Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 277

टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू, अपघातानंतर टेम्पोचालक पसार

0
टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू, अपघातानंतर टेम्पोचालक पसार


पुणे : टेम्पोच्या धडकेत तीन वर्षांच्या बालकाचा मृत्युमुखी झाल्याची घटना आंबेगाव भागातील जांभूळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलताब नवशाद सलमानी (वय ३) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत इरशाद मेंहदीहसन सलमानी (वय २२, रा. अर्जुननगर, कोळेवाडी रोड, जांभूळवाडी) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरशाद सलमानी यांचा पुतण्या अलताब जांभूळवाडी परिसरातील रस्त्यावर खेळत होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने अलताबला धडक दिली. अपघातात अलताब गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी जांभूळवाडी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.

हेही वाचा

कोथरूड भागात दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पांडुरंग पोपटराव लांडे (वय ७०, रा. कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत आशिष पांडुरंग लांडे (वय ३८) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग लांडे हे गुरुवारी (८ मे) सकाळी पावणेआठच्या सुमारास कर्वे रस्त्याने निघाले होते. कोथरूड परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या लांडे यांना भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर लांडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करत आहेत.

हेही वाचा

वेल्डिंगचे काम करताना कामगाराचा मृत्यू

वेल्डिंगचे काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गंज पेठेत घडली. सुरक्षेविषयक काळजी न घेता दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी खडक पोलिसांनी घरमालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रोहित बाळू पवार (वय २८, रा. घोरपडे पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पवार यांची पत्नी चैत्राली (वय २२) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहिदास वसंत अडागळे (रा. गंज पेठ), कैलास जालिंदर सकट (रा. लोहियानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गंज पेठेतील फकीर गल्लीत दुमजली घरात २६ ऑगस्ट २०२३ रोजी वेल्डिंगचे काम करत होते. त्या वेळी पहिल्या मजल्यावरून त्यांचा मृत्यू झाला होता. कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून न दिल्याने दुर्घटना घडल्याचे रोहित यांची पत्नी चैत्राली यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. याबाबत चैत्राली यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करत आहेत.



Source link

सामान्यांवर परिणाम करणारी बातमी; ‘ही’ 32 विमानतळं बंद, मुंबईतून… India Pakistan तणावाचा फटका

0
सामान्यांवर परिणाम करणारी बातमी; ‘ही’ 32 विमानतळं बंद, मुंबईतून… India Pakistan तणावाचा फटका


India Pakistan War : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानला हादरा बसला आणि त्यानंतर या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाककडूनही भारतावर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचा अपयशी प्रयत्न करण्यात आला. याचदरम्यान एकिकडे नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं केंद्राकडून सूचित केलं जात असतानाच, दरम्यानच्या काळात नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यातील सर्वाधिक प्रभावित विभाग म्हणजे हवाई वाहतूक. 

भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने देशातील विमानतळं बंद ठेवत तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 9 ते 14 मे 2025 पर्यंत देशातील 32 विमानतळ बंद असतील. तर, दिल्ली आणि मुंबई अंतर्गत 25 हवाई मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपूर्ण काळात विमान कंपन्यांनी पर्यायी मार्गांची योजना आखण्याची सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणानं जारी केली आहे. 

वरील सूचनेनंतर कोणत्या विमानतळांवरील सेवा प्रभावित? 

  • आधमपूर 
  • अंबाला
  • अमृतसर
  • अवंतीपूर
  • भटिंडा
  • भूज
  • बिकानेर
  • चंदीगढ
  • हलवारा 
  • हिंडन
  • जैसलमेर 
  • जम्मू 
  • जामनगर 
  • जोधपूर 
  • कंडला
  • कांगडा 
  • केशोड
  • किशनगढ
  • कुल्लू मनाली (भुंतर)
  • लेह 
  • लुधियाना 
  • मुंद्रा
  • नालिया 
  • पठाणकोट
  • पटियाला
  • पोरबंदर
  • राजकोट (हिरासर)
  • सरस्वा
  • शिमला 
  • श्रीनगर 
  • थोईसे 
  • उत्तरलाई

वरील सर्व विमानतळांवरील नागरी वाहतूक सुविधा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. दरम्यांच्या काळात मुंबई आणि दिल्ली विमान वाहतूकसुद्धा प्रभावित होत असल्यानं अनेक सामान्य नागरिकांना आणि विमान प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.  

पुणे विमानतळावर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

भारत पाक दरम्यान च्या युद्ध जन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इकडे पुणे विमानतळाची सुरक्षा आणखी कडक करण्यात आलीय..प्रवाशांना बारकाईने तपासणी करून आत सोडलं जातंय तसंच व्हीआयपी टर्निमनलची सुरक्षा वाढवली गेलीय..
यासोबतच सीमा भागात जाणारी प्रवासी विमान सेवा कालपासूनच तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. 

