Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 273

रसिक स्पेशल: ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश

0
रसिक स्पेशल:  ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश


डॉ. सुखदेव उंदरे7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारत आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्पष्ट झालेच आहे. पण, आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारत आता कोणत्याही सीमा पार करु शकतो, हा संदेशही त्यात दडला आहे. आणि तो उद्याच्या जगातील भारताच्या स्थानासाठी जास्त महत्त्वाचा आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला म्हणजे सुरक्षेतील चूक होती का? या प्रश्नापेक्षाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतीचा ना-पाक इरादा मध्येच डोके वर कसा काढतो, या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. हे मूळ शोधताना भारताने आजवर बहुतांश वेळा संयमी भूमिका स्वीकारली. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला एका विशिष्ट आणि मर्यादित स्वरुपात प्रत्युत्तर दिले होते. पण यावेळी मात्र भारताने आपल्यावरील जागतिक, राजनयिक, सैनिकी, भौगोलिक मर्यादा आक्रमकपणे ओलांडण्याचे धैर्य दाखवले. भारत – पाकिस्तानमध्ये संघर्षाच्या धुरांचे प्रचंड लोळ उठले असताना, त्यातून जगासाठीही एक संदेश ठळकपणे उमटला आहे.

‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ आणि त्यापुढे… : २०१६ च्या उरी येथील आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कूटनीतिक पावले उचलली. पण, त्यांची व्याप्ती मर्यादित ठेवली होती. त्यावेळी भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’चा दर्जा रद्द करून त्या देशाची आर्थिक कोंडी केली. पहलगाम हल्ल्यानंतर मात्र भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध आक्रमक व्यूहनीती अवलंबली. सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला, पाकिस्तानी नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या, त्या देशाच्या राजनयिक अधिकारी आणि नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले, पाकिस्तानसाठी हवाई हद्द बंद केली. हा ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ महत्त्वाचा असला, तरी तो कारस्थानी पाकला वठणीवर आणण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे भारत केवळ ही कूटनीतिक कारवाई करून थांबणे शक्य नव्हते. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंमलात आणत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा हिशेब चुकता केला. मात्र, या हल्ल्यांमध्ये नागरी वसाहतींना किंवा लष्करी तळांना लक्ष्य केले नाही.

व्यूहात्मक, भौगोलिक प्रत्युत्तर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या दिवशी भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या आत घुसून हल्ला केला. या आधीच्या बालकोटसारख्या हल्ल्यांमध्ये भारताने केवळ नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरवर आपले लक्ष केंद्रित केले होते. नियंत्रण रेषा ही सैन्याचा प्रचंड फौजफाटा असलेली सीमा आहे, परंतु यावेळी भारताने आपल्या रणनीतीमध्ये कोणतीही संदिग्धता न ठेवता थेट आंतरराष्ट्रीय सीमा पार करून पाकिस्तानातील पंजाबमध्ये हल्ला केला. यात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदची बहावलपूर, मुरीदकेमधील मुख्यालये आणि दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळ लक्ष्य करण्यात आली. संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने सवाई नाला कॅम्प (मुझफ्फराबाद), सय्यदना बिलाल कॅम्प (मुझफ्फराबाद), गुलफूर कॅम्प (कोटली), बरनाला कॅम्प (भिंबर), अब्बास कॅम्प (कोटली) या पाकव्याप्त काश्मिरातील, तर सरजल कॅम्प (सियालकोट), मेहमुना जोया कॅम्प (सियालकोट), मरकझ तोयबा (मुरीदके), मरकझ सुभानअल्लाह (भवालपूर) या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या मालमत्तांवर हल्ला करून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. भारताची ही कृती म्हणजे पाकपुरस्कृत दहशतवादाला व्यूहात्मकदृष्ट्या व्यापक आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असे दिलेले प्रत्युत्तर होते.

पाकिस्तानने आता अशी दुष्कृत्ये करू नयेत आणि भारतीय उपखंडामध्ये तणाव वाढवण्याची आगळीक करू नये, असा भक्कम संदेश भारताने दिला. परंतु, विनाशकाले विपरीत बुद्धी.. या उक्तीप्रमाणे पाकिस्तानच्या उतावीळ लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने सीमेवरुन गोळीबार, बॉम्बहल्ले, ड्रोन हल्ले करून भारताला उलट उत्तर देण्याचे दु:साहस केले. त्यामुळे आपल्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारताने पाकवर प्रतिहल्ले सुरू केले. युद्धज्वर चढलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागावर हल्ले सुरूच ठेवल्याने भारतानेही प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ला चढवला. या युद्धाचे परिणाम भविष्यात समोर येतील, तेव्हा ते भारत – पाकिस्तानप्रमाणेच जगासाठीही अत्यंत महत्त्वाचे असतील.

