




दिल्लीच्या भोगल भागात पार्किंगच्या किरकोळ वादाला हिंसक वळण लागलं आणि त्यात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हत्येमागे जातीय कारण असल्याचे वृत्त समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी मात्र शेजाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा दावा केला असून जातीय आरोप फेटाळून लावले आहेत.
सातारा : मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी, मुंबईत 29 ऑगस्टला राज्यभरातून मराठा बांधवांना येण्याचं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं आहे. येत्या, 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार, आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अशा शब्दात जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ओबीसींसाठी लढणार असतील, तर ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत असाच त्याचा अर्थ होतो, असेही जरांगेंनी म्हटले.
मराठा समाजाच्या माध्यमातून 29 ऑगस्टला मुंबई चलो चा नारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी ते उपस्थित राहिले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार 29 ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाहीत, तेच मी पाहतो. मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण घेणार आणि 29 तारखेला आरक्षणाचा तुकडा पाडणार, असे जरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
मुंबईमध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहणार आहे, याचा मला आनंद होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागाचा दौरा केल्यानंतर मराठा समाजाची मोठी गर्दी मला भेटण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातून जर मोठ्या ताकतीने मराठा समाज येणार असेल तर मराठवाडा विदर्भ देखील त्याच ताकतीने येईल असा मला विश्वास आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात ओबीसीच्या हक्कासाठी लढणार. एकंदर बरे झाले, मराठ्यांची झोप जाईल. याचा अर्थ असाच होतो की, मी मराठ्यांसाठी लढणार नाही. ओबीसींच्या हक्कासाठी लढणार, याचा अर्थ मराठ्यांच्या गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला लढायचं नाही का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती जर ओबीसींसाठी लढणार असतील तर मराठ्यांसाठी लढणार नाही, असा याचा अर्थ होतो. मराठ्यांनो आता जागे व्हा. मराठ्यांच्या मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट भेटत नाही. त्यामुळे त्यांचेच नाव खराब होणार आहे, सर्वच पक्षातील मराठा नेते ते संपवायला निघाले आहेत, असं कधी होईल का. देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघाले आहेत, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं. भाजपसाठी ही वागणूक पूर्णपणे घातक आहे. त्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी मोठी पावर ॲक्शन कमिटी केली पाहिजे . कारण, देवेंद्र फडणवीस हे सर्वांना संपवणार आहेत, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू आहे. मात्र, आमच्यात असं होणार नाही. याउलट दोन्ही समाज एकत्र येऊन फडणवीस यांना अद्दल घडवतील. मराठा आरक्षणाचा प्रश्न बाजूला ठेवून सर्व ओबीसी बांधवांना गोव्याला बोलावले जाते आणि मराठ्यांच्या विरोधात कान भरले जातात. ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडली तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील, याचा फटका केंद्रातील सरकारला देखील बसणार आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
उद्धव ठाकरे पाठीमागच्या रांगेत का? सुप्रिया सुळेंनी सांगितलं राजकारण, सत्ताधाऱ्यांवर पलटवार
आणखी वाचा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबतच्या संबंधांमुळे भारतावर ५० टक्के शुल्क लादल्यानंतर जागतिक मुत्सद्देगिरीत मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. चीन, भारत आणि रशिया आता अमेरिकेच्या एकतर्फी धोरणांना एकत्रितपणे प्रत्युत्तर देण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत.

या नव्या व्हिडीओमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, त्यांच्या चौकशीत मतचोरीचे पाच प्रकार समोर आले आहेत. यामध्ये डुप्लिकेट मतदार, चुकीचा पत्ता, एकाच घरात खूप जास्त मतदार, जे अशक्य आहे, मतदार यादीतील चुकीची किंवा छोटी छायाचित्रे, त्यांची ओळख पटणार नाही, फॉर्म ६ चा गैरवापर यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मतदार बनलेल्या तरुणांसाठी हा फॉर्म आहे, मात्र ९० वर्षांच्या लोकांनीही या फॉर्मचा वापर करून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत, असा दावा राहुल यांनी केला.

Satara : सातारा (Satara) जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर एक तरुण आत्महत्या करण्यासाठी गेला होता. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या या तरुणाला सातारा पोलिसांनी मोठ्या शिताफीने वाचवले आहे. पत्नीसोबत घरगुती वादातून आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. शांताराम लक्ष्मण पवार असे व्यक्तीचे नाव आहे.
सातारा शहरालगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर आज संध्याकाळच्या सुमारास समर्थ मंदिर येथील एका व्यक्तीने घरामध्ये पत्नीसोबत झालेल्या भांडणातून अजिंक्यतारा किल्ल्यावर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्या व्यक्तीचे प्राण वाचवले. शांताराम लक्ष्मण पवार असे व्यक्तीचे नाव आहे. आज चार वाजण्याच्या सुमारास शांताराम पवार हे घरामध्ये पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर अजिंक्यतारा किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना हा व्यक्ती संशयास्पद रित्या किल्ल्याच्या दक्षिण दरवाजा परिसरात आढळून आला. याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ अजिंक्यतारावर धाव घेत संबंधित युवकाला अर्धवट अडकलेल्या दरीतून मोठ्या शिताफीने बाहेर काढले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र या घटनेत तात्कळ तत्परता दाखवून युवकाला वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या रुपातील देवदूतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पत्नीसोबत झालेल्या घरघुती भांडणातून तरुणाने टोकाच पाऊल उलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सातारा पोलिसांनी तत्परता दाखवून शांताराम लक्ष्मण पवार या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर शांताराम हा आज चार वाजण्याच्या सुमारास अजिंक्यतारा किल्ल्यावर आला होता. मात्र, या किल्ल्.यावर फिरण्यासाठी आलेल्या लोकांना शांताराम पवार हा व्यक्ती संशयास्पद वाटला. त्यामुळं काही लोकांनी या व्यक्तीच्या संदर्भातील माहिती सातारा पोलिसांनी दिली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर धाव घेतली. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीन अर्धवट दरीत अडकेलेल्या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी शांताराम लक्ष्मण पवार यांना त्यांच्या घरच्यांची हवाली केले. दरम्यान, पोलिसांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कैतुक केले जात आहे. मोठ्या शिताफीने पोलिसांनी आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या युवकाला वाचवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