दिल्ली विमानळाकडून प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना 

दिल्ली विमानतळाचे कामकाज सध्या सामान्य आहे. मात्र बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या आदेशानुसार वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा तपासणी चौक्यांवर प्रक्रिया करण्याचा वेळ जास्त असू शकतो.





Source link

19 year old girl student arrested for posting Pakistan Zindabad on Instagram

0
19 year old girl student arrested for posting Pakistan Zindabad on Instagram



19 year old girl student arrested for posting Pakistan Zindabad on Instagram | पुण्यातील तरुणीकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची इन्स्टावर कमेंट, पोलिसांनी केली अटक



Source link

पूरपातळीचा नीट विचार नाही? ; नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या ‘आयसर’च्या अभ्यासात निरीक्षण

0
पूरपातळीचा नीट विचार नाही? ; नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या ‘आयसर’च्या अभ्यासात निरीक्षण



पुणे : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा-मुठा ‘नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणा’साठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांत पुराची पातळी कमालीची कमी लेखण्यात आल्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे अनपेक्षितपणे होणाऱ्या विसर्गासाठी शहर तयार आहे का, याचा विचार करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) ‘पाणी संशोधन केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालात नोंदवले आहे.

‘पुणे-पिंपरी चिंचवड नदी पुनरुज्जीवन’चे सारंग यादवाडकर यांनी ही माहिती दिली. ‘पावसाळ्यात नदीची पातळी आणि धरणांमधील पाणीसाठा जास्त असतो. अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता असते. नदीसुधार प्रकल्पात या शक्यतांचा विचार करण्यात आलेला नाही. पूरपातळी कमालीची कमी लेखण्यात आलेली आहे. प्रकल्प राबवताना पूर पातळीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरातील पूर पातळी आणि पूर वारंवारितेच्या वाढीचा अचूक अंदाज लावणे आव्हानात्मक असते. मात्र, शहराची पूर विसर्गप्रणाली आखताना हवामान बदलामुळे येऊ शकणाऱ्या मोठ्या पुराची दखल घेणे अत्यावश्यक असते. नदीसुधार प्रकल्पात याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अनपेक्षितपणे होणाऱ्या मोठ्या विसर्गासाठी शहर तयार होऊ शकणार नाही. आता जलविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून वेळीच उपाययोजना करायला हव्यात,’ अशी निरीक्षणे ‘आयसर’च्या शास्त्रज्ञांनी नोंदवल्याचे यादवाडकर यांनी सांगितले.

‘प्रकल्पात २४० हेक्टर हरित भागावर काँक्रीटचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे निर्माण होणारे पर्यावरणाचे धोके आणि परिसंस्थेचे नुकसान विचारात घेण्यात आलेले नाही,’ असेही अहवालातून नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणावर पडणाऱ्या प्रभावाचे स्वतंत्र मूल्यांकन तज्ज्ञांकडून करून घेण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांनी अहवालात व्यक्त केल्याचे यादवाडकर यांनी सांगितले.

‘नदीसुधार प्रकल्पात वाजवी गृहीतकांच्या आधारे अतिवृष्टी आणि पूर विसर्गाचा अंदाज लावण्यात आलेला आहे. पूर पातळी ठरवण्यासाठी कृती समितीने स्वतःच्या अहवालातील अंदाजांपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी कमी असलेले पाटबंधारे विभागाचे अंदाज वापरले आहेत. ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थे’च्या अहवालातही पूर विसर्गाचा अंदाज जास्त आहे. असे असूनही पुराची पातळी कमी का ठरवण्यात आली,’ असा सवाल यादवाडकर यांनी उपस्थित केला.

‘आयसर’च्या अहवालातील ठळक नोंदी

  • हवामान बदलांचे परिणाम विचारात घेण्यात आले नाहीत.
  • पुराची पातळी कमी लेखली गेली.
  • तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना आवश्यक

प्रकल्पामुळे शहराला निर्माण झालेला धोका आता शास्त्रज्ञांनीही अधोरेखित केला आहे. या अहवालाकडे गांभीर्याने पाहायला हवे. सामान्य पुणेकरांनी आता जागृत होणे गरजेचे आहे.- सारंग यादवाडकर, पुणे-पिंपरी चिंचवड नदी पुनरुज्जीवन



Source link

Central governments big decision in the wake of India Pakistan tensions Flights at 32 airports closed till May 15