जगाचे कान उघडणारी रणभेरी : ‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारताने दिलेले संदेश आणि संकेत केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर जगासाठीही महत्त्वाचे आहेत. भारत आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद अजिबात सहन करणार नाही, हे तर या कारवाईतून स्पष्ट झालेच आहे, पण या निमित्ताने जागतिक राजकारण, परराष्ट्र संबंध, संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षाविषयक धोरणात भारताने केलेला आक्रमक बदल अधिक उल्लेखनीय आहे. आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी भारत आता कोणत्याही सीमा पार करु शकतो, हा संदेश त्यातून दिला गेला आहे आणि तो उद्याच्या जगातील भारताच्या स्थानासाठी महत्त्वाचा आहे. भारताच्या या कारवाईचा संकेत पाकिस्तानसह दक्षिण आशियाई देशांसाठी तसेच अमेरिका, चीनसारख्या जागतिक राजकारणा‌र वर्चस्व ठेवण्यासाठी एकमेकांशी लढणाऱ्या देशांना इशारा देणारा आहे. भारत स्वत:च्या हितासाठी आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी जागतिक, आर्थिक, लष्करी वा अन्य कोणत्याही प्रकारच्या दबावाला भीक घालणार नाही, हे स्पष्ट करणारा हा संकेत आहे. एकूणच संघर्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील असला, तरी त्या निमित्ताने भारताने फुंकलेली रणभेरी जगाचे कान उघडणारी आणि महासत्तांना भानावर आणणारी आहे. मोठ्या संघर्षानंतर झालेल्या शस्त्रसंधीतूनही पाकिस्तान शहाणा झाला नाही, तर भारताला रोखता येणार नाही, हे सांगणारा हा आवाज आहे.

(संपर्क – sukhadevsundare@gmail.com)



Source link

कबीररंग: कृष्णमूर्तींच्या विचारप्रवाहाला लाभला कबीरांचा चेतना-स्तर

0
कबीररंग:  कृष्णमूर्तींच्या विचारप्रवाहाला लाभला कबीरांचा चेतना-स्तर


  • Marathi News
  • Opinion
  • Krishnamurti’s Thought Process Benefited From Kabir’s Level Of Consciousness Divya Marathi Rasik Article By Hemkiran Patki

हेमकिरण पत्की1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जे. कृष्णमूर्ती हे आधुनिक काळातील एक थोर विचारवंत होत. त्यांनी जगातील अनेक धर्मांत प्रचलित असलेल्या परंपरा, रूढी, रीती, साधनापद्धती आणि कर्मकांडे, ग्रंथप्रामाण्य आदींना शुद्ध तर्कानं प्रश्नांकित केलं. आपल्या संवादांतून समोरच्या श्रोत्यांना सस्नेह विचारलं: ‘या परंपरांचे पाईक होऊन आणि ग्रंथांना प्रमाण मानून तुम्हाला प्रेम नावाची आंतरिक स्थिती आजवर उमजलीय का? माणसामाणसांतला बंधुभाव तुमच्या रोजच्या जगण्यात उतरलाय का? मग आमूलाग्र परिवर्तन कसं होणार? तुम्ही आत्मनिर्भर कधी होणार?’ कृष्णमूर्तींनी आध्यात्मिक प्रवासाला निघालेल्या प्रेमशील माणसासाठी एक शाश्वत चिंतन ठेवलं : ‘सत्याकडे जाणारा एखादा विशिष्ट मार्ग नसतो किंवा सत्याकडे जाणारी चाकोरी नसते.’

स्थल – कालाचं मोठं अंतर असतानाही कबीर आणि कृष्णमूर्ती या दोन सत्पुरुषांमध्ये आपल्याला काही साम्य दुवे जाणवतात. ज्या काळात कबीर आपल्या श्रोत्यांना पदं आणि दोहे ऐकवत होते, तो काळ मूल्यांमध्ये संथपणे बदल घडण्याचा काळ होता. परंपरांनी संस्कारबद्ध असलेली आणि त्यांना ऐकणारी माणसं हळूहळू बदलत होती. पण, कृष्णमूर्ती आधुनिक काळातले होते. त्यांनी देशादेशांतील युद्ध, नरसंहार, बेचिराख झालेली शहरं आणि निर्वासित माणसं असं सारं पाहिलं. माणसांच्या संवेदना आणि वेदनांचा पट अनुभवला. पुढे औद्योगिकरण, यांत्रिकीकरण आणि जागतिकीकरणाचा माणसांच्या जीवनशैलीवर, विचारसरणीवर झालेला इष्टानिष्ट परिणामही पाहिला.

कबीरांनी अभावग्रस्त माणसाच्या भोगासक्त मनाचं जे चित्र आतून जाणलं होतं, तेच कृष्णमूर्तींनी आधुनिक काळातील माणसांच्या मूल्यांच्या पडझडीत आपल्या अंत:पटलावर उमटलेलं पाहिलं. कबीर परिस्थितीनं अगदी साधे होते. या दोघांमध्ये अध्यात्मातील अद्भुत साम्य दिसतं. दोघेही अद्वैत दर्शन जगणारे सत्पुरुष होते. अहंकार हाच माणसाला समग्र जगापासून तोडणारा आणि चेतनेचं विघटन करणारा घटक आहे हे दोघांनी जाणून संस्कारबद्ध माणसाला मुक्त करण्याचा एकमेव प्रेममय जीवनमार्ग अवलंबला होता. माणसामाणसातील नात्यांच्या भावार्थानं कबीर आणि कृष्णमूर्ती यांची हृदयं करुणामय झालेली होती. लोकजीवनात उतरलेल्या एका दोह्यात कबीर म्हणतात…

