Monday, July 13, 2026
Home Blog Page 251

भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकचा धुव्वा, पाकिस्तानचे 400 हून अधिक ड्रोन्स हवेतच नष्ट

0
भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकचा धुव्वा, पाकिस्तानचे 400 हून अधिक ड्रोन्स हवेतच नष्ट


मुंबई : भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं.  भारतानं याचे पुरावेही दिले आणि इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही ऑपरेशन सिंदूरची दखल घेतली गेली. पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावणारं भारताचं ते अस्त्र कोणतं? त्याला सुदर्शन चक्र असं नाव का दिलं गेलं? याबाबत जाणून घेऊयात. 

भारताची संरक्षण सिद्धता सगळ्यांना ज्ञात होतीच पण आता ती पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे.  त्याला कारणीभूत ठरला पाकिस्तान. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं पाकिस्तानवर सूड उगवला. तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पण यामुळे पिसाळलेल्या पाकनं भारतावर गोळीबार आणि हल्ले सुरूच ठेवले. भारताच्या नागरी वस्त्यावर हल्ल्याचा पाकचा नापाक डाव आपल्या सैन्यानं लीलया परतवला. यात मोलाची कामगिरी बजावली ती सुदर्शन चक्रानं.  याच्या एकाच हल्ल्यात संपूर्ण पाकिस्तानची संरक्षण प्रणालीच बेचिराख झाली. पाकनं 36 जागांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. 400 हून अधिक ड्रोन्स डागले पण आपल्या सुदर्शन चक्रानं हवेतच नष्ट केले. हे सुदर्शन चक्र म्हणजे ‘भारताची एअर डिफेन्स सिस्टीम’ आहे.

कर्नल सोफिया यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्याचा पर्दाफाश केला. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्राचं उल्लंघन करत नाही तर सामान्य नागरिक आणि प्रवाशांच्या विमानांचाही युद्धात ढाल म्हणून वापर करतोय, असं त्या म्हणाल्या. पण भारताच्या सुदर्शन चक्रानं पाकिस्तानला नामोहरम केलं. पाकचा प्रत्येक ड्रोन, प्रत्येक क्षेपणास्त्र आणि एफ 16 सारखी हेलिकॉप्टर्सचा भारतानं हवेतच चुराडा केला. 

एअर डिफेन्स सिस्टीमची वैशिष्ट्यं

– S- 400 ही भारताची एअर डिफेन्स सिस्टीम हेच भारतीय सुदर्शन चक्र
– 600 किलोमीटरचं क्षेत्र व्यापते आणि शत्रूचा वेध घेते
– S- 400 जिथे असेल तिथल्या 400 किलोमीटरची सर्वत्र सुरक्षा ठेवते
– शत्रुचं कोणतंही ड्रोन, क्षेपणास्त्र, विमान हवेतच नष्ट करते
– ही सिस्टीम चालत्या वाहनावर तैनात असते
– एकाच वेळी 80 लढाऊ विमानं आणि ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रावर हल्ला केला जाऊ शकतो
– सिस्टीम भारतानं 2018 मध्ये रशियाकडून खरेदी केली

पाकिस्तानचा प्रत्येक डाव आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं उधळवून लावला त्यामुळे शत्रूसाठी कर्दनकाळ ठरलेलं हे सुदर्शन चक्र आपल्यासाठी सुरक्षा कवच ठरलं आहे.  या एअर डिफेन्स सिस्टीमची अचूकता शत्रुला धडकी भरवणारी आहे. कारण पाकिस्ताननं पूर्ण हवाई हल्ले सुरू केले तरी राजस्थानपासून पंजाब आणि काश्मीरपर्यंतच क्षेत्रात कुठलंही क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमान येवो, ते उद्ध्वस्त करणं आपल्याला सहज शक्य आहे. पाकची लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं शेकडो किलोमीटरवरूनच नष्ट केली. यातच या सुदर्शन चक्राच्या यशाचं गमक आहे. 





Source link

पलूसमध्ये झाडावर, भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक आढळला

0
पलूसमध्ये झाडावर, भिंतीवर चढणारा पांढरा बेडूक आढळला



सांगली : झाडावर, भिंतीवर चढू शकणारा पांढरा बेडूक कृष्णाकाठी आमणापूर (ता. पलूस) येथे आढळून आला. अतिवृष्टी होणाऱ्या भागातच बेडकाची ही प्रजाती आढळून येते. मात्र, प्रथमच कृष्णाकाठी याचे दर्शन झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.

‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ असे शास्त्रीय नाव असलेला हा बेडूक दुर्मीळ प्रजातीतील मानला जातो. या बेडकाला ‘झाड बेडूक’ असेही म्हणतात. आमणापूर येथील छायाचित्रकार आनंदा राडे यांना स्टुडिओमध्ये भिंतीवर पांढऱ्या रंगाचा बेडूक आढळला. याबाबत आंबोली येथील वन्यजीव अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली, त्यांनी या बेडकाच्या प्रजातीची अधिक माहिती देताना सांगितले, स्थानिक पातळीवर दुर्मीळ असणारा पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो. जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो. तो नैसर्गिकरीत्या पांढरा असतो. राडे यांनी या बेडकाला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.

क्वचितच आढळून येणारा ‘कॉमन इंडियन ट्री फ्रॉग’ प्रजातीच्या दुर्मीळ बेडकाची प्रथम १८३० मध्ये जॉन अँडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली. दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो. या बेडकाला ‘चुनाम’ या नावानेही ओळखले जाते, तर संस्कृतमध्ये याला ‘चूर्ण’ असे म्हटले जाते.

जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो. बेडकाच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात. ते बेडकाने उडी मारल्यावर एकदम चमकतात.

हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वत:चा बचाव करतात. त्यामुळे असे बेडूक आढळून येणे हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगले असल्याचे द्योतक आहे. कीटक, किडे हे याचे खाद्य असून, हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.



Source link

रात्री घरातून बाहेर पडला तो कायमचाच…. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या….

0
रात्री घरातून बाहेर पडला तो कायमचाच…. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या….



Youth commits suicide by hanging. Incident in Chikhali city बुलढाणा : रात्री घरातून बाहेर पडला तो कायमचाच…. गळफास घेऊन युवकाची आत्महत्या….





Source link

जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचाच वरचष्मा

0
जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचाच वरचष्मा


जळगाव – राजकीय स्पर्धेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडावी लागल्यानंतर जिल्ह्यात सध्या मंत्री गिरीश महाजन यांचाच वरचष्मा आहे. त्यांचे नेतृत्व पक्षात अलिकडे निर्णायक ठरत असून, सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांचा ठसा स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. त्यातही महाजन यांचीच मर्जी चालली असून, ते सांगतील तीच पूर्व दिशा सध्या भाजपमध्ये मानली जात आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. परिणामी, केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा झेंडा मिळूनही खडसे यांचा भाजपमधील प्रवेश बारगळला. दरम्यानच्या काळात महाजन यांच्या हाती जळगावमधील भाजपचे एकहाती नेतृत्व आले. भाजपने त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठे यश संपादित केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर पक्षाला पुन्हा एकदा मजबूत यश मिळवून देण्यासाठी मंत्री महाजन यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा परिषदेसह नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेनेत (एकनाथ शिंदे) युती होणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तत्पूर्वीच महाजन यांनी सावध भूमिका घेत भाजपमध्ये कार्यक्षम आणि जनतेत चांगली प्रतिमा असलेले नवे चेहरे पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी पदाधिकाऱ्यांना आशा आहे.

हेही वाचा
हेही वाचा

जळगावमध्ये भाजपकडून मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जात असताना, मंत्री महाजन यांनी त्यांच्या पक्षातील जिल्ह्याचे मंत्री, खासदार व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, तिन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीवेळी त्यांनी आपल्या पसंतीनुसारच निवड करुन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. भाजपला विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघात मराठा चेहरा देण्यासाठी पूर्व जिल्हाध्यक्षपदी त्यांनी चंद्रकांत बाविस्कर यांची निवड केली. तर जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक सूर्यवंशी यांना संधी दिली. याशिवाय, जळगाव लोकसभा मतदारसंघातील गुर्जर समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली. एकूण चित्र लक्षात घेता लेवा समाजाला भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर डावलले असले, तरी जळगाव महापालिकेवर पुढे भाजपची सत्ता आल्यास लेवा समाजाला महापौर पदावर प्रतिनिधित्व देण्याचे आडाखे आहेत. त्यादृष्टीने गिरीश महाजन यांनी सावध खेळी खेळली आहे. भाजपमध्ये सध्याच्या घडीला असल्याने महाजन सांगतील तेच धोरण आहे.