0
Central governments big decision in the wake of India Pakistan tensions Flights at 32 airports closed till May 15



Central governments big decision in the wake of India Pakistan tensions Flights at 32 airports closed till May 15 | भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ३२ विमानतळावरील उड्डाणे १५ मेपर्यंत बंद



Source link

मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक

0
मुंबईतून पावणेसहा कोटींचे अंमली पदार्थ जप्त;तिघांना अटक



मुंबईः मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पवई, ओशिवरा आणि दादर भागात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण पाच कोटी ८० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत तीन तस्करांना अटक करण्यात आली. विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली. जप्त अमली पदार्थांमध्ये मेफेड्रोन (एमडी) व हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने पवईच्या साकी विहार रोड परिसरात ५ मे रोजी केली. त्यावेळी संशयावरून एका व्यक्तीला अडवण्यात आले. त्याच्या तपासणीत १०८ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ सापडले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारातील अदाजे किंमत २१ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला एमडी पुरवणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या कारवाईत घाटकोपर युनिटने ओशिवराच्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात सापळा रचला होता. येथे एका आरोपीकडून दोन किलो ४० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत सुमारे दोन कोटी चार लाख रुपये आहे.तिसरी कारवाई वरळी कक्षाने दादर कॅटरिंग महाविद्यालयाजवळ केली. येथे एका आरोपीकडून तीन किलो ५५० ग्रॅम उच्च प्रतीचे हायड्रॉपोनिक गांजा जप्त करण्यात आला, त्याची किंमत अंदाजे तीन कोटी ५५ लाख कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली.

अटक केलेले आरोपी ओशिवरा व दादर परिसरात हायड्रोपोनिक गांजाची अवैध तस्करी करीत होते. याप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथक अधिक तपास करीत आहेत. आझाद मैदान कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, घाटकोपर कक्षाचे अनिल ढोळे आणि वरळी कक्षाचे प्रभारी संतोष साळुंखे यांच्या पथकाने या कारवाया केल्या. याप्रकरणी आरोपींच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली असून त्याद्वारे तपास करीत आहेत. तसेच आरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे अमली पदार्थांची विक्री केली असून त्याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी सराईत टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. जप्त करण्यात आलेला हायड्रोपोनिक गांजा परदेशातून आणल्याचा संशय आहे.



Source link

कर्नाक पूल रखडवणाऱ्या कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड;प्रतिदिन २० लाख रुपये दंड

0
कर्नाक पूल रखडवणाऱ्या कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड;प्रतिदिन २० लाख रुपये दंड



मुंबई : दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच पोहोच रस्त्यांचे काम रखडवल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. या कंत्राटदाला प्रतिदिन २० लाख रुपये याप्रमाणे आतापर्यंत एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा पूल १० जूनपर्यंत सुरू करण्याचे पालिका प्रशासनाचे उद्दीष्ट्य होते.

पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील गोखले पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आता मुंबई महापालिका प्रशासनाने कर्नाक पूलाचे काम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. मात्र पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम रखडले आहे. पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी लागणारे गर्डर म्हणजेच तुळई अद्याप आले नसल्यामुळे पुढचे काम रखडले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला काम लवकर करण्याबाबत बजावले होते. मात्र पुलासाठीचे गर्डर ३० एप्रिलपर्यंत न आल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक बनल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्याच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.या पुलाचे गर्डर ३० एप्रिलपर्यंत येणार होते. ते न आल्यामुळे १ व २ मे रोजी कंत्राटदारावर प्रतिदिन १० लाख रुपये दंड दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही गर्डर आणण्यात अपयशी ठरल्यामुळे कंत्राटदाराला ६ मेपर्यंत प्रतिदिन २० लाख रुपये दंड करण्यात आला.आतापर्यंत कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड करण्यात आला आहे. पुलाचे गर्डर येत्या एक – दोन दिवसात आले तरच १० जून रोजी पूल सुरू करता येणार आहे.अन्यथा पूल रखडण्याची शक्यता आहे.