जा घट प्रेम न संचरे,

सो घट जान मसान।

जैसे खाल लोहार को,

सांस लेत बिन प्रान।।

लोहाराचा भाता हवा आत घेतो आणि सोडतो. पण, त्यात प्राण कुठं असतो? तद्वत यांत्रिकपणे श्वास घेणारा, निःश्वास सोडणारा माणूस कुठं जिवंत असतो? नुसता श्वास घेणं – सोडणं हे माणसाच्या जिवंतपणाचं व्यवच्छेदक लक्षण होऊ शकत नाही. प्रेमभावाशिवाय असलेलं परस्परांमधलं नातं असंच त्या लोहाराच्या भात्यासारखं आहे. आपल्या विलक्षण बुद्धीच्या सहाय्यानं विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती केलेला माणूस कृष्णमूर्तींना जीवनगंधास पारखा झाल्यासारखा वाटत होता. ते म्हणतात… ‘प्रेम हे मनाने कल्पिलेले साध्य नसते. म्हणून प्रेम प्राप्त करून घेण्याचे साधनही मिळणे शक्य नसते ही वस्तुस्थिती आहे. पण, आपण नेमके हेच कधी समजून घेत नाही आणि हीच आपली मुख्य अडचण आहे. या वस्तुस्थितीचे संपूर्ण आणि सखोल आकलन होते तेव्हाच या संसारी जगाच्या पार असलेले असे जे असते त्याचा स्पर्श होणे संभव होते. त्या निगूढ अज्ञाताचा स्पर्श झाल्याशिवाय आपण काहीही केले तरी मानवी नात्यात चिरंतन स्वरूपाचे सौख्य नांदणे शक्य नसते.’ हे चिरंतन स्वरूपाचं सौख्य म्हणजे कबीर म्हणतात ते प्रेम आहे. या थोर द्वयींतील आणखी एक साम्यस्थळ पाहू. कबीरांचा एक दोहा आहे…

हद हद पर सब ही गया,

बेहद गया न कोय।

बेहद के मैदान में,

रमै कबीरा सोय।।

आपल्या ठायी असलेल्या खास गुणवैशिष्ट्यांमुळे आपण दुसऱ्या माणसाची प्रत ठरवतो. आपल्या आकलनाची कुंपणं तयार करतो. त्यामुळं आपल्याला मनाचे काठ मोडून उत्कटपणे वाहता येत नाही. कबीरांच्या दृष्टीनं प्रेम हे नदीच्या प्रवाहासारखं आहे. ते मनाच्या कुंपणांतून वाहत नाही. प्रेम करणाऱ्याला मनाचे काठ मोडून वाहावं लागतं. मी अशा मुक्त प्रवाहातला आहे, असं ते सांगतात. हाच भाव व्यक्त करताना कृष्णमूर्ती म्हणतात… ‘भेटायला आलेली सारी माणसे व्यावसायिक वृत्तीची होती. एक जण सांगत होता की तो शास्त्रज्ञ आहे, दुसरा गणितज्ज्ञ आणि तिसरा अभियंता आहे. सारेच तज्ज्ञ होते. त्यांपैकी एकही जण आपल्या मनाची कुंपणं ओलांडून पुरातल्या नदीसारखा वाहणारा नव्हता. नदीचं काठ मोडून वाहणंच तर मातीला सुपीक बनवतं.’

प्रेमातील भावोत्कटतेविषयीचं कबीर आणि कृष्णमूर्ती यांचं हे चिंतन एकाच अस्तित्व केंद्रातून प्रकट झाल्याचं जाणवतं. आयुष्य उत्कटतेनं जाणून घेणाऱ्यांसाठी ते आत्मीय आहे. कबीर आणि कृष्णमूर्ती यांचे विचारप्रवाह हे परंपरा, लोकमान्यता, ग्रंथप्रामाण्य, प्रस्थापित जीवनरीत नाकारणारे असल्यानं वेगवेगळ्या काळात ते समांतरपणे वाहताना दिसतात. त्यातूनच या दोन्ही सत्पुरुषांचा चेतनेचा स्तर एकच असल्याचं आपल्याला जाणवतं.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link

वेबमार्क: ‘दुपट्टा किलर’च्या दहशतीचा वास्तवपट

0
वेबमार्क:  ‘दुपट्टा किलर’च्या दहशतीचा वास्तवपट


समीर गायकवाड3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गोव्यातील कुख्यात, सराईत गुन्हेगार महानंद नाईक याच्या गुन्हेगारी कृत्यांचा शोध घेणारी ‘द दुपट्टा किलर’ ही एक सत्यघटनांवर आधारित क्राइम डॉक्युमेंट्री आहे. पॅट्रिक ग्रॅहम आणि निरंजना हरिहरनंदनन यांनी ती दिग्दर्शित केली आहे. यामध्ये गोव्यात १९९० ते २००० च्या दशकात घडलेल्या खुनांच्या मालिकेचा तपास दाखवला आहे.

सिरियल किलर महानंद नाईकवर सोळा महिलांच्या खुनाचा आरोप होता, पण पुराव्याअभावी त्याला फक्त दोन खुनांसाठी दोषी ठरवण्यात आले. नाईक रिक्षाचालक होता. महिलांना भेटून लग्नाचे खोटे आश्वासन देताना तो स्वत:ला अविवाहित आणि सभ्य, नोकरदार माणूस म्हणून सादर करायचा. विश्वास संपादन करुन तो त्यांना जंगल, निर्जन रस्त्यांसारख्या ठिकाणी न्यायचा. तिथे त्यांच्याच दुपट्ट्याने गळा आवळून त्यांची हत्या करायचा. हत्येनंतर तो पीडितांचे दागिने, पैसे, इतर मौल्यवान वस्तू लुटायचा. मृतदेह लपवण्यासाठी जंगलात किंवा खड्ड्यात टाकायचा. त्याच्या गुन्ह्यांनी गोव्यात इतकी दहशत निर्माण झाली होती की, काही काळ महिलांना दुपट्टा घालण्याची भीती वाटू लागली होती. ही डॉक्युमेंट्री नाईकच्या गुन्ह्यांच्या मानसशास्त्राचा आणि त्याला पकडताना आलेल्या अडचणींच्या मागोव्यासोबतच न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेते. नाईकने २००९ मध्ये अटक होईपर्यंत अनेक वर्षे गुन्हे केले, कारण पोलिसांना पुरावे आणि पीडित कुटुंबांकडून तक्रारी मिळवण्यात असंख्य अडचणी येत. सध्या नाईक १५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर चांगल्या वर्तनाच्या आधारे सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुनर्वसन व न्याय याविषयी चर्चाही सुरू झाली आहे.

