


मुंबई : मुंबईत यंदा पावसाने सर्वसामान्य हवामान पद्धतींच्या अनुमानांना छेद देत मे महिन्यातच जोरदार हजेरी लावली. मुंबईत १ ते २७ मे या कालावधीत तब्बल ६००.७ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे.सामान्यत: जूनमध्ये मोसमी पाऊस दाखल होतो आणि पावसाला सुरुवात होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. यानुसार सुरुवातीपासूनच मुंबईत हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. काही वेळा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.
मोसमी पाऊस मुंबईत दाखल होण्याअगोदर पावसाने जोर धरला होता. दरम्यान, १ ते २६ मे रोजी सकाळी ८ पर्यंत २९४.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. २६ मे सकाळी ८ पासून ते २७ मे सकाळी ८ पर्यंत म्हणजेच २४ तासांत हवामान विभागाच्या दोनही केंद्रांवर मिळून ३०६.१ मिमी पावसाची नोंद झाली. अशाप्रकारे १ ते २७ मे दरम्यान मुंबईत एकूण ६००.१ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत जून महिन्यात सरासरी ५०० मिमीच्या आसपास पाऊस अपेक्षित असतो. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सामान्यत: मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो. यंदा मात्र मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि सोमवारी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला. साधारण १५ दिवस अगोदरच मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाला. दरम्यान, मे महिन्यात पडलेल्या पावसाने जूनमधील सरासरी ओलांडली आहे. आता जूनमध्ये किती पडेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत सोमवारी मागील दहा वर्षांतील कमी कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे २६.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. यापूर्वी १८ मे २०२१ रोजी कुलाबा येथे २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे २६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.
मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच पावसाचा जोर ओसरला. दिवसभर काही भागात हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी सायंकाळी ५.३० पर्यंत १६.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १.२ मिमी पावसाची नोंद झाली.


ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील ६७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पदोन्नती दिली असून वरिष्ठ लिपिक, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) आणि सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिकेत मागील आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. त्याचा परिणाम नागरी सुविधा पुरविण्यावर होत होता. दरम्यान, पालिकेमार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद मिळाव्यात आणि कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील ६७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पदोन्नती दिली आहे. त्यात वरिष्ठ लिपिक या पदावर ४६, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय आणि न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता. मात्र काही पदोन्नत्यांबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करणेबाबत विशेष मोहिम घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशामुळे पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा झाला. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पदोन्नतीचे आदेश दिले असून लवकरच त्यांची पदस्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर आगामी काळामध्ये उर्वरित रिक्त पदांवर देखील पदोन्नतीबाबत निर्णय घेवून तसे आदेश पारित करणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Delhi-Mumbai Expressway Video: मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका कथित भाजप नेत्याचा उघडपणे सेक्स करतानाचा व्हिडिओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आहे. विकृती वाटले असा प्रकार या व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तींनी केलाय. महामार्गावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे रात्रीच्या काळोखातील हे कृत्य समोर आलंय. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. व्हिडीओत दिसणारा व्यक्ती हा राजकीय नेता मनोहरलाल धाकड असल्याचे सांगण्यात आलं. दरम्यान मनोहरलालसोबत दिसणारी ती महिला कोण होती? तिचे आणि मनोहरलालचे काय संबंध होते? असं कृत्य करण्यासाठी तिच्यावर कोणाचा दबाव होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. दरम्यान महिलेबद्दल काँग्रेस नेत्याने मोठा दावा केलाय.
मनोहर लाल धाकड आणि संबंधित महिलेचा दिल्ली-मुंबई हायवेवर अश्लिल कृत्य करतानाचा व्हिडीओ 22 मे रोजी व्हायरल झाला. यानंतर हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आले. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ 13 मे चा आहे. ब्लॅकमेलिंगमुळे हा व्हिडीओ इतक्या दिवसांनी समोर आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय. यानंतर एनएचएआयने 3 कर्मचाऱ्यांनाही निलंबित केलंय. गरज पडल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. माजी भाजप नेता मनोहर लाल धाकडच्या अटकेनंतर महिलेचा शोध घेतला जातोय. दुसरीकडे मनोहरलाल धाकडला सोमवारी सायंकाळी जामीन मिळाला. पण पोलिसांना अद्याप महिलेला अटक करता आलेली नाही.
व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि तिच्या बदलीबाबत ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती, असा दावा एका काँग्रेस नेत्याने केलाय. संबंधित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. आरोपी नेत्याची पत्नी जिल्हा पंचायतीची सदस्य आहे, ही माहिती खरी असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलाय. सरकारी शाळादेखील जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत येतात. त्यामुळे नेत्याने संबंधित शिक्षिकेला तिच्या नोकरीबाबत बदलीची किंवा राजकीय प्रलोभनाची भीती दिली असावी. त्यामुळे हे प्रकरण बलात्कारापर्यंत जाऊ शकते, त्यामुळे पोलिस तपास निष्पक्ष असावा, अशी मागणीही त्यांनी केलीय.
मंदसौरच्या भानपुरा पोलिसांनी मनोहरलाल आणि त्याच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य निंदनीय आहे. महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची ओळख पटलीय. ती मनोहरलालची जुनी मैत्रिण असल्याची माहिती डीआयजी मनोज सिंह यांनी दिली. पोलीस पथक महिलेचा शोध घेत असून लवकरच त्या महिलेलाही अटक केली जाईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.
व्हिडिओमध्ये दिसणारा नेता मनोहरलाल धाकडला रविवारी पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत दिसणाऱ्या महिलेचाही शोध घेतला जातोय. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेतला जातोय. महिलेची ओळख पटली असल्याचा दावा पोलिसानी केलाय. आहे.
दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवर त्या रात्री मनोहर धाकडने शारीरिक संबंध ठेवले आणि सर्व हद्द पार केली. संबध बनवल्यानंतर मनोहर धाकडने महिलेसोबत एक्सप्रेसवेवर डान्सदेखील केला. दोघांचे अश्लील नृत्य तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तसेच या फुटेजच्या आधारे धाकडसोबत ब्लॅकमेलिंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. मंदसौर पोलिसांनी धाकडसा अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली. एक्सप्रेसवेवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डनुसार हा व्हिडीओ 13 मे 2025 च्या रात्रीचा आहे. पहिला व्हिडीओ 8 वाजून 22 ते 8 वाजून 28 मिनिटांपर्यंतचा आहे. या वेळेत दोघेही कारमधून बाहेर येऊन संबंध बनवताना दिसताय. कोणती गाडी शेजारुन गेली की दोघे कारमध्ये जाताना दिसतात. मग रस्ता मोकळा दिसला की पुन्हा संबंध बनवताना दिसतात. दुसरा व्हिडीओदेखील त्याच रात्रीचा आहे. 8.28 मिनिटे झाली असता दोघेही बाहेर येऊन हायवेवर फिरतात. या व्हिडीओत धाकडची महिला मैत्रिण नग्न अवस्थेत दिसतेय. दोघेही काही अंतरावर जातात आणि मग हात पकडून नाचू लागतात. यानंतर पुन्हा कारमध्ये जाऊन बसतात. रहदारी असलेल्या या हायवेवर दोघांनी अश्लील नृत्य केल्याचे समोर आल्यानंतर सगळीकडून संताप व्यक्त होतोय.


‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी एक मोठं अपडेट समोर आलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी ४’ रद्द करण्यात आलेला नाही, असं म्हटलं जात आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या चौथ्या सीझनचा प्रीमियर जिओ हॉटस्टारवर होणार आहे. इतकंच नाही तर शो सुरू होण्याची संभाव्य तारीख आणि होस्टचं नावही समोर आलं आहे.

उच्च न्यायव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी एक निर्णायक पाऊल उचलताना, भारताचे सरन्यायाधीश (CJI) भूषण आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी पहिल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या, ज्यात सर्वोच्च न्यायालयात तीन पदोन्नती, पाच उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्त्या, चार विद्यमान उच्च न्यायालयांच्या प्रमुखांची बदली आणि देशभरातील २२ उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्या यांचा समावेश होता.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे की, भारत कोणत्याही चिथावणीला चोख प्रत्युत्तर देईल. भारताचा शांततेवर ठाम विश्वास असून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर नुकतेच करण्यात आलेले हल्ले हे निव्वळ सूडबुद्धीने करण्यात आले होते, असे थरूर यांनी गयाना येथील राजनैतिक व्यासपीठावर स्पष्ट केले. ते म्हणाले की, भारताला युद्ध नको आहे.
