>
Source link

St Worker strike : गेल्या वर्षां एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यावेळी जवळपास ३ महिने आंदोलन चालले होते. तेव्हा महामंडळाने अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, अजूनही एसटी महामंडळाने या मागण्या मान्य न केल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.

माडज येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, किसन माने मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे असे म्हणत होता. बुधवारी दुपारच्या सुमारासही तो याच विषयावर बोलत होता. एका दुकानासमोर बसून आरक्षणावर चर्चा सुरू असताना किसन याने अंगावरील कपडे काढून मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ओरडत गाव तलावाकडे धाव घेतली. क्षणार्धात त्याने पाण्यात उडी टाकली. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाळात फसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता करात 10 ते 15 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली होती. एका बाजूला महागाईचा प्रहार होत असताना दुसरीकडे मालमत्ता करात वाढ होणार असल्याच्या वृत्ताने मुंबईकरांची चिंता वाढली होती. आता, या प्रकरणावर मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 154(1क) मधील तरतुदींनुसार बृहन्मुंबईतील जमिनी व इमारतींच्या भांडवली मूल्यात दिनांक 1 एप्रिल 2020 पासून बदल करणे महानगरपालिकेस बंधनकारक होते. तथापि, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करणे वेळोवेळी झालेल्या शासन निर्णय व अधिनियमातील बदल यामुळे पुढे ढकलण्यात आले होते, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.
मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 154(1क) आणि 154(1ड) मधील तरतुदींनुसार बृहन्मुंबईतील जमीन व इमारतींच्या भांडवली मुल्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून बदल करून वर्ष 2023-24 करिता मालमत्ता कराची देयके निर्गमित करणे महानगरपालिकेस बंधनकारक आहे. भांडवली मूल्य निश्चितेचे नियम तयार करणे यादृष्टीने प्राथमिक अभ्यास महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आला आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून नियम निश्चितीकरिता खात्याअंतर्गत समिती तयार करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले. करवाढीबाबतच्या बातम्या निराधार असून मसुदा तयार करण्याचे कोणतेही काम हाती घेण्यात आले नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता करात 10 ते 15 टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त होते. ही मालमत्ता करवाढ 500 चौरस फुटांच्या मालमत्तांना हा नवीन नियम लागू नसल्याचेही माहिती समोर आली होती. मुंबईतील मालमत्ता कर वाढवण्याचा प्रस्ताव कोविड काळापासून प्रलंबित होता. या प्रक्रियेला आता वेग आला आहे. पालिका प्रशासनाकडून या प्रक्रियेसाठी सनदी लेखापालांची नेमणूक करण्यात आली असल्याचे वृत्त होते. मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर 2020 मध्ये वाढ अपेक्षित होती. मात्र करोनाच्या संकटामुळे 2020 आणि 2021 मध्ये करवाढ करण्यात आली नाही. 2022 मध्ये पालिका निवडणुकीची शक्यता लक्षात घेऊन मालमत्ता करातील वाढ राज्य सरकारने रोखली होती. यंदा होणारी मालमत्ता करातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नव्हती, अशीही चर्चा होती,.
मालमत्ता कर हा जमिनीचे बाजार मूल्य किंवा इमारतीच्या भांडवली मूल्यावर अंमलात असलेल्या रेडीरेकनर दरावर आधारीत असतो.
मालमत्ता कर ही जमीन मालकाने स्थानिक प्रशासन, सरकार किंवा त्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकेला भरलेली वार्षिक कर रक्कम असते. मालमत्तेत सर्व मूर्त स्थावर मालमत्ता, राहते घर, कार्यालयीन इमारत आणि त्याने इतरांना भाड्याने दिलेली मालमत्ता यांचा यात समावेश होता. भारतात, विशिष्ट क्षेत्राची महानगरपालिका वार्षिक किंवा अर्धवार्षिक मालमत्ता कराचे मूल्यांकन करते आणि त्याचे करदायीत्व हे मालमत्ता धारकांवर लागू होते.

‘जेव्हा कुणबी मराठावर अन्याय होतो, तेव्हा मराठा समाज सोबत असतो. परंतु आरक्षणाचा विषय येतो, तेव्हा कुणबी मराठा आमचा संबंध नाही अशी भूमिका घेतात. मराठा आरक्षणाच्या बैठकीला काही कुणबी बांधव असतात. ते अण्णासाहेब पाटील, सारथी योजनेचा लाभ घेतात. त्यांना दुहेरी लाभ मिळतो. त्यावेळेस मराठा समाजाचे नुकसान होते, असे किरण पवार म्हणाले.