डॉक्युमेंट्रीमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पीडितांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती आहेत आणि गुन्हे कसे केले याच्या रिक्रिएशनचा समावेश आहे. नाईकने पोलिसांना स्वत:हून पीडितांच्या मृतदेहांची ठिकाणे दाखवली होती. त्याचे रिअल आर्काइव्ह फुटेज वापरले असल्याने सत्याचा तीव्र भास होतो. पार्श्वसंगीत आणि व्हिज्युअल्स यांच्या वापराने गुन्ह्यांचे भयावह स्वरूप प्रभावीपणे दाखवल गेले आहे. ‘द दुपट्टा किलर’ची आणखी एक महत्त्वाची मांडणी म्हणजे याद्वारे न्यायव्यवस्थेतील त्रुटीवर कटाक्ष टाकलाय. पुराव्यांअभावी खटले कमकुवत होणे आणि पीडितांना न्याय मिळण्यात येणारे अडथळे यावर ही डॉक्युमेंट्री थेट भाष्य करत नसली, तरी हे मुद्दे परिणामकारकपणे समोर आणण्यात आले आहेत.

समाजातील स्त्री – पुरुष भेदभाव आणि लग्नाच्या सामाजिक दबावाचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारांबाबत हा माहितीपट प्रश्न उपस्थित करतो. या संपूर्ण प्रकरणात अनेक पीडित कुटुंबांनी लज्जेमुळे तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे नाईकला गुन्हे करणे सोपे गेले, हे वास्तव टोकदारपणे समोर येते. निर्माते सामर खान आणि दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम यांनी ही डॉक्युमेंट्री केवळ मनोरंजनासाठी बनवली नाही, हे पदोपदी जाणवते. समाजात बदल घडवण्यासाठीचे प्रबोधन आणि गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश असावा. पीडितांच्या कथांना संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. सर्व बाजूंनी कथा सांगत असतानाच प्रेक्षकांना स्वतःचा निष्कर्ष काढण्याची मुभा देऊन त्यांनी एक प्रभावी मेसेज दिलाय. यात नाईकच्या दोषीपणावर जास्त भर दिला असून, स्वतंत्ररीत्या वेगळे संशोधन वा तपास केलेला नाही, हे महत्त्वाचे आहे. कारण अलीकडे मीडिया ट्रायल हा प्रकार सर्वत्र बोकळला आहे. त्यामुळे प्रस्तुतकर्ता आपलं मत न मांडता केवळ प्लेन स्टोरी प्रेझेंट करतो, तेव्हा ती जास्त खरी वाटू लागते.

या डॉक्युमेंट्रीकडे तत्कालीन गोव्याच्या सामाजिक मांडणीचा ऐवज म्हणूनही पाहता येईल. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून ते २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गोवा हे पर्यटन आणि समृद्धीचे सर्वोच्च केंद्र होते. असे असूनही गोव्याच्या ग्रामीण भागात गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक दबाव यांचा प्रभाव होता. याचा नेमका फायदा घेत नाईकने बहुतांश गरीब, असुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित महिलांना लक्ष्य केले. यातील बऱ्याच महिला मजूर किंवा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील होत्या, त्यांना लग्नाच्या आमिषाने सहज फसवता येत असे. त्या काळात अविवाहित किंवा घटस्फोटित महिलांना समाजात कमी लेखले जायचे. वरवर शांत वाटणाऱ्या, सामान्य माणसासारखं दिसणाऱ्या नाईकने या मानसिकतेचा गैरफायदा घेतला. वास्तवात या घटनेवर वेबसिरीज बनवणे सोपे झाले असते. कारण त्यासाठी लागणारा मसाला यात आहे. तरीही निर्मात्यांनी सोशल मेसेज देण्यासाठी माहितीपटाचा फॉर्म निवडला आहे हे लक्षात येते. सफाईदार तांत्रिक अंगे आणि गतिमान मांडणी यांमुळे ही डॉक्युमेंट्री रोमांचक आणि भेदक वाटते. ती डॉक्यूबेवर इंग्रजी, तामिळ, तेलुगू, हिंदी या चार भाषांत उपलब्ध आहे. अॅमेझॉन प्राइमद्वारेही ती पाहता येईल.

जाता जाता… अजय देवगणच्या ‘रेड’चा सिक्वेल पाहण्याजोगा झालाय. यात छोट्या वा दुय्यम समजल्या जाणाऱ्या कलाकारांनी अगदी जीव तोडून कामे केली आहेत.

(संपर्कः sameerbapu@gmail.com)



Source link

गोष्ट सांगतो ऐका…: इंग्लिश बाबा!

0
गोष्ट सांगतो ऐका…:  इंग्लिश बाबा!


अरविंद जगताप9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक या बाबामुळं सापडल्याचं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तो बाबाकडं गेला…

शहरात सगळे त्याला इंग्लिश बाबा म्हणायचे. कारण बाबा एकदा थेट देवाशी बोलायला लागला की इंग्रजीत बोलायचा. समोर बसलेले भक्त अवाक् होऊन जायचे. कारण बाबा साधारण सातवी शिकलेला आहे, हे त्याला ओळखणारे सगळे सांगायचे. एरवी अतिशय सुमार हिंदी बोलणारा बाबा देवाशी संवाद सुरू झाला की थेट इंग्रजीत बोलू लागतो. खूप वेळा देवावर रागावतो. कधी कधी देवाला मोठ्यानं बोलायला सांगतो. ऐकणारे भक्त चकित होतात. पण, बरेच लोक सांगतात, एकदा का इंग्रजीत संवाद झाला की बाबा सांगतो, ते खरं होतं. त्यामुळं बाबाकडं होणारी गर्दी वाढतच चाललीय.

