Saturday, July 11, 2026
Home Blog Page 210

नूतन ‘सीईओ’ आनंद भंडारी यांनी सूत्रे स्वीकारली

0
नूतन ‘सीईओ’ आनंद भंडारी यांनी सूत्रे स्वीकारली


अहिल्यानगरः गडचिरोली ते अमरावती मार्गे अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक आहे. अनेक अधिकारी व विभागांसमवेत काम करताना जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. इथल्या विविध उपक्रम व प्रगतीचा अभिमान राहील. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व सहकारी संस्थांची साथ मिळाली. अशा जिल्ह्याने मला घडवले आणि प्रेम देखील दिले, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने मावळते सीईओ येरेकर यांचा शुभेच्छा सोहळा व नूतन सीईओ आनंद भंडारी यांचा स्वागत सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी येरेकर बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, येरेकर यांचे वडील मुकुंदराव येरेकर, आई नंदाताई येरेकर, पत्नी दीपाली येरेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस (माध्यमिक) व भास्कर पाटील (प्राथमिक) समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे तसेच विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

विविध कर्मचारी संस्था, संघटनांनी येरेकर व भंडारी यांचा सत्कार केला. फुलांच्या पायघड्या व पुष्प वर्षावात तसेच तुतारीच्या निनादात येरेकर व भंडारी यांचे स्वागत करण्यात आले. राहुल शेळके यांनी प्रास्ताविक केले. जयश्री कार्ले, नानासाहेब रोहकले, डॉ. संजय कळमकर, डॉ. दिघे, गायसमुद्रे, दशरथ शिंदे आदींची भाषणे झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

अमरावती जिल्हाधिकारी पदासाठी शुभेच्छा

सेवेच्या कमी कालावधीत उच्चतम असा प्रशासकीय अनुभव आशिष येरेकर यांनी प्राप्त केला. राज्यातील मोजक्या कार्यक्षम, कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमध्ये येरेकर यांचे नाव घेतले जाते. अमरावती जिल्हाधिकारीपदी देखील सर्वोत्कृष्ट काम करून राज्यात निश्चितच ते बहुमान प्राप्त करतील, अशा शुभेच्छा नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिल्या.





Source link

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, वीज पडून तरुणाचा मृत्यू, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

0
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, वीज पडून तरुणाचा मृत्यू, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत



Raigad district rain updates youth dies struck by lightning normal life disrupted due to heavy rainfall Raigad Rain Updates: रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, वीज पडून तरुणाचा मृत्यू, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत





Source link

‘कोड ब्ल्यू’मुळे हजारो जणांना जीवदान! ससून रुग्णालयात होताहेत रोज ६ जणांवर आपत्कालीन उपचार

0
‘कोड ब्ल्यू’मुळे हजारो जणांना जीवदान! ससून रुग्णालयात होताहेत रोज ६ जणांवर आपत्कालीन उपचार



in pune Code Blue saves thousands of lives in Sassoon Hospital ‘कोड ब्ल्यू’मुळे हजारो जणांना जीवदान! ससून रुग्णालयात होताहेत रोज ६ जणांवर आपत्कालीन उपचार





Source link

अमिताभ बच्चन यांनी रेखाला म्हटलेले शेवटचे शब्द

0
अमिताभ बच्चन यांनी रेखाला म्हटलेले शेवटचे शब्द



amitabh bachchan last words to rekha : amitabh bachchan said dont ask me anything I am not going to say word to rekha : rekha amitabh bachchan breakup: अमिताभ बच्चन यांनी रेखाला म्हटलेले शेवटचे शब्द





Source link

नोएम स्किबर‎ The New York Times‎: एआय आल्याने टेक कंपन्यांच्या‎टीम छोट्या झाल्या, लक्ष्य वाढले‎, ॲमेझाॅन, गुगलची स्थिती ‎

0
नोएम स्किबर‎ The New York Times‎:  एआय आल्याने टेक कंपन्यांच्या‎टीम छोट्या झाल्या, लक्ष्य वाढले‎, ॲमेझाॅन, गुगलची स्थिती ‎


  • Marathi News
  • Opinion
  • With The Advent Of AI, Tech Companies’ Teams Have Become Smaller, Targets Have Increased, The Status Of Amazon, Google ‎