Source link

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 30 लाखांचा अपहार; माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर गुन्हा

0


सातारा: पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीस लाखांचा अपहार झाल्याची घटना (Patan Market Committee Scam) उघडकीस आली असून या प्रकरणी, माजी सभापती उपसभापतीसह 21 जणांवर या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारळे आणि माणगाव पेट्रोल पंप व्यवहारात अनियमितता असल्याने संबंधितांवर सुमारे 30 लाख रुपयांच्या अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात सचिव हरीश बंडू सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मल्हार पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाजार समिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ताब्यात

दरम्यान, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा अपहार उघडकीस आल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटण तालुक्यातले राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तत्कालीन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या ताब्यात पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती असताना हा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या ही बाजार समिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाटणचे राजकारण तापणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

आमदार सचिन पाटील यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर

फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर दिला आहे. गेल्या 23 वर्षात फलटणला कधीही त्याचा हक्काचे पाणी मिळाले नाही. फक्त माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करणे आणि माझ्यावर टीका करतायत. मला डास, ढेकूण, काळा, नकटा अशी टीका केली. पण एक मच्छर काय करू शकतो हे नाना पाटेकर यांच्या चित्रपटात दाखवले आहे. मी काळा, नकटा असलो तरी शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्व सामन्यातून मला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे हा काळा , नकटा माणूस शेतकऱ्यांच्या शेतात सोने पिकवणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचे पाणी मिळवून देणार आहे. नेहमी व्यक्ती दोष करत राहिला आहे. असं रामराजे यांना आमदार पाटील यांनी नाव न घेता उत्तर दिले आहे.

तलावात जनावर धुवायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने 15 वर्षीय मुलगा बुडाला  

गोंदियाच्या खमारी येथे तलावात जनावर धुवायला गेलेला एक 15 वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विश्वा प्रधान (15) राहणार हलबीटोला असे पाण्यात बुडालेल्या मुलाचे नाव असून प्रशासनाच्या वतीने शोधकार्य सुरू आहे.  विश्वा हा आपल्या घरचे जनावर धुवायला तलावात गेला होता.  दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला आहे. घटनेची माहिती प्रशासनाला मिळाली असून प्रशासनाकडून घटनास्थळी शोध सुरू आहे..

अधिक पाहा..



Source link

रस्त्यावरुन उचलून ज्या अनाथ मुलीला मोठं केलं, तिनेच केली आईची हत्या; दोन प्रियकर घरी बोलावले अन् उशीने…; पोलीसही सुन्न

0
रस्त्यावरुन उचलून ज्या अनाथ मुलीला मोठं केलं, तिनेच केली आईची हत्या; दोन प्रियकर घरी बोलावले अन् उशीने…; पोलीसही सुन्न



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीने तिच्या दोन मित्रांच्या मदतीने तिची दत्तक आई 54 वर्षीय राजलक्ष्मी कर यांना मारण्याचा कट आखला होता. 
 



Source link

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास गती; अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

0
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनास गती; अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

मुंबई: महाराष्ट्रातील कोयना धरण प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या नागरिकांना अजूनही संपूर्ण पुनर्वसन मिळालेले नाही. हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, प्रकल्पग्रस्तांचे प्रस्ताव तातडीने तपासून महिनाअखेरीस विभागीय आयुक्तांकडे सादर करावेत.

जुनच्या पहिल्या पंधरवड्यात धरणग्रस्त संघटनांसोबत बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांना जमीन वाटपाची कार्यवाही पूर्ण केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात 310 आणि सांगली जिल्ह्यात 215 पात्र प्रकल्पग्रस्तांची यादी तयार झाली आहे.

या बैठकीस मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, चैतन्य दळवी, तसेच विविध जिल्ह्यांचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.

कोयना धरणाचा इतिहास:
1956 साली सुरू झालेले कोयना धरणाचे बांधकाम 1963 मध्ये पूर्ण झाले. हे धरण महाराष्ट्राच्या जलविद्युत उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे धरण अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक असून, आजही राज्यासाठी ऊर्जा आणि सिंचनाचा प्रमुख स्त्रोत आहे.