बाबा भविष्य सांगतो. म्हणजे साधारण काय होतं? तर बाबाकडं अडचण घेऊन आलेला माणूस रांगेत बसलेला असतो. एकदाचा त्याचा नंबर येतो. माणूस बसून राहतो. बाबा कधी डोळे मिटून बसतो. कधी त्या माणसाकडं एकटक बघत बसतो. कधी चक्क झोपी जातो. मध्येच कधी तरी तो जागा होतो. मग थेट इंग्रजीत बोलू लागतो. अशावेळी भक्त समजून जातात की, बाबाचा देवाला कॉल लागला. बाबा इंग्रजीत काय बोलतो, हे भक्ताला कळत नाही. भक्ताला कशाला, इंग्रजीच्या जाणकार माणसालाही कळत नाही. पण, बाबाचा एक शिष्य आहे. त्याला मात्र बाबाची भाषा कळते. तो डॉक्टरांसारखा एका छोट्या चिठ्ठीवर प्रीस्क्रिप्शन लिहिल्याप्रमाणं लिहितो. ती चिठ्ठी बाहेरच्या खोलीत कॅश काउंटरला पाठवली जाते. आता अडचण असलेल्या माणसाने बाहेर जायचं. तिथं पैसे जमा करायचे. चिठ्ठी घ्यायची. चिठ्ठीत उपाय लिहिलेला असतो. तो उपाय करायचा.

एका माणसाची बायको खूप उपचार करूनही बरी होत नव्हती. तिला अर्धांगवायू झाला होता. बाबाने एक महिना कावळ्यांना गुलाबजाम खाऊ घालायला सांगितलं. आणि त्या माणसाची बायको बरी झाली म्हणे.. एका बाईचा नवरा गायब झाला होता. वर्ष झालं ती शोधत होती. शेवटी कुणीतरी बाबाचं नाव सांगितलं. ती बाबाकडं आली. बाबाने तिला सरड्याला शिरा खाऊ घालायला सांगितला. बाई चिंतेत पडली. पण, एका पडक्या घरापाशी सरडा दिसला. ती महिनाभर रोज शिरा बनवून त्या घराच्या पडक्या भिंतीवर ठेवत होती. एक दिवस नवरा स्वत: परत आला म्हणे.. म्हणजे सरड्याने शिरा खाल्ला बहुतेक..

..तर अशा गोष्टी सोशल मीडियावर फिरत असतात. सुयश त्या वाचत असतो. पण, आज त्याला त्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत होत्या. कारण दोन दिवस झाले त्याच्या बायकोचा पत्ता नव्हता. एक दिवसभर वाट पाहून त्याने स्वत:च्या घरी फोन केला. त्याची आई रडायला लागली. तिची मुख्य चिंता ही होती की लोकांना काय तोंड दाखवणार? मित्राला फोन केला तर तो म्हणाला, ‘मी तुला आधीच सांगितलं होतं की तिच्याशी लग्न करू नको. मला आधीपासूनच तिचं लक्षण ठीक नव्हतं वाटत..’ कंटाळून तिच्या घरच्यांना फोन केला, तर ते म्हणाले, ‘तूच काहीतरी बोलला असशील. आधीच आमची लेक एवढी हळवी, त्यात तुझ्यासारखा राक्षस नशिबी आला..’

सुयशला दोन दिवसांत काहीच माहिती मिळाली नाही. आणि मदतही. पश्चात्ताप मात्र खूप झाला. कारण लोक काहीबाही बोलू लागले होते. सगळे काही तोंडावर बोलत नव्हते. पण, माघारी काय चर्चा चालू असेल, याचा त्याला अंदाज येत होता. दोन दिवस खूप अस्वस्थेत गेले. पोलिस, मित्र-मैत्रिणी सगळ्यांना भेटून झालं. पण, काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी कितीही समंजस माणूस अशावेळी वाटेल ते करायला तयार होतो. त्यात सुयश इंग्लिश बाबाविषयी खूप ऐकून होता. हरवलेले खूप लोक बाबामुळं सापडले, असं लोकांनी सांगितलं होतं. शेवटी मनाचा निर्धार करून तीन – चार दिवसांनी तो बाबाकडं गेला. गर्दी होतीच. लोक समस्या सांगत होते.

एका बाईने सांगितलं की, तिच्या नवऱ्याची दारू सुटत नाही. बाबाने उपाय सुचवला, पाच दिवस उंदराला टोपणभर दारू पाजा.. असे उपाय ऐकून सुयशला परत जायची इच्छा झाली. पण, लोकांची कामं होत असणार म्हणून तर एवढी गर्दी आहे, असं त्याने स्वत:ला समजावलं. थांबून राहिला. त्याला त्या गर्दीत काही श्रीमंत लोकही दिसले. मग त्याच्या मनाला अजून धीर आला. श्रीमंत माणसं जे करतात, ते मध्यमवर्गीय माणसाला नेहमी योग्य वाटतं. सुयश बसून राहिला.