43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बदलाच्या प्रत्येक युगात तंत्रज्ञानाबाबत शंका‎व्यक्त केल्या गेल्या आहेत. कामगार इतिहासकार‎जेसन रेस्निकॉफ यांच्या मते, कामगारांनी कामाचा‎वेग, ताण वाढला व दर्जा कमी झाल्याची तक्रार‎केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतही‎असेच काहीसे घडत आहे. विशेषतः कोडिंगमध्ये‎असलेल्या लोकांना हे जाणवते. कामगार दलात‎एआय वेगाने पसरत आहे. अनेक कामगार‎बेरोजगारी वाढेल, अशी चिंता व्यक्त करतात. तर‎सॉफ्टवेअर अभियंत्यांना वाटते की, त्यांच्या‎कामाची गुणवत्ता घसरली आहे. जास्त विचार‎करायला जागा उरलेली नाही. तथापि, कामाचा‎वेग निश्चितच वाढला आहे.‎

मायक्रोसॉफ्ट व तीन विद्यापीठांतील‎संशोधकांच्या एका नवीन संशोधनपत्रात‎आढळले की, प्रोग्रामरनी एआय कोडिंग असिस्टंट‎कोपायलट वापरून २५ टक्के जास्त काम केले.‎अॅमेझॉनने जनरेटिव्ह एआयमध्ये मोठी गुंतवणूक‎केली. तिथली कोडिंग संस्कृती वेगाने बदलत आहे.‎कंपनीचे प्रमुख अँडी जॅसी यांनी शेअरहोल्डर्सना‎लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जनरेटिव्ह‎एआयमधून कंपन्यांना चांगले परिणाम मिळत‎आहेत. तीन अॅमेझॉन अभियंत्यांनी सांगितले की,‎व्यवस्थापक गेल्या एक वर्षापेक्षा जास्त‎काळापासून एआयचा वापर वाढवण्यासाठी‎त्यांच्यावर दबाव आणत होते. कंपनीने आपले‎लक्ष्य वाढवले ​​आहे. वेळेवर काम पूर्ण करण्याचा‎खूप दबाव असतो. एका अभियंत्याने सांगितले‎की, त्यांची टीम गेल्या वर्षीपेक्षा निम्मी आहे, पण‎एआयने तेच उत्पादन देण्याची अपेक्षा आहे.‎

शॉपिफायने कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोत म्हटले‎आहे की, एआयचा वापर आता सर्वसामान्य‎प्रमाण असेल. अ‍ॅमेझॉन व इतर कंपन्यांतील‎प्रमुखांचा असा विश्वास आहे की, एआय‎कर्मचाऱ्यांना कंटाळवाण्या कामापासून मुक्त‎करण्यास मदत करू शकते. त्यांना अधिक काम‎करता येईल, ज्यामुळे त्यांची आवड वाढेल.‎ © The New York Times‎



Source link

The New York Times‎: टॉम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसिबल” कंटाळवाणा,‎आता त्याने स्टंट चित्रपट करणे थांबवायला हवे‎, 62 वर्षीय क्रूझमध्ये स्टॅमिना भरपूर, पण वाढते वय हे आव्हान‎

0
The New York Times‎:  टॉम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसिबल” कंटाळवाणा,‎आता त्याने स्टंट चित्रपट करणे थांबवायला हवे‎, 62 वर्षीय क्रूझमध्ये स्टॅमिना भरपूर, पण वाढते वय हे आव्हान‎


  • Marathi News
  • Opinion
  • Tom Cruise’s ‘Mission Impossible’ Is Boring, He Should Stop Doing Stunt Films Now, 62 year old Cruise Has A Lot Of Stamina, But Growing Old Is A Challenge

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझचामिशन इम्पॉसिबल‎- द फायनल रेकनिंग हा नवीन चित्रपट पाहणे खूप‎थकवणारे आहे. त्याची निर्मितीही कठीण झाले‎असावे. क्रूझ स्वतः स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.‎तरीही त्याला इतका जोर द्यावा लागला नसता तर‎ते क्रूझ व प्रेक्षकांसाठी चांगले झाले असते.

