Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 167

एन. रघुरामन यांचा कॉलम: वेळ हाच पैसा, तो चिंता करून व्यर्थ घालवू नका!

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  वेळ हाच पैसा, तो चिंता करून व्यर्थ घालवू नका!


1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

वाढते बिल आणि महागाईमुळे पैसा आपली सर्वात मोठी चिंता बनत आहे याकडे तुम्ही लक्ष दिले का? हे १००% खरे आहे असे दिसून आले. लोक प्रवास करताना किंवा त्यांच्या वर्कस्टेशनच्या मागे उभे असताना त्यांच्याकडे पाहा. आपल्या फोनवर एका टॅपवर बँकिंग आणि गुंतवणूक अॅप्स उपलब्ध असल्याने आपल्यापैकी बरेच जण दिवसातून अनेक वेळा आपले आर्थिक खाते तपासत असतात. उदाहरणार्थ- पावसाळ्यात लहरी हवामानामुळे आपण हवामानाचे अहवाल तपासतो. तसेच याबाबतही घडत आहे. तरुणांना त्यांच्या नियंत्रणाबाहेरील बाह्य घटकांचा सामना करावा लागत असल्याने त्यांना अधिक आर्थिक दबावांना तोंड द्यावे लागते. म्हणजे बाजारातील अनिश्चितता, नोकरीची सुरक्षा, कर्ज आणि वाढत्या घरांच्या किमतींसारखे दैनंदिन खर्च. आजकाल आपल्यापैकी बहुतेक जण आपला वेळ चिंता करण्यात घालवतात! अमेरिकेत झालेल्या अलीकडील सर्वेक्षणानुसार नोकरी गमावणारे तरुण दिवसातून किमान ४.५ तास पैशाची चिंता करण्यात घालवतात. लक्षात ठेवा, हे अर्धवेळ नोकरी करण्यासारखे आहे.पाहणीनुसार इंटरनेटमुळे तरुणांना अधिक माहिती उपलब्ध असल्याने सोशल मीडियामुळे ते सतत जगाशी स्वतःची तुलना करत असतात. अधिक माहिती असणे चांगले असले तरी माहितीने भरलेले असणे कधी कधी ताण निर्माण करू शकते. हा विषय इतका गंभीर आहे की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३६% लोकांनी त्यांच्या आर्थिक चिंतांमुळे झोपू शकत नसल्याचे सांगितले. जनरेशन-जी दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल विचार करतात तर मिलेनियल्स आणि जनरेशन-एक्स बहुतेकदा झोपण्यापूर्वी किंवा रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल चिंता करतात.पैशाचा ताण प्रेरणा देतो का? दीर्घकालीन ध्येय निर्माण करण्यास आणि साध्य करण्यास या तणावाची मदत होत असल्यास उत्तर हो असेल. परंतु ते भूतकाळातील चुका, गमावलेल्या संधींची आठवण करून देत असल्यास ते फक्त निराशेकडे नेईल, उपायांकडे नाही. आपण विसरतो की पैसा हे एक अंतहीन चक्र आहे. म्हणून पैशाचे व्यवस्थापन करणे आणि ते निर्माण करण्यास मदत करण्यासाठी एक लहान पाऊल उचलणे हळूहळू पैशाशी संबंधित चिंता दूर करेल.

व्यवस्थापन टीप :

तुम्हीही तुमचा बहुतेक वेळ पैशाबद्दल चिंता करण्यात घालवता का? हे लक्षात ठेवा. चिंता केल्याने तुमचे बिल भरणार नाही. उलट या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. लवकर बचत सुरू करा. सातत्याने बचत करा आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक करा. आणि नंतर परिणाम पाहा. या सोप्या पद्धतींनी तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे वेगाने वाढतील. तुमच्या चिंता आपोआप दूर होतील.



