Satara Rain Update: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
Source link
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
बिग बॉस १९ मध्ये येत आहे खतरों के खिलाडीचा ‘हा’ दबंग विजेता, स्पर्धकांना देईल कडक टक्कर

बिग बॉस १९ च्या स्पर्धकांच्या यादीत डिनो जेम्स आणि सुंडस मौफकीर व्यतिरिक्त ममता कुलकर्णी, मुनमुन दत्ता, अपूर्व मखीजा, राज कुंद्रा, राम कपूर, गौतमी कपूर, मुन बॅनर्जी, शशांक व्यास, अरहान अन्सारी, डेझी शाह, खुशी दुबे, नील मोटवानी, शरद मल्होत्रा यांची नावे समोर आली आहेत. हा रिअॅलिटी शो जुलै २०२५ पासून प्रसारित होणार आहे.
युवकांच्या सामाजिक सहभागातून गणेश मंडळाला स्टेज भेट — रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम!

फलटण (प्रतिनिधी) – फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक अनोखी भेट देण्यात आली. युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांच्या पुढाकाराने रविवार पेठ येथील एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह माजी नगरसेवक सनी दादा अहिवळे, मंडळाचे अध्यक्ष शामराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते हरीश (आप्पा) काकडे, युवा नेतृत्व गणेश दादा बिराडे, रोहित भैय्या माने, आशय अहिवळे, सिद्धार्थ काकडे बापू, विकी काकडे (SK), उद्योजक दयानंद पडकर, शिवा अहिवळे, सिद्धात (माँटी) मोरे, विशाल गुंजाळ, तेजस भोसले, मुकुल अहिवळे, रवी मोरे, आदित्य (बंटी) साबळे, संतोष (दादा) कांबळे, बाबू जाधव, बापू लोंढे, रोहन लोंढे, कमलेश कांबळे, संदीप तांदळे, ओम तांदळे, अमित तांदळे, गौरव जाधव, कुणाल जाधव, निलेश जाधव, अजिंक्य जाधव, मिलिंद गायकवाड, विजय जाधव, शिना ऋषिकेश पवार, तेजस गुंजाळ, सुनील धोत्रे, संकेत अलगुडे, विकी संनके, विनोद मोहिते, रोहिदास नलवडे, सिद्धार्थ जाधव, राजू पवार दाजी, अभी गायकवाड, विकी जाधव, मनोज माने, साजन जाधव, चंद्रकांत जाधव, विशाल शिंदे, महेश जाधव, तुषार कोकाटे, गणेश काकडे, गणेश पवार, प्रकाश काकडे, मोनू कोकाटे, सोहम जगताप, जीत जगताप, समद कोतवाल, बजरंग खलाटे, राहुल पोतेकर, आकाश पाटील, राहुल काकडे, हर्ष नलवडे व अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक भेटीद्वारे युवकांनी समाजाभिमुख दृष्टीकोन व गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक कार्यात मदतीचा हात दिल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले.
जीभेच्या रंगावरुन ओळखा तुमचे आजार? ‘या’ पद्धतीचे संकेत खतरनाक

Toungue Color Health Condition: शरीर निरोगी ठेवणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, जगभरात अनेक प्रकारचे आजार वेगाने वाढत आहेत. यापैकी बहुतेक आजार असे आहेत की जर लक्षणे वेळेवर ओळखली गेली आणि त्यावर उपचार केले गेले तर गंभीर समस्या टाळता येतात. तुम्ही रोग कसे ओळखता? शरीरावर दिसणाऱ्या लक्षणांच्या आधारे हे आजार ओळखता येतात. तुम्हाला माहिती आहे का की जिभेचा रंग पाहून तुम्ही शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्यांबद्दल अंदाज लावू शकता?