६२‎वर्षीय क्रूझच्या सहनशक्तीचे कौतुक केले पाहिजे.‎आपण क्रूझला एक नाही, तर दोन विमानांवर‎लटकताना आणि परत येताना पाहतो. चित्रपटात तो‎लंडनच्या रस्त्यांवर फिरताना, मर्दानी पद्धतीने हात‎हलवताना दिसतो. पण, क्रूझने आता चित्रपटांत‎स्टंट करणे थांबवावे. क्रूझ स्वतःच एक जाॅनर‎आहे.

विमानाच्या पंखांतून लटकण्याबद्दल एका‎मासिकाशी बोलताना तो म्हणाल की, ते कृत्य‎करताना श्वास घेणेही कठीण होते. तुम्ही खूप‎थकता. अनेक वेळा माझ्यात विमानाच्या पंखातून‎कॉकपिटपर्यंत जाण्याचीही ताकद नव्हती. क्रूझने‎खऱ्या जेट फायटरमध्ये उडण्याचा करिष्मा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎दाखवला आहे. त्याच्या आकर्षणाच्या बळावर‎२०२२ चा चित्रपट – टॉप गन : मॅव्हरिकने जगभरात‎१२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.‎महामारीनंतर मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये‎परतले. टॉम क्रूझ उड्या मारत नसेल तर तो एक‎उत्तम अभिनेता वाटतो. त्याच्याकडे प्रतिभा व‎आकर्षण आहे. त्याने बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ‎जुलै, अ फ्यू गुडमेन, जेरी मॅग्यार आणि मॅग्नोलिया‎अशा चित्रपटांत स्वतःला एक चांगला अभिनेता‎म्हणून दाखवले आहे.

हे सर्व चित्रपट विसाव्या‎शतकात प्रदर्शित झाले. त्याने कारकीर्दीच्या‎सुरुवातीला छोट्या भूमिका केल्या. रिस्की‎बिझनेस या चित्रपटाने क्रूझला स्टार बनवले. २०१७‎मधील ‘अमेरिकन मेड’ हा चित्रपट कदाचित‎शेवटचा चित्रपट होता, ज्यात त्याला पूर्णपणे स्टंट‎व पुरुषी पोश्चरिंगवर अवलंबून राहावे लागले‎नाही. टॉम क्रूझ जसजसा मोठा होत जाईल‎तसतसा त्याला ब्रेक घ्यावा लागू शकतो. त्याने‎शरीरावर जास्त ताण देणे टाळावे. त्याचे स्टंट‎धोकादायक असतात. त्याने असे अ‍ॅक्शन चित्रपट‎करावेत, ज्यात जास्त स्टंट नसतील.

क्रूझचा पुढचा‎चित्रपट हा मेक्सिकन दिग्दर्शक अलेजांद्रो इनारितु‎यांचा एक शीर्षक नसलेला प्रकल्प आहे. कोणतेही‎स्टंट होणार नाहीत, असे इनारितु म्हणतात. तिसऱ्या‎‘टॉप गन’ चित्रपटावर प्राथमिक काम सुरू‎असल्याची चर्चा आहे. याचा अर्थ असा की, जेट‎विमाने व जी-फोर्सेसचे पराक्रम पुन्हा दिसतील.



Source link

मिन्हाज मर्चट यांचा कॉलम: सोन्याचा अधिक उत्पादक वापर‎कसा करता येईल अर्थव्यवस्थेत?‎, भारतीयांना सोन्याचे खूप आकर्षण आहे‎

0
मिन्हाज मर्चट यांचा कॉलम:  सोन्याचा अधिक उत्पादक वापर‎कसा करता येईल अर्थव्यवस्थेत?‎, भारतीयांना सोन्याचे खूप आकर्षण आहे‎


  • Marathi News
  • Opinion
  • Minhaj Merchant’s Column, How Can Gold Be Used More Productively In The Economy?, Indians Are Very Attracted To Gold