काही वेळाने बाबा झोपेतून उठला. इंग्रजीत बोलू लागला. त्याच्या शिष्याने चिठ्ठी लिहिली. सुयश पैसे देऊन ती चिठ्ठी घेऊन बाहेर पडला. पूर्व दिशेला रोज पाच किलोमीटर चालत जायला सांगितलं होतं. म्हणजे बायको पूर्व दिशेला सापडेल, असं बाबाला सुचवायचं होतं. सुयश तीन-चार दिवस रोज पूर्वेला पाच किलोमीटर चालू लागला. पण, कुठे काही सुगावा लागत नव्हता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे त्याचं लक्ष जायचं. पहिले दोन दिवस खूप आशा वाटत होती. पण, नंतर तो निराश झाला. मग आपल्याकडून सांगण्यात काही चूक झाली असेल, असं त्याला वाटू लागलं. त्याने पुन्हा एकदा बाबाकडं जावं, असा सल्ला बाबाच्या चाहत्यांनी त्याला दिला. सुयश गेला. यावेळी त्याला दक्षिणेकडे जायला सांगितलं.सुयशने तेही मनापासून केलं.

चार – पाच दिवस त्या दिशेला शोध घेत राहिला. पण, काही उपयोग झाला नाही. आता खूप पैसेही गेले होते. तरीही बाबाचे चाहते ‘एकदा प्रयत्न करून पाहा’ म्हणाले. पण, सुयश यावेळी बाबाकडं गेला नाही. भरदुपारीच तो बिअर बारमध्ये गेला. तीन – चार बिअर प्यायला. शांत बसून राहिला. त्याला स्वतःची लाज वाटत होती. आपण या बुवाबाजीला कसे बळी पडलो? सुयश त्या दुपारच्या उन्हात रस्त्याने चालू लागला. एकटाच. त्याला काहीच सुचत नव्हतं. नीट चालताही येत नव्हतं. तो एका जागी थांबला. खूप वेळ. एवढी कधीच प्यायला नव्हता बिचारा..

अचानक त्याला एक स्त्री दिसली. सुयश तिच्यामागं चालू लागला. त्या स्त्रीला काही वेळाने संशय आला. ती घाईत चालू लागली. पण, सुयशला कुठं भान होतं? तो पाठलाग करत राहिला. ती घाईघाईत एका गल्लीत शिरली. सुयशही मागोमाग गेला. त्यानंतर काय घडलं माहीत नाही…

रात्री इंग्लिश बाबाचा सुयशला फोन आला. ‘माझी बायको कुठं आहे?’ असं त्यानं विचारलं. सुयश ‘माहीत नाही’ म्हणाला. बाबा म्हणाला, ‘सीसीटीव्ही पहिलाय मी.. तू तिचा पाठलाग करत होतास. कुठं गेला सांग.. माझी बायको कुठं आहे सांग..’ अचानक सुयश बाबासारखा इंग्रजीत बोलू लागला. बाबा आणखी संतापला. सुयश म्हणाला, ‘आता तूच चिठ्ठी लिही आणि तूच शोध.. बघू तुला तुझी बायको सापडते का?’ बाबा माफी मागू लागला. गयावया करू लागला. सुयश पुन्हा इंग्रजी बोलू लागला. इंग्लिश बाबाने त्या दिवशीपासून इंग्रजीत बोलणं बंद केलं. खरं तर लोकांशीच बोलणं बंद केलं.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; ‘आर-पार’मध्ये केले होते एकमेकांसोबत काम

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  नूरजहां यांनी केला होता जॉनी वॉकरशी विवाह; ‘आर-पार’मध्ये केले होते एकमेकांसोबत काम


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मेहबूब खान यांचा ‘अनमोल घडी’ हा एक खूप ‘अनमोल’ सिनेमा होता. त्यात नूरजहां यांनीही काम केले होते. आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये नूरजहां यांच्याविषयी बोलूया. पण, त्या नूरजहां यांच्याविषयी नाही, ज्या फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्या. वास्तविक मी त्या नूरजहांबद्दल बोलतोय, ज्या जुन्या काळातील अभिनेत्री शकीला यांच्या लहान भगिनी होत्या आणि ज्यांनी नंतर जॉनी वॉकर यांच्याशी विवाह केला.

‘अनमोल घडी’ सिनेमा पूर्ण झाल्यावर मेहबूब खान यांच्यासमोर टायटल बनवण्यासाठी एक यादी ठेवण्यात आली. त्यावर नजर टाकल्यावर त्यांच्या लक्षात आले की, या सिनेमात एक नव्हे, तर दोन नूरजहां आहेत. एक तरुण नूरजहां आणि दुसरी वयाने लहान असलेली नूरजहां. विशेष म्हणजे, यामध्ये नूरजहांच्या लहानपणीची भूमिकाही नूरजहांच करत होती. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न पडला.

मेहबूब खान यांनी विचार केला की, तरुण नूरजहांचे नाव तर बदलता येणार नाही, कारण तोवर त्या याच नावाने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे लहान नूरजहांचे नाव बदलावे, असे त्यांना वाटले. या बालिका नूरजहांचे नाव बदलून ‘नूर महल’ करण्यात आले. म्हणूनच ‘अनमोल घडी’मध्ये त्यांचे नाव नूर महल असे दिसते. त्यांनी पुढेही बालकलाकार म्हणून अनेक सिनेमांत काम केले. त्या सगळ्या सिनेमांत त्यांचे नाव ‘बेबी बूर’ ठेवले गेले.