Source link

वंदे भारतच्या नगर थांब्यावरून राजकीय श्रेयवाद, नीलेश लंके आणि डॉ. सुजय विखे यांच्यात जुंपली

0
वंदे भारतच्या नगर थांब्यावरून राजकीय श्रेयवाद, नीलेश लंके आणि डॉ. सुजय विखे यांच्यात जुंपली



Political credit battles erupt in Ahmednagar over Nagpur-Pune Vande Bharat train’s stop, वंदे भारतच्या नगर थांब्यावरून राजकीय श्रेयवाद, नीलेश लंके आणि डॉ. सुजय विखे यांच्यात जुंपली





Source link

बारामतीच्या धर्तीवर फलटणला ‘सिटी हॉस्पिटल’ची भेट – गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा सुरू

0
बारामतीच्या धर्तीवर फलटणला ‘सिटी हॉस्पिटल’ची भेट – गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा सुरू

फलटण :- फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नगरपरिषदेच्या माध्यमातून ‘सिटी हॉस्पिटल’ सुरु करण्याची गती वाढली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या नवीन डायलिसिस मशीनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या मशीनमुळे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ टळणार असून आता मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार आहे, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार सचिन पाटील, माणिकराव सोनवलकर, डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. प्रविण आगवणे, डॉ. जे.टी. पोळ, जयकुमार शिंदे, बापूराव शिंदे, तुकाराम शिंदे, सचिन रणवरे, संदिप चोरमले, नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, झाकिरभाई मणेर, राहुल शहा, राजाभाऊ देशमाने यांची उपस्थिती होती.

लॉजमध्ये नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

0
लॉजमध्ये नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

फलटण : बारामती तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या फलटण येथील २४ वर्षीय तरुणाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव गौरव आदेश निंबाळकर (रा. फलटण, जि. सातारा) असे आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०१९ ते मे २०२५ या काळात आरोपीने फलटण व करंजेपुल (ता. बारामती, जि. पुणे) येथील विविध ठिकाणी तसेच लॉजमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध केले. पीडिता दहावीला शिक्षण घेत असताना आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर जबरदस्ती, धमक्या आणि ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू राहिले. आरोपीने उघडे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ७ ऑगस्ट २०२५ रोजीही आरोपीने करंजेपुल येथे जाऊन पीडितेला लॉजवर येण्यास नकार दिल्याने तिच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आजारी हत्तीणीचा वैद्यकीय उपचारासाठी ९५ किलोमीटर पायी प्रवास, ‘पेटा’ आणि ‘वनतारा’चे मौन…

0
आजारी हत्तीणीचा वैद्यकीय उपचारासाठी ९५ किलोमीटर पायी प्रवास, ‘पेटा’ आणि ‘वनतारा’चे मौन…


नागपूर : आसाममधील ‘मानिकी’ नावाच्या ४८ वर्षाच्या हत्तीणीला वैद्यकीय उपचारासाठी तब्बल ९५ किलोमीटर चालण्यास भाग पाडण्यात आले. ही चित्रफित समाजमाध्यमावर सामाईक झाल्यानंतर आसाम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. दरम्यान, महाराष्ट्रातील हत्तींबाबत भूमिका घेणारी ‘पेटा’ ही संस्था आणि ‘वनतारा’ हे बचाव व पुनर्वसन केंद्र आसाममधील या प्रकरणावर गप्प आहे. त्यामुळे त्यांच्या या मूक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘मानिकी’ या हत्तीणीचा डावा पाय गंभीरपणे वाकलेला असल्याने तिला उपचारासाठी ट्रकने नेण्याच्या सरकारी सूचना होत्या. मात्र, या सूचनांचे उल्लंघन करत आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील ककोपठारपासून दिब्रुगडयेथे उपचारासाठी सुमारे ९५ किलोमीटर चालण्यास तिला भाग पाडले जात होते. या हत्तीणीच्या पाठीवर तिचा माहूत बसला होता. त्यामुळे वन्यजीवप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध केला. ‘मानिकी’ची मालकीण जोरहाट रहिवासी रूची चेतिया यांनी वनविभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

माहूत प्रदीप मोरन यांच्या मते सात-आठ दिवसांपूर्वी हा कठीण प्रवास सुरु झाला. सहा ऑगस्टपर्यंत मानिकी केवळ ३६ किलोमीटर अंतर चालू शकली. तिची अवस्था पाहून स्थानिक रहिवासी कृष्णा माझी यांनी तिला आश्रय दिला होता. दोन वर्षांपूर्वी तिच्या पायावर एक जड लाकूड पडले होते. सुरुवातीला तिच्यावर उपचार केले असले तरीही तिचा पाय बरा झाला नाही. तिच्या वेदना वाढतच गेल्या. काकोपठार येथे तिच्यावर उपचार करण्यात आले, पण योग्य उपचार उपलब्ध नव्हते.