5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎आज भारतीय कुटुंबांकडे जगातील दहा सर्वात मोठ्या‎मध्यवर्ती बँकांच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त सोने‎आहे – अमेरिका, जर्मनी, रशिया, फ्रान्स, चीन, इटली,‎स्वित्झर्लंड, जपान, तुर्की व खुद्द भारत! भारतीय‎घरांमध्ये सुमारे २५,००० टन सोने साठवलेले आहे. हे‎अमेरिकन सरकारच्या सोन्याच्या साठ्याच्या (८,१३३‎टन) तिप्पट व रिझर्व्ह बँकेच्या (८७९ टन) सोन्याच्या‎साठ्याच्या जवळजवळ ३० पट आहे.‎

आजच्या भावानुसार भारतात देशांतर्गत सोन्याची‎किंमत किती असेल? सोन्याचे भाव बऱ्याच काळापासून‎वाढत आहेत, परंतु गेल्या काही वर्षांत भू-राजकीय‎अस्थिरतेमुळे त्यात वाढ झाली आहे. सध्याच्या दर तोळा‎(१० ग्रॅम) सुमारे १ लाख रुपये (१,२०० डाॅलर) या‎भावानुसार भारतीय घरांमध्ये साठवलेल्या २५,००० टन‎सोन्याचे मूल्य सुमारे ३ ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. हे‎भारताच्या २०२५ च्या ४.१९ ट्रिलियन डॉलर्सच्या‎जीडीपीच्या सुमारे ७५ टक्के आहे.‎

असा अंदाज आहे की, यापैकी एकट्या भारतीय ‎‎महिलांकडे २४,००० टनांपेक्षा जास्त सोने आहे. हे‎अमेरिका, जर्मनी (३,३०० टन), इटली (२,४५० टन), ‎‎फ्रान्स (२,४०० टन) आणि रशिया (१,९०० टन) या ‎‎देशांच्या मध्यवर्ती बँकांकडे असलेल्या सोन्याच्या ‎‎साठ्यापेक्षा जास्त आहे. ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपच्या ‎‎अहवालानुसार, जगातील एकूण सोन्यापैकी ११ टक्के‎सोने भारतीय महिलांकडे आहे.‎

भारतीयांच्या सोन्यावरील या अफाट प्रेमामागील‎कारण काय आहे? ही एक सुरक्षित आणि स्थिर‎गुंतवणूक मानली जाते. गेल्या २५ वर्षांतच सोन्याचा भाव‎४,००० रु. प्रति १० ग्रॅमवरून सुमारे १,००,००० रु. प्रति १०‎ग्रॅम इतका वाढला – २५ वर्षांत २५ पट वाढ. चक्रवाढ‎आधारावर सोन्याचे मूल्य दरवर्षी सुमारे १४ टक्क्यांनी‎वाढले आहे आणि ते दर पाच वर्षांनी दुप्पट होत आहे.‎त्या तुलनेत २००० ते २०२५ दरम्यान बीएसई सेन्सेक्स‎६,००० वरून ८०,००० पेक्षा जास्त अंकांपर्यंत वाढला‎आहे – २५ वर्षांत जवळजवळ १४ पट वाढ. हे १२ टक्के‎चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) दर्शवते.‎

सोने दीर्घकाळात इक्विटीपेक्षा चांगले कामगिरी करते.‎शेअरच्या तुलनेत सोन्याचे भाव कमी अस्थिर असतात.‎जगातील सर्वात रूढीवादी गुंतवणूकदारांपैकी एक‎असलेल्या भारतीय महिलांना हे चांगलेच माहिती आहे.‎सोन्यामुळे भारतीय कुटुंबांना लग्नासाठी पैसे उभारण्यास‎आणि दिवाळखोरी टाळण्यास मदत झाली आहे. पण,‎आर्थिक सुरक्षेसाठी ठेवलेल्या मृत मालमत्तेपेक्षा‎भारताच्या अर्थव्यवस्थेत सोन्याचा वापर अधिक‎उत्पादकपणे कसा करता येईल? आरबीआयच्या सोने‎गुंतवणूक योजनेला मर्यादित यश मिळाले आहे. सोने‎साठवण्याला पर्याय प्रदान करणे हे सॉवरिन गोल्ड बाँडचे‎उद्दिष्ट आहे. आरबीआयने म्हटल्याप्रमाणे सॉवरेन गोल्ड‎बाँड हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे साठवणुकीचा‎धोका व खर्च कमी होतो. गुंतवणूकदारांना परिपक्वतेच्या‎वेळी सोन्याचे बाजार मूल्य व नियतकालिक व्याज‎याची खात्री दिली जाते. सोन्याचा दागिने म्हणून वापर‎करण्याच्या बाबतीतही सॉवरिन गोल्ड बाँड समस्यांपासून‎मुक्त आहे. परंतु, भारतीयांत भौतिक सोन्याचे आकर्षण‎इतके तीव्र आहे की, सॉवरिन गोल्ड बाँड पूर्णपणे‎लोकप्रिय झालेले नाहीत.‎