राज्य सरकारने आता पुनर्वसन प्रक्रियेला गती दिली असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Rainfall: पुण्यात २७.४ mm पावसाची नोंद, २० मे पर्यंत यलो अलर्ट

0
Rainfall: पुण्यात २७.४ mm पावसाची नोंद, २० मे पर्यंत यलो अलर्ट


भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) आकडेवारीनुसार, शुक्रवारी शहरात २७.४ मिमी पावसाची नोंद झाली, जी यावर्षी मे महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक पावसाची नोंद आहे.



Source link

देशासाठी आम्ही एकजूट; ऑपरेशन सिंदूरवर परदेशात सुप्रिया सुळेंनी मांडली भारताची भूमिका

0
देशासाठी आम्ही एकजूट; ऑपरेशन सिंदूरवर परदेशात सुप्रिया सुळेंनी मांडली भारताची भूमिका


Supriya Sule: दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी भारत सरकार खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात जाऊन ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यासाठी खासदारांच्या आठ समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मलाही एका समितीत सामील होण्यास सांगण्यात आले आहे. देशाच्या प्रश्नावर आपण सर्व जण एकत्र आहोत, हे स्पष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.



Source link

पाकिस्तानच्या ‘शत्रू’च्या मदतीने सिंधूसहीत ‘या’ 2 नद्यांचं पाणीही अडवणार; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

0
पाकिस्तानच्या ‘शत्रू’च्या मदतीने सिंधूसहीत ‘या’ 2 नद्यांचं पाणीही अडवणार; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन


Shahtoot Dam Project: पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्यासाठी भारत दिवसोंदिवस नवीन नवीन धोरणं राबवत असून आता स्वत: घातलेल्या बंदी आणि निर्बंधांसहीत पाकिस्तानची इतर शेजारच्या राष्ट्रांच्या माध्यमातून कोंडी करण्याचाही भारताचा मानस आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता पाकिस्तानबरोबर वैर असलेल्या अफगाणिस्तानला मदत करुन काट्याने काटा काढण्याचा भारताचा विचार सुरु असून त्यासंदर्भात एक पाऊल भारताने पुढे टाकलं आहे. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने स्थगित केला. आता भारत अफगाणिस्तानातूनही पाकिस्तानची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. 

‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’; मोदींनीही ठणकावलं

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत याबद्दल पुन्हा विचार करण्याची मागणी भारताने नुकतीच फेटाळून लावली. ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनीही पाकिस्तानला ठणकावलेलं असतानाच आता भारताने मित्र देश असलेल्या अफगाणिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानची अधिक प्रमाणात जलकोंडी करण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत.

मोदी सरकारची ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अफगाणिस्तानशी पहिल्यांदाच चर्चा

भारत व अफगाणिस्तानचे उत्तम संबंध असून अफगाणिस्तानमध्ये काबुल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारताने सहकार्य दिले असून, ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होऊ शकतो. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पहिल्यांदाच अफगाणिस्तानशी चर्चा केली आहे.

पाकिस्तानसाठी चिंतेंचा विषय

अफगाणच्या हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवेश करणाऱ्या काबुल नदीवर बांधले जाणारे शाहतूत धरण हा पाकिस्तानसाठी संवेदनशील आणि चिंतेंचा विषय आहे. काबुल नदी हा सिंधू नदी प्रणालीचाच भाग आहे. या नदीमधून पाकिस्तानात जाणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानमधील अनेकांचं दैनंदिन जीवन अवलंबून आहे.

या प्रकल्पालाही करणार मदत?

तालिबान सरकारने  अफगाणिस्तानमधील कुणार नदीवर आणखी एक मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे. हिंदूकुशमध्ये उगम पावणारी कुणार नदी पुढे काबुल नदीला मिळते व पाकिस्तानात प्रवेश करते. तिथे जलविद्युत प्रकल्प झाला तर काबुल नदीच्या आणि पर्यायाने पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्याला फटका बसणार आहे. त्यामुळे आता भारत या प्रकल्पासाठीही काही तांत्रिक आणि आर्थिक मदत देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 





Source link