नूर तरुण होईपर्यंत त्यांची मोठी बहीण शकीला स्टार बनल्या होत्या. त्यांच्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या सिनेमाचे शूटिंग सुरू होते. एकेदिवशी लहान बहीण म्हणजे नूरजहांही त्यांच्यासोबत तिथे गेली. तिथे त्यांची जॉनी वॉकर साहेबांशी त्यांची भेट झाली. योगायोग म्हणावे की आणखी काही, ते माहीत नाही; पण त्यावेळी ‘आर-पार’ तयार करत असलेल्या गुरुदत्त यांनी या सिनेमासाठी जॉनी वॉकर यांच्यासमवेत नूर यांना घेतले. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जॉनी वॉकर आणि नूर यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाली. दोघे जवळ आले, त्यांच्यात प्रेम निर्माण झाले आणि मग त्यांनी विवाह केला. जॉनी वॉकर यांच्या प्रेमात नूर यांनी एकाच सिनेमात काम करुन आपल्या करिअरचा निरोप घेतला. या गोष्टीवरुन मला प्रसिद्ध शायर मिर्जा गालिब यांचा एक शेर आठवतोय..

इश्क पर जोर नहीं है

ये वो आतिश ‘गालिब’

कि लगाए न लगे

और बुझाए न बने।

अशाप्रकारे १९५४ मध्ये रिलीज झालेला ‘आर-पार’ हा नूरजहाँ यांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात त्यांनी आपली मोठी बहीण आणि पती या दोघांसोबत काम केले. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, लहान बहीण नूरजहां यांच्यामुळे मोठ्या बहिणीला ब्रेक मिळाला होता. त्याचे असे झाले होते की, नूर बालकलाकार असताना एकदा त्यांच्यासोबत शकीलाही शूटिंगच्या ठिकाणी गेल्या. तिथे निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदाद यांनी त्यांना पाहिले आणि आपल्या ‘दास्तान’मध्ये हीरोइनची भूमिका दिली.

शकीला यांच्याविषयी साधारण अशी धारणा बनली आहे की, त्या इराणमध्ये राहणाऱ्या अफगाणिस्तानच्या राजकन्या होत्या. त्या राजघराण्याशी संबंधित होत्या, असे कोणी सांगायचे. कोणी म्हणायचे की, त्या अरब राजघराण्यातील आहेत. या सगळ्या धारणा आणि अंदाज पूर्णपणे चुकीचे आहेत. मी त्यांच्या कुटुंबाला व्यक्तिगत ओळखतो. त्यांचे पित्र नासिर यांच्याकडून मी हे कन्फर्मही केले आहे. नूरजी आणि शकीलाजी दोघी मुंबईच्याच होत्या आणि इथेच त्यांचा जन्म झाला होता. दोघी इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. दोघींचे शिक्षणही इथेच झाले. वास्तविक शकील यांचे सिंदबाद द सेलर, शहंशाह, राज महल, लैला और मजनू, अलीबाबा और चालिस चोर, हातिमताई, अल हिलाल असे काही सिनेमे हिट झाल्यावर त्यांचा चेहरा अरबी किंवा इराणी आहे.. त्या अरब वा इराणच्या राजघराण्यातील आहेत.. वगैरे वगैरे चर्चा सुरू झाल्या. त्यामुळेच मग त्यांचा चेहरा तिकडचा आहे, अशी लोकांमध्ये धारणा तयार झाली. पुढे १९६० – ६१ मध्ये त्या भारत सोडून लंडनला गेल्या. त्यानंतर लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की, त्या अरब राजकन्या होत्या आणि त्यामुळे आता तिकडे परत गेल्या आहेत. खरे तर या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. शकीलाजी आणि नूरजी भारतीय होत्या आणि मुंबईच्याच होत्या.

आज नूरजहां आणि जॉनी वॉकर यांच्या आठवणीत त्यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘आर-पार’ या सिनेमातील हे गाणे ऐका…

अरे न न न तौबा तौबा

मैं न प्यार करुंगी

कभी किसी से

तौबा तौबा…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

Our Government Service Centers are now going to be started मनपा केंद्रातून मिळणार

0
Our Government Service Centers are now going to be started मनपा केंद्रातून मिळणार


अहिल्यानगरः महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींमधून आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे. पालिकांमधील आपले सरकार सेवा केंद्रातून राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाइन सेवांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील व त्या संबंधातील सेवा पुरवल्या जातील.

आपले सरकार सेवा केंद्र यापूर्वी ग्रामपंचायती व खासगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात १२४२ ग्रामपंचायती व ८४१ खासगी व्यक्तींमार्फत एकूण २०८३ केंद्र चालवले जातात. या केंद्रांमार्फत राज्य सरकारच्या विविध विभागांच्या अधिसूचित केलेल्या एकूण ७० सेवा ऑनलाइन पध्दतीने दिल्या जातात. आता या सर्व सेवा मनपा, परिषदा, पंचायतीमार्फतही दिल्या जाणार आहेत.

राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त तथा प्रशासक, नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अखत्यारीत सुरू करावयाच्या आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्ह्याच्या ‘एनआयसी’ केंद्राकडून मनपा, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे ‘युजर आयडी’ प्राप्त करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपले सरकार पोर्टल वरून देण्यात येणाऱ्या सर्व सेवांकरता महाआयटी महामंडळाकडून ‘युजर आयडी’ प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामंडळाकडे प्रस्ताव पाठवायचे आहेत.

हेही वाचा

महाआयटी महामंडळाने ऑनलाइन अर्जाचे शुल्क स्वीकारण्याकरता संबंधित मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या केंद्रांना तत्काळ ‘वॉलेट’ सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रामार्फत राज्य सरकारच्या सर्वच विभागांच्या ऑनलाइन सेवांचे अर्ज स्वीकारले जातील व संबंधित दाखल्यांची संगणकीय प्रत देण्याची कार्यवाही मनपा, नगरपरिषद नगरपंचायतीमधील केंद्रातून होणार आहे.शहरातील नागरिकांना सर्वसामावेशक सेवा पुरवणारी केंद्र उपलब्ध होण्यासाठी राज्यसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनीही मनपा, परिषद नगरपंचायतीमार्फत केंद्र सुरू करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला आहे.