२०२४-२५ मध्ये भारताने ५८.०१ अब्ज डॉलर्सचे सोने‎आयात केले. तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने‎आयात शुल्क १५ वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने‎२०२३-२४ मध्ये सोन्याची आयात २७ टक्क्यांनी वाढली.‎२०२४-२५ मध्ये भारताची एकूण व्यापारी तूट ९४.२६‎​​अब्जडा ॅलर होती. म्हणूनच २०२४-२५ मध्ये भारताची‎५८.०१ अब्ज डॉलर्सची सोन्याची आयात ही भारताच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎व्यापार तुटीचा एक प्रमुख घटक आहे. तथापि,‎भारताच्या आयात बिलातील सर्वात मोठा घटक कच्चे‎तेल आहे, ज्याने २०२४-२५ मध्ये १३३ अब्ज डॉलर्सचे‎योगदान दिले.‎

सोन्याची आयात ही कच्च्या तेलाच्या आयातीपैकी‎निम्मी आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे असले‎पाहिजे. परंतु, दरवर्षी अधिकाधिक सोने खरेदी‎करण्याची भारतीय कुटुंबांची अतृप्त भूक भारताची‎व्यापारी तूट वाढवत आहे. सोन्याकडे असलेले आकर्षण‎केवळ आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक आणि‎भावनिकही आहे. भारतीय महिलांकडे ३ ट्रिलियन‎डॉलर्स किमतीचे २४,००० टनांपेक्षा जास्त सोने‎असल्याने आणि गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी ५८ अब्ज‎डॉलर्स किमतीचे अंदाजे ६०० टन सोने खरेदी केले‎असल्याने सोन्याच्या किमती तेजीत राहण्याची शक्यता‎आहे.‎



Source link

आरथी जेरथ यांचा कॉलम: चुकीची वक्तव्ये जगभरात‎आपले नॅरेटिव्ह बिघडवतात‎, आपल्याला मोजक्या शब्दांत बोलणारे हवेत‎

0
आरथी जेरथ यांचा कॉलम:  चुकीची वक्तव्ये जगभरात‎आपले नॅरेटिव्ह बिघडवतात‎, आपल्याला मोजक्या शब्दांत बोलणारे हवेत‎


  • Marathi News
  • Opinion
  • False Statements Spoil Our Narrative Around The World, We Need Those Who Speak In Fewer Words

7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या हत्याकांडाचे‎खोलवरचे धर्मांध स्वरूप भारताविरुद्ध पाकिस्तानच्या‎छुप्या युद्धाच्या एका नवीन टप्प्याचे संकेत देणारे होते.‎