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, जिभेचा रंग बदलणे हे संसर्गासारख्या अंतर्निहित आरोग्य समस्येचे किंवा अनेक प्रकारच्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. आपली जीभ साधारणपणे हलकी लाल-गुलाबी असते. जर तुम्हाला त्यात काही असामान्य बदल दिसला तर सावधगिरी बाळगा. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, आपली जीभ शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजारांना सूचित करते. अनेक वैद्यकीय परिस्थिती जिभेच्या आकार, रंग आणि पोतावर परिणाम करू शकतात. काही आजारांमध्ये, जिभेचा रंग हिरवा, निळा आणि अगदी काळा होतो.
जरी सामान्य रंगात थोडेसे बदल निरुपद्रवी असतात. जर त्यात पूर्णपणे वेगळे काहीतरी दिसले, तर काळजी घेणे महत्वाचे आहे. रंग बदलाच्या आधारे आरोग्य समस्या कशा ओळखता येतील ते आपण समजून घेऊया.
जिभेच्या रंगांचा अर्थ काय?
पिवळा जीभ सहसा बॅक्टेरियाच्या वाढीमुळे होतो. खराब तोंडी स्वच्छता आणि तोंडात ओलावा नसणे दोन्ही जिभेवर बॅक्टेरिया वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. २०१९ च्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की पिवळी जीभ मधुमेहाचे लक्षण असू शकते आणि काही प्रकरणांमध्ये ते कावीळचे लक्षण देखील मानले जाते.
तसेच, जिभेचा रंग नारिंगी होणे हे देखील एक लक्षणीय लक्षण आहे. काही अँटीबायोटिक्स आणि अन्नपदार्थांमुळे जीभ नारंगी होते. तर काही प्रकरणांमध्ये ते तोंडी स्वच्छतेतील बिघाडाचे लक्षण मानले जाते.
ल्युकोप्लाकियाचे लक्षण
काही आरोग्याच्या परिस्थितीत, तुमच्या जिभेचा रंग हलक्या गुलाबी ते पांढर्या ठिपक्यांमध्ये बदलू शकतो. पांढरे ठिपके हे थ्रश फंगल संसर्गाचे लक्षण असू शकते. जेव्हा कोणत्याही रोगामुळे किंवा औषधांमुळे तोंडातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते तेव्हा असे अनेकदा घडते. अशा बदलांकडे लक्ष देणे महत्वाचे आहे कारण ल्युकोप्लाकियाच्या समस्येतही जिभेत असे बदल दिसून आले आहेत.
जिभेचा रंग निळा होणे
जिभेचा रंग हलक्या गुलाबी ते निळा किंवा जिभेवर निळे ठिपके दिसणे हे गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण मानले जाते. सहसा असा बदल रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. रक्त विकार, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, मूत्रपिंडाच्या आजारामुळे तुम्हाला जिभेवर असा बदल देखील दिसू शकतो. निळ्या जिभेचे आणखी एक संभाव्य कारण एक्झिमा असू शकते.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
सकाळी उठताच ‘ही’ हिरवी पानं चावून खा, मिळतील 6 जबरदस्त फायदे; पाहून व्हाल आश्चर्यचकित

Neem Leaves Benefits : आयुर्वैदात झाडं पानं फुलांना अतिशय महत्त्व आहे. आयुर्वैदात जुडीबुटी आणि पानं, फुलांपासून औषधं तयार करण्यात येते. निसर्गाने दिलेल्या वरदानातील एक महत्त्वाच झाडं आहे ते म्हणजे कडुलिंबाचं…कडुलिंबांची पानं ही खाण्यासाठी कडू असतात पण ती आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जातात. महाराष्ट्रात गुढीपाडव्या या सणाच्या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्याची परंपरा आहे. यामागे कारण म्हणजे कडुलिंबाच्या पानांमध्ये तुम्हाला अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळतात. जे तुमच्या शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करण्यास उपयुक्त ठरतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3-4 मऊ कडुलिंबाची पाने चावून खाल्ली तर ते शरीराला अनेक समस्यांपासून तुम्हाला आराम देतात. पोटाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी देखील त्याचे सेवन खूप उपयुक्त मानले जाते. कडुलिंबाची पानं दरोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास कोणत्या समस्या दूर होण्यास मदत मिळते ते पाहा.