मशीद बंदर रेल्वे स्थानकानजीकच्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्व दिशेला ८ खांब पूर्ण झाले असून ४० पैकी ५ लोखंडी तुळया (गर्डर) प्रकल्पस्थळी आल्या आहेत. दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते ५ जून २०२५ पर्यंत तयार करावे आणि १० जून २०२५ पर्यंत पुलाच्या मुख्य वाहतूक मार्गाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले



Source link

भारताची युद्धसज्जता, प्रादेशिक सेनेला पाचारणाचे लष्करप्रमुखांना अधिकार

0
भारताची युद्धसज्जता, प्रादेशिक सेनेला पाचारणाचे लष्करप्रमुखांना अधिकार



Indias war preparedness, Army Chief has the authority to call in territorial army भारताची युद्धसज्जता, प्रादेशिक सेनेला पाचारणाचे लष्करप्रमुखांना अधिकार



Source link

BEST initiative increases बेस्टचे प्रवासी नाराज

0
BEST initiative increases बेस्टचे प्रवासी नाराज


मुंबई : मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ॲण्ड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) प्रशासनाने बसचे भाडे दुप्पट केले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना दुप्पट बसभाड्याचा फटका बसला. अनेकांना या भाडेवाढीबद्दल कल्पना नव्हती. त्यामुळे वाहकांशी हुज्जत घालत प्रवाशांनी बेस्टला लाखोली वाहिली. भाडेवाढीमुळे पहिल्याच दिवशी बेस्टची प्रवासी संख्या रोडावल्याचेही काही ठिकाणी जाणवत होते. मात्र भाडेवाढीचा खरा परिणाम येत्या काही दिवसांतच निदर्शनास येईल.

बेस्ट उपक्रमाने बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून वाढ केली. सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेत जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर २ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. एकदम दुपटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये पहिल्याच दिवशी नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक प्रवाशांना बेस्टच्या भाडेवाढीबद्दल कल्पना नव्हती. त्यामुळे बसमध्ये चढल्यावर तिकीट काढताना भाडेवाढ झाल्याचे ऐकून अनेक प्रवाशांना धक्काच बसल्याचे दिसत होते. काही बस स्थानकांवर प्रवासी भाडेवाढीवरून वाहकांबरोबर हुज्जत घालताना दिसत होते.

सुट्ट्या नाण्यांवरून वाद

बेस्टचे प्रवासी भाडे पाच रुपये व सहा रुपये होते. तेव्हा सुट्टे पाच रुपये देणे प्रवाशांना सोपे होत होते. तर बेस्टकडे मोठ्या प्रमाणावर पाच रुपयांची नाणी जमा होत होती. आता नव्या भाडेवाढीमुळे दोन रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा खच बेस्टकडे वाढणार आहे. पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरूनही वाद होत होते. २० रुपये दिल्यास ८ रुपये परत घेणे किंवा १५ रुपये दिल्यावर ३ रुपये परत देणे हे वाहकांसाठीही गोंधळाचे झाल्याचे दिसत होते.

लाडक्या बहिणींसाठी भाडेवाढ

भाडेवाढ झाल्यामुळे प्रवाशांनी बेस्ट प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र प्रवाशांच्या या टोमण्यांना वाहकांनाच सामोरे जावे लागत होते. आधी गाड्या वाढवा, मग भाडे वाढवा असे टोमणे प्रवासी मारत होते. तर सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण योजने’साठी निधी उभारण्यासाठीच ही भाडेवाढ केल्याचाही आरोपही अनेक प्रवासी करीत होते.

पायी प्रवास बरा

एक दोन किमीच्या प्रवासासाठी १२ रुपये देणे महाग वाटत असल्यामुळे अनेक प्रवाशांनी पायी प्रवास करणे पसंत केले. सिद्धिविनायक मंदिरासाठी वरळी कोळीवाड्यातून निघालेल्या एका प्रवाशाने सांगितले की, फक्त १ किमी अंतरासाठी १२ रुपये देणे योग्य वाटत नाही, म्हणून मी आज चालतच देवळात गेलो.

शेअर टॅक्सीवाल्यांचा धंदा जोरात

शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्यासाठीच बेस्टचे भाडे वाढवण्यात आल्याचाही आरोप काही प्रवासी करीत आहेत. समाजमाध्यमांवरूनही हा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी शेअर टॅक्सी १५ रुपये आकारते, तिथे बेस्टसाठी आता १२ रुपये द्यावे लागणार आहेत. मात्र आतापर्यंत बसगाडीसाठी थांबणारे प्रवासी यापुढे शेअर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.

बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या – ३१.५ लाख
दैनंदिन उत्पन्न – १.७५ कोटी रुपये
मासिक उत्पन्न – ५० ते ६० कोटी रुपये

प्रवासी उत्पन्न वार्षिक – ६८० कोटी रुपये

बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या – २७८४

स्वमालकीच्या बसगाड्या – ६६५



Source link

बँकांचे सर्व एटीएम पुरेशा पैशांसह कार्यरत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 

0
बँकांचे सर्व एटीएम पुरेशा पैशांसह कार्यरत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 



All bank ATM are functioning with sufficient money. Appeal not to believe in rumors बँकांचे सर्व एटीएम पुरेशा पैशांसह कार्यरत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन 



Source link