पूर्वी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले सुरक्षा‎दलांना व लष्कराच्या छावण्यांना लक्ष्य करत असत,‎परंतु या वेळी दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य केले.‎तेही काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा बदलता चेहरा‎दर्शवणाऱ्या पर्यटकांना आणि धर्माच्या आधारावर.‎पाकिस्तानच्या रणनीतीतील बदलाचे पहिले संकेत‎स्वतः लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले, तेव्हा त्यांनी‎पहलगाम हत्याकांडापूर्वी व नंतर द्विराष्ट्र सिद्धांत मांडून‎म्हटले की हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, कारण‎ते जीवनाच्या प्रत्येक पैलूत वेगळे आहेत. पहलगाम‎हत्याकांडाने घेतलेले सांप्रदायिक वळण मुनीरच्या‎टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवरही पाहिले पाहिजे.‎अलीकडील वर्षां, कोणत्याही पाकिस्तानी‎लष्करप्रमुखाने काश्मीरवरील पाकिस्तानच्या दाव्यांचे ‎‎समर्थन करण्यासाठी द्विराष्ट्रीय सिद्धांताचा आधार‎घेतलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदी ‎‎सरकारने पाकिस्तानसाठी नवी लाल रेषा ओढली आहे. ‎‎भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध हे ‘न्यू नाॅन्मल‎काम करते का हे पाहणे बाकी आहे. भूतकाळातील ‎‎अनुभवांवरून दिसून येते की, पाकिस्तान प्रत्येक वेळी‎नव्या जोमाने प्रत्युत्तर देतो. चिंताजनक बाब म्हणजे‎मुनीरची मानसिकता आपल्यासमोर नवीन आव्हाने‎निर्माण करते. त्यांच्या योजना काय आहेत हे येणारा‎काळच सांगेल, परंतु हेसुद्धा शक्य आहे की, ते त्यांचे‎देशांतर्गत अपयश लपवण्यासाठी या छुप्या युद्धाची‎व्याप्ती वाढवत आहेत.‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून भविष्यात‎कोणताही हल्ला झाल्यास त्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर‎देण्याचा इशारा दिला, पण त्याच वेळी आपल्याला‎धारणांची लढाईही लढावी लागते. नॅरेटिव्ह मजबूत‎ठेवण्यासाठी देशात जातीय तणाव कमी करणे व‎सामाजिक संतुलन राखणे आपल्यासाठी अत्यावश्यक‎आहे. कोणालाही – विशेषतः मुनीरला – आपल्यासमोर‎द्विराष्ट्र सिद्धांताची बढाई मारण्याची संधी देऊ नये.‎पहलगाममधील दहशतवादावर सरकारची प्रतिक्रिया‎स्पष्ट व तीक्ष्ण होती. ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया‎ब्रीफिंगचे नेतृत्व करण्यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम‎मिस्री यांच्यासह दोन वेगवेगळ्या समुदायांतील महिला‎लष्करी अधिकाऱ्यांना निवडून त्यांनी आपल्या‎बहुलवादाचे प्रदर्शन केले. भारताकडून ही एक प्रभावी‎भूमिका होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबाबत‎भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात पाठवलेल्या‎सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांद्वारे केंद्र सरकारने‎बहुलवादाचा संदेश दिला. या शिष्टमंडळात एक‎मुस्लिम नेता व एक शीख चेहरा आहे. ख्रिश्चन समुदाय‎व ईशान्येकडील प्रतिनिधीही आहेत. दुर्दैवाने‎भाजपमधील काही लोकांना सरकारच्या संदेशाचे महत्त्व‎पूर्णपणे समजलेले नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वस्त‎युक्त्या वापरून त्यांनी स्वतःच्या सरकारला लाज‎आणली आहे.‎

मध्य प्रदेशातील भाजपचे राज्यमंत्री विजय शाह यांनी‎कर्नल कुरेशी यांच्याविरुद्ध जातीयवादी टिप्पणी करताना‎अपशब्द वापरले. काही दिवसांनी हरियाणा महिला‎आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी अशोका‎विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद‎यांच्याविरुद्ध एका साध्या सोशल मीडिया पोस्टसाठी‎मोहीम सुरू केली, त्यांची मागणी जमिनीवर वास्तव‎आहे. सरकारने १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रतिनिधींची संपूर्ण यादी जाहीर केली आणि दुसऱ्याच‎दिवशी हरियाणा पोलिसांनी महमूदाबादला अटक केली.‎

अशा घटना जगात आपले कथन बिघडवतात. हा‎कठीण काळ आहे व संतुलित प्रतिसादाची आवश्यकता‎आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष आता युद्धभूमीपासून‎परस्पर-नॅरेटिव्ह, कुशल राजनयिकता व जनसंपर्क‎सरावांच्या सूक्ष्म क्षेत्रात गेला आहे. अशा परिस्थितीत‎विजय शाह व रेणू भाटियांसारखे लोक आपल्याला‎न्याय देत नाहीत. आपल्याला सावधगिरीने बोलू‎शकतील व भारताचा दृष्टिकोन जगासमोर चांगल्या‎पद्धतीने मांडू शकतील अशा लोकांची गरज आहे.‎पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या‎मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एनडीए खासदारांना या वेळी‎अनावश्यक व चिथावणीखोर विधाने करू नका, असा‎इशारा दिला. हा संदेश जबाबदार लोकांपर्यंत पोहोचेल,‎अशी आशा करूया.‎