हेही वाचा

दरम्यान, समाजमाध्यमावर ही चित्रफित सामाईक झाल्यानंतर आसाम वनविभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी आणि पर्यावरणवादी यांचे संयुक्त पथक कृष्णा माझी यांच्याकडे पोहोचले. तिला ताबडतोब वैद्यकीय मदत देऊन प्रकृतीचे मुल्यांकन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी हत्तीणीला तीन दिवस विश्रांती घेण्याचे आणि ट्रकने वाहतुकीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. आता तिला विशेष पशुवैद्यकीय उपचारांसाठी दिब्रुगडऐवजी काझीरंगा किंवा गुवाहाटी येथे नेले जाईल. प्राण्यांच्या कल्याणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मालकाविरुद्ध कारवाई करण्याचा विचार वनविभाग करत आहे.

हेही वाचा

या घटनेनंतर प्राणी कल्याण नियमावली आणि वन्यजीव संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. समाजमाध्यमावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ‘मानिकी’ हत्तीणीची चित्रफित सामाईक होऊनही प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संस्थेला, तसेच ‘वनतारा’ या बचाव आणि पूनर्वसन केंद्रालाही समाजमाध्यमावर सामाईक झालेल्या या हत्तीणीची दखल घ्यावी वाटली नाही का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.





Source link

‘मी 3 सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय’, महिलेचा धक्कादायक दावा, डॉक्टरांच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर

0
‘मी 3 सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय’, महिलेचा धक्कादायक दावा, डॉक्टरांच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर



‘मी तीन सापांना जन्म दिला आहे’, मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या अविश्वसनीय दाव्याने उडली एकच खळबळ. नेमकं काय घडलं?



Source link

जीवनमार्ग: रक्षाबंधनाचा सात्त्विक भाव वर्षभर राहिला पाहिजे

0
जीवनमार्ग:  रक्षाबंधनाचा सात्त्विक भाव वर्षभर राहिला पाहिजे


पं. विजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

संपूर्ण जगात एकमेव भारतात विशेषतः हिंदू धर्मात. पुरुष आणि स्त्रीच्या शरीराच्या पलीकडे जाऊन त्यांनी एकमेकांच्या आत्म्याला स्पर्श केला पाहिजे, असा प्रयोग झाला. या प्रयोगाच्या सणाला रक्षाबंधन म्हणतात. याचा एक धागा कोणत्याही पुरुषाला त्या स्त्रीच्या आत्म्यापर्यंत घेऊन जातो, जिथे तो एका बहिणीला पाहतो. दुसऱ्याच्या शरीराबद्दल अशी पवित्रता या सणातून जन्माला येते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाऊ आणि बहीण एकमेकांच्या आत्म्याला अगदी सहजपणे स्पर्श करत असल्याने येथे शांती निर्माण होते. सहसा स्त्री- पुरुषाचे शरीर एकत्र आले अशांतता असते. पण या नात्यामुळे शांती निर्माण होते. आपल्या व्यक्तिमत्त्वात एक विश्रांती येते. हे नाते आपली स्पंदने नष्ट करते. यावरून आपल्याला समजते की जगात बाहेर आनंद असू शकतो, परंतु योग आत असावा. या नात्यात होणारी देणगी आणि देणगीदेखील खूप आध्यात्मिक, शुद्ध, फायदेशीर आहे. या एका तारखेचा सात्त्विक भाव वर्षभर राहिला पाहिजे.

Facebook:Pt. Vijayshankar Mehta



Source link

राखीच्या