कडुलिंबाची पाने चावण्याचे फायदे
1. ब्लॉटिंग
जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीची समस्या वारंवार होत असेल तर कडुलिंबाची पाने तुमच्यासाठी फायदेशीर मानली गेली आहे. रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकतो.
2. रक्तातील साखर नियंत्रणात राहिल
दररोज कडुलिंबाची पाने चावून चावून खाल्लास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास तुम्हाला फायदा मिळतो. त्यामुळे ज्यांना शूगरची समस्या असलेल त्यांनी डॉक्टरच्या सल्लाने कडुलिंबाची पानं खावीत.
3. त्वचा
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने त्वचा आतून स्वच्छ होते, ज्यामुळे सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात मदत मिळते आणि त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. ज्या लोकांना खूप मुरुमे येतात त्यांनी हे त्यांच्या दिनचर्येत कडुलिंबाची पानं समाविष्ट करणे अतिशय फायदेशीर मानले गेले आहे.
4. लठ्ठपणा
कडुलिंब खाल्ल्याने चयापचय सुधारण्यास मदत मिळते आणि भूक वाढण्यास फायदा होतो. यामुळे वजन कमी होण्यास तुम्हाला मदत मिळते.
5. यकृत
कडुलिंब यकृताला विषमुक्त करण्यास फायदेशीर मानले गेले आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने यकृत निरोगी राहतं.
6. कॅविटी
सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावल्याने दातांच्या कॅविटीपासून आराम मिळतो. तोंड स्वच्छ ठेवण्यासही ते फायदेशीर आहे.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
जन्मतःच बाळाच्या पाठीवर छिद्र; आईच्या एका चुकीमुळे नवजात बाळाची ‘ही’ अवस्था; डॉक्टरांनी सांगितलं कारण

प्रत्येक पालकाला त्यांचे मूल निरोगी आणि तंदुरुस्त जन्माला यावे अशी इच्छा असते, परंतु दुर्दैवाने हे प्रत्येकासाठी शक्य नसते. जन्मानंतर अनेक वेळा मुलांमध्ये असे दोष दिसून येतात, ज्यांचा पालकांनी स्वप्नातही विचार केला नसतो. असाच एक प्रकार अलीकडेच पाहायला मिळाला, जेव्हा नवजात बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पाठीत एक छिद्र आढळले.
ही घटना त्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक होतीच, परंतु त्यामागील कारण जाणून घेतल्यानंतर प्रत्येक पालकानेही सतर्क राहिले पाहिजे. त्याच वेळी, या संपूर्ण प्रकरणाची माहिती डॉ. शैफाली यांनी दिली आहे. चला जाणून घेऊया ती काय म्हणाली.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैफाली म्हणतात, ‘जेव्हा आम्ही महिलांना वारंवार विचारतो की त्यांनी फॉलिक ऍसिडचे औषध घेतले आहे की नाही, त्यांनी गर्भधारणेपूर्वी ते सुरू केले आहे की नाही, तेव्हा त्यांना सतत विचारल्याबद्दल वाईट वाटते. आम्ही हे विचारतो जेणेकरून तुमच्या मुलाला अशा स्थितीपासून वाचवता येईल. डॉक्टर पुढे सांगतात की, बाळाच्या पाठीवर दिसणारे छिद्र म्हणजे पाठीचा कणा आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) वर एक पातळ त्वचा असते, जी कधीही फुटू शकते. म्हणूनच मी हे ड्रेसिंग केले आहे, जेणेकरून पुढे कोणताही धोका उद्भवू नये.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर महिलांनी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात फॉलिक ऍसिडयुक्त आहार घेतला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेतल्या तर अशा परिस्थिती टाळता येतात. तसेच, जर तुम्हाला मधुमेह असेल तर त्यावर उपचार घ्या.
७२ तासांच्या आत शस्त्रक्रिया
डॉक्टर पुढे म्हणतात की, बऱ्याचदा महिला अपस्माराचा झटका टाळण्यासाठी काही औषधे घेतात, जर ती वेळेवर चालू केली नाहीत किंवा बाळासाठी सुरक्षित औषधे घेतली नाहीत तर बाळामध्ये मेनिंगोमायलोसेल आजार होऊ शकतो. म्हणून अशी चूक करू नका. त्याच वेळी, आता बाळाचे ७२ तासांच्या आत ऑपरेशन करावे लागेल.
मुलाचे डोके सुजू शकते
या स्थितीत बाळाचे पाय कमकुवत होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, मूत्र आणि अन्न पिशवी योग्यरित्या काम करत नाही. बाळाच्या डोक्यात सूज येणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये मानसिक विकास देखील सामान्यपेक्षा मागे राहू शकतो. म्हणून, गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच पालकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधे आणि पूरक आहार घेणे महत्वाचे आहे. अजिबात निष्काळजी राहू नका. जरी, आजार अनुवांशिकदृष्ट्या देखील होऊ शकतात, परंतु तुमच्या हातात जे आहे ते करा.
अजित पवारांना कारखान्यात इंटरेस्ट, 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीत घेतात : लक्ष्मण हाके
Laxman Hake on Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांना सर्वसामान्य माणसांचं काही देणंघेणं नाही. त्यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Sugar Factrory Election) आणि कारखाना ताब्यात ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली. ते साताऱ्यात आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजितदादा को-ऑपरेटिव्ह कारखाना ताब्यात घेतात आणि त्याचे खाजगीकरण करुन 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीमध्ये विकत कसा विकत घ्यायचा हे त्यांचं वर्तन आहे. हा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचे हाके म्हणाले.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. यावरुनच हाके यांनी त्यांच्यावर टीका केली.
पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही
पुण्यामध्ये वाहून गेलेल्या पूलाविषयी अजितदादांना काही घेणेदेणे नाही. ते मात्र माळेगावमध्ये गावोगाव फिरुन एखाद्या ग्रामपंचायतची निवडणूक असल्यासारखे रममान आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीला गावांमध्ये सभा घेत असेल तर त्यांचा असली चेहरा वेगळा आहे आणि दाखवायचा चेहरा वेगळा आहे असंच त्यांना म्हणावं लागेल अशी टीका हाके यांनी केली. ऑगस्ट अखेरीस नांदेड ते मुंबई आरक्षणाच्या हक्कासाठी लॉंग मार्च काढणार आहोत. ओबीसींचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारु असेही हाके म्हणाले.
आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये
महाज्योतीला फंड मिळावा याबरोबरच सर्व विभागाच्या महामंडळांना निधी मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे. याचे उत्तर न देता वैयक्तिक पातळीवर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टीका करत आहेत. कोणी कितीही टीका केली तरी आम्ही रात्रंदिवस काम करणार आहोत असेही हाके म्हणाले. माळेगाव निवडणुकीत आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र एवढ्या साध्या निवडणुकीत अजित पवार यांना शोभतं का? हा माझा सवाल आहे असे हाके म्हणाले. मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत कोणी पडू नये. तुम्ही आमच्या केसाला धक्का लावून दाखवा. मग या महाराष्ट्रातलं काय वातावरण असतं, ते दाखवू. तुमच्या धमक्यांना आमचा ओबीसी बांधव भीक घालत नाही असेही हाके म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
पैसा कमावणे हाच अजित पवारांचा एकमेव उद्देश, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, हाकेंचा पुन्हा हल्लाबोल
आणखी वाचा
जाड रहा, खुश रहा… लठ्ठपणा असणं हाच खरा फिटनेस; हार्वर्डचा आगळावेगळा रिसर्च वाचला का?

आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर वजन कमी करणे आवश्यक आहे. पण हार्वर्ड आणि बेन गुरियन विद्यापीठाच्या ताज्या अभ्यासात काही वेगळेच सांगितले आहे. या अभ्यासानुसार, वजन कमी न करताही तुम्ही निरोगी राहू शकता. फक्त काही मूलभूत गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. म्हणून आज आपण या मूलभूत गोष्टींचे विश्लेषण करू. वजन कमी न करताही एखादी व्यक्ती फिट कशी राहू शकते आणि दीर्घ आयुष्य कसे जगू शकते हे आपल्याला कळेल. पण आधी हा अहवाल पहा
वजन कमी करा, तरच तुमचे आरोग्य सुधारेल असं सगळीकडे सांगितलं जात असताना हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (Harvard T.H. Chan School of Public Health) आणि बेन गुरियन विद्यापीठाच्या (Ben Gurion University) अलीकडील अभ्यासाने ही विचारसरणी बदलली आहे. नवीन अभ्यासानुसार, वजन कमी न करताही तुम्ही तुमचे आरोग्य चांगले हेल्दी बनवू शकता आणि पूर्णपणे निरोगी राहू शकता.
या रिसर्चमध्ये इस्राइलच्या 761 लोकांचा समावेश असून या लोकांच्या पोटाजवळ लठ्ठपणा अधिक आहे. ज्याला विसरल फॅट म्हटलं जातं. रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या लोकांना जवळपास 18 ते 24 महिने वेगवेगळ्या प्रकारे डाएट प्लान फॉलो केला. ज्यामध्ये लो फॅट डाएट, लो कार्ब डाएट, मेडिटेरिनियन डाएट, ग्रीन मेडिटेरेनियन डाएटचा समावेश आहे.
या अभ्यासात सहभागी असलेल्या 36% लोकांनी आपल्या शरीरातील 5% हून अधिक वजन कमी केलं. 36 टक्के ने 5 टक्क्यांपर्यंत वजन कमी केलं. तसेच 28% लोक ज्यांनी वजन कमी केलं नाही तर उलट त्यांचं वजन आणखी वाढलं. तसेच त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल पाहायला मिळालं आहेत. यामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ झाली, भूक वाढवणारे हार्मोन्स कमी झाले, विसरल फॅट कमी झाले, यासारखे सकारात्मक बदल पाहायला मिळाले.
भारतासारख्या देशात जिथे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग झपाट्याने वाढत आहेत, तिथे हा अभ्यास खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण देशात संपूर्ण लक्ष वजन कमी करण्यावर असते आणि जर वजन कमी झाले नाही तर लोक चिंता काळजी करतात.
मात्र या अभ्यासातून समोर आले आहे की, फक्त वजन कमी करण्यामागे धावू नका. संतुलित आणि पौष्टिक आहार तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. वजनात कोणताही बदल झाला नाही तरी तुमचे शरीर आतून निरोगी होऊ शकते.
2030 पर्यंत मुंबईत मेगा क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार

महाराष्ट्र सरकारने मुंबईमध्ये एक लाख प्रेक्षकांची क्षमता असलेले नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 मे रोजी ही घोषणा केली आणि सांगितले की, ते नवीन मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ला जमीन देतील.
मिड-डे ने दिलेल्या वृत्तानुसार, 21 मे रोजी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खर्गे यांनी नगरविकास विभागाला तातडीने प्रक्रिया सुरू करण्यास पत्र लिहिले.
अहवालात असेही म्हटले आहे की, क्रीडा आणि युवा सेवा संचालनालयाला 5 जून रोजी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यास सांगणारे अधिकृत पत्र मिळाले.
MCAने वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलेल्या समारंभात ही कल्पना मांडण्यात आली.
कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, क्रिकेट सुविधांची मागणी वाढत आहे. त्यांनी सांगितले की एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे आणि विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी यापूर्वी प्रस्ताव घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला होता.
फडणवीस म्हणाले, “चार वर्षांत, एमसीए आपला 100वा वर्धापन दिन साजरा करेल आणि तोपर्यंत आपण नवीन स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.” फडणवीस म्हणाले की, 2030 पर्यंत नवीन स्टेडियम तयार झाला पाहिजे. वानखेडे स्टेडियमच्या धर्तीवर हे स्टेडियम डिझाइन केले जाईल.
फडणवीस यांनी दिवंगत अमोल काळे यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीची आठवण करून देत कार्यक्रमातील एक वैयक्तिक क्षणही शेअर केला. काळे यांनी नेहमीच मुंबई प्रदेशातील दुसऱ्या मोठ्या स्टेडियमच्या कल्पनेला पाठिंबा दिला होता असे ते म्हणाले.
नवीन स्टेडियम आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करेल आणि चाहत्यांना चांगल्या सुविधा देईल अशी अपेक्षा आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या घोषणेचे स्वागत केले.
हेही वाचा
मधमाशी चावल्याने हार्ट अटॅक येतो? संजय कपूरच्या निधनानंतर हेल्थ एक्सपर्ट काय सांगतात?

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि सोना कॉमस्टारचे अध्यक्ष आणि करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांचे 12 जून रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या पोलो सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 53 वर्षीय संजय कपूर यांच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कारण हृदयविकाराचे कारण मधमाशी असल्याचे सांगितले जात आहे.
सुरुवातीच्या अहवालांनुसार, खेळादरम्यान, एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली आणि त्यांना चावा घेतला, ज्यामुळे त्यांना ऍलर्जी झाली आणि हृदयविकाराचा झटका आला. पण तेथे उपस्थित असलेल्या लोकांना ही गोष्ट नाकारली आहे. त्यांचे म्हणणे आहे की संजय कपूर यांना फक्त मधमाशीने चावा घेतला होता, त्यांनी मधमाशी गिळली नाही. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे, त्यानंतर मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट होईल. परंतु मधमाशीच्या चाव्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो का? असा प्रश्न सामान्यांना पडला.
मधमाशीच्या चाव्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान यांनी सांगितले की, मधमाशीच्या चाव्यामुळे ऍनाफिलेक्टिक प्रतिक्रिया होऊ शकते. जरी हे फार क्वचितच घडते. म्हणूनच, या प्रकरणात, हा प्रश्न देखील उद्भवतो की हृदयविकाराचा झटका मधमाशीच्या चाव्यामुळे आला की खेळादरम्यान आला. कारण आजकाल तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटना वाढत आहेत. त्याच वेळी, पोलोसारखे खेळ शरीरावर खूप ताण देतात, ज्यामुळे धोका आणखी वाढतो.
दंश, ऍलर्जी आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील संबंध
आकाश हेल्थकेअरचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल स्पष्ट करतात की, जर मधमाशी जीभेला चावते तर विष रक्तात वेगाने मिसळते. यामुळे शरीरात ऍलर्जीची प्रतिक्रिया निर्माण होते. काही लोकांमध्ये ते सामान्य खाज सुटण्यापुरते मर्यादित असते, परंतु काही लोकांमध्ये ते गंभीर अॅनाफिलेक्सिसचे रूप घेऊ शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया म्हणजे काय?
याला अॅनाफिलेक्सिस असेही म्हणतात, जी एक जीवघेणी अॅलर्जीक प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया एखाद्या गोष्टीच्या संपर्कात आल्यानंतर काही सेकंदात सुरू होऊ शकते. यामध्ये शेंगदाणे खाणे, अॅलर्जी असल्यास मधमाशीचा डंख येणे यांचा समावेश आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब कमी होणे आणि बेहोशी होणे अशी लक्षणे त्यात दिसून येतात. यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