Source link

पुण्यातील कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
पुण्यातील कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू



पुणे : कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. राहुल श्रीकांत जोशी (वय ४९, रा. कर्वेनगर, एसबीआय बँकेसमोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जोशी हे सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दुचाकीवरून कर्वेनगरमधील समर्थ पथ परिसरातून घरी निघाले होते. जोशी हे खासगी नोकरी करत होते.

अलंकार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर झाडाची फांदी दुचाकीस्वार जोशी यांच्या अंगावर कोसळली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यात पडलेल्या फांद्या हटवून जवानांनी रस्ता वाहतुकीस माेकळा केला. अपघातानंतर कर्वेनगर परिसरातील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

जीवघेण्या फांद्यांचे बळी

दोन वर्षांपूर्वी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ झाडाची फांदी पडून अभिजीत गुंड या तरुणाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी बिबवेवाडी भागात झाडाची फांदी काेसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.



Source link

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्

0
पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्



पुणे : अवघ्या दोन दिवसांत केवळ मुंबई-पुणे अशा मोसमी वाऱ्यांच्या अतिवेगवान प्रवासामुळे शास्त्रज्ञांनाही अचंबित केले आहे. पावसाची ही वाटचाल अशक्य नसली तरी अत्यंत दुर्मीळ असल्याचे हवामान संशोधकांचे म्हणणे आहे.

मोसमी वाऱ्यांच्या अभ्यासातून गेल्या काही वर्षांमध्ये ठोकताळे तयार झाले. पाऊस केरळमध्ये १ जूनला दाखल होतो, ८ जुलैपर्यंत देश व्यापतो, १७ सप्टेंबरच्या सुमारास माघारी फिरतो आणि १५ ऑक्टोबरच्या सुमारास निघून जातो, हे वेळापत्रक आपण आखून घेतले आहे. दरवर्षी यात काही दिवसांचा फरक पडतो. यंदा मात्र मोसमी वाऱ्यांची अचंबित करणारी आगेकूच झाली आहे.

केरळमध्ये २४ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी अवघ्या दोन दिवसांत मुंबई-पुण्यात शिरकाव केला. याबाबत भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले, की गेल्या काही वर्षांत पावसाचे निकष बदलले आहेत. पूर्वी उपग्रह नसताना अंदाज वर्तवण्यास मर्यादा होत्या. आता अंदाज वर्तवण्याची क्षमता वाढली आहे. गेली आठ वर्षे पाऊस सर्वसाधारण होता. त्यामुळे यंदा आलेला पाऊस लवकर वाटतो आहे. पाऊस लवकर आला म्हणजे फार काही वेगळे घडले असे नाही.

या पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत, अशी पुष्टी त्यांनी जोडली. तर ही घटना अतिशय दुर्मीळ असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनीही मान्य केले. काही दिवसांपूर्वी कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते क्षेत्र उत्तरेकडे सरकले. सध्या ही प्रणाली मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर सक्रिय आहे. त्यामुळे इतक्या जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. ही प्रणाली समुद्रातून पश्चिमेकडे दूर गेली असती, तर पावसाला विलंब झाला असता, अशी माहिती त्यांनी दिली.

केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात येण्यासाठी आठ-दहा दिवस लागतात, हे आपण ठरवले आहे. मात्र, निसर्गाची अनेक रहस्ये अजून उलगडलेली नाहीत. निसर्ग माणसांच्या नियमांनी चालत नाही. म्हणूनच दरवर्षी वेगळी करामत दिसून येते. पाऊस लवकरही येऊ शकतो, हे निसर्गाने दाखवून दिले. अंदाज वर्तवण्यात आव्हाने आहेत आणि ती असलीच पाहिजेत, शास्त्रज्ञ अचंबित झाले पाहिजेत. त्यातूनच नवे काही शिकता येईल.– डॉ. रंजन केळकर, माजी महासंचालक, आयएमडी



Source link