Source link

The Municipal Corporation has informed that water supply will be delayed एक दिवस विलंबाने पाणी

0
The Municipal Corporation has informed that water supply will be delayed एक दिवस विलंबाने पाणी


अहिल्यानगरः शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठवड्यात तीन दिवस विस्कळीत झाला होता. आता पुन्हा मुळानगर पाणी योजनेवरील उपसा पंप नादुरुस्त झाल्यामुळे शहर व उपनगराचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने कळवली आहे.

मुळानगर उपसा केंद्रात ७२५ अश्वशक्तीचे २ व ४०० चे २ पंप चालवून शहरास पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यामुळे मुळा धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे ४०० अश्वशक्तीचा पर्यायी पंप चालवावा लागतो. हा पर्यायी पंप शुक्रवारी रात्री नादुरूस्त झाला. तसेच ७२५ चा पर्यायी पंपही दुरुस्तीसाठी बंद आहे. मनपाकडे सद्य:स्थितीत अतिरिक्त पंप उपलब्ध नसल्याने मुळानगर येथून होणारा पाण्याचा उपसा कमी झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागांत एक दिवसाने उशिरा पाणीपुरवठा होणार आहे.

आज, शनिवार बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्ता, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, तसेच सारसनगर, बुरूडगाव रस्ता, केडगाव, नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरास पाणीपुरवठा झाला नाही. या भागात उद्या, रविवारी पाणीपुरवठा होईल तर, रविवारी रोटेशननुसार पाणीवाटप असलेल्या सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदीबाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर व सावेडी या भागास सोमवारी (दि. १२) पाणी सोडले जाईल.

हेही वाचा

सोमवारी पाणीपुरवठा होणाऱ्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रस्ता, आगरकर मळा, विनायक नगर या भागास मंगळवारी (१३ मे) पाणीपुरवठा होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले.



Source link

Bulandshahr : चालत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ३ आरोपींना अटक, धक्कादायक घटनेने खळबळ

0
Bulandshahr : चालत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ३ आरोपींना अटक, धक्कादायक घटनेने खळबळ



Bulandshahr Crime News Gang rape of minor girl in car 3 accused given bail gkt 96 चालत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, ३ आरोपींना अटक, धक्कादायक घटनेने खळबळ



Source link

Soldiers are receiving a message to report for duty जवान सीमेवर

0
Soldiers are receiving a message to report for duty जवान सीमेवर


सांगली : दोन दिवसांपूर्वी डोक्यावर अक्षता पडल्या. लग्नाची हळद अजूनही ओली आहे. तरीही संदेश येताच सांगलीतील जवान सीमेवर शनिवारी रवाना झाला, तर सिद्धेवाडीतील जवान मुलाचे बारसे घरच्यांना करण्यास सांगून मायभूमीच्या रक्षणासाठी रवाना झाला.भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहेत. अशा स्थितीत नैमित्तिक सुटीवर आलेल्या जवानांना कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होत आहे. या संदेशानुसार अनेक सैनिक सुटीवर असतानाही सीमेवर जात आहेत.

सांगलीत वास्तव्यास असलेले, पण मूळचे कोळे (ता. सांगोला) येथील योगेश अलदार हे त्यांच्या विवाहासाठी ३० एप्रिल रोजी ४० दिवसांच्या सुटीसाठी आले होते. या कालावधीत बाज येथील मुलीशी ५ मे रोजी त्यांचा विवाह पार पडला. आणि ७ मे रोजी त्यांना संदेश आला. ते राजस्थानातील गंगानगरमध्ये रणगाडा विभागात कार्यरत असून, त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्याचा आदेश मिळताच त्यांनी शनिवारी रेल्वेने कर्तव्यस्थळी कूच केले आहे.

सिद्धेवाडी येथील जवान रुपेश ऊर्फ बाळू शेळके हेही तीन महिन्यांच्या बाळाचे बारसे करण्यासाठी एक महिन्याच्या सुटीवर आले होते. मुलाच्या बारशासाठी पै-पाहुणे घरी जमले होते. दि. ८ मे रोजी बारशाचा कार्यक्रम होता. आणि त्याच दिवशी त्यांना सैन्यदलाकडून कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश प्राप्त झाला. आई लक्ष्मीबाई, पत्नी रुपाली, बंधू अमोल शेळके यांचा निरोप घेत मुलाच्या बारशाचा कार्यक्रम अर्धवट सोडून ते देशसेवेसाठी रवाना झाले.

हेही वाचा

दरम्यान खंडेराजुरी (ता. मिरज) येथील प्रज्वल रुपनूर हा जवान आज सीमारक्षणाच्या कर्तव्यासाठी मिरज स्थानकावरुन गुजरातला रवाना झाला. पंधरा दिवसापुर्वीच त्याचे लग्न झाले असून कर्तव्यावर हजर होण्याचा संदेश मिळताच तो रवाना झाला. मिरज स्थानकावर मुस्लिम बांधवांनी त्याच्यावर गुलाब पाकळ्यांची उधळण करत भारत जिंदाबादच्या घोषणा देत शुभेच्छा दिल्या. घराण्यातील तिसऱ्या पिढीचे सैन्यदलात प्रतिनिधीत्व करत असल्याचे रुपनूर यांने सांगितले.



Source link

मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट

0
मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट



17 Marathi films to be screened in May. Six films on a single day मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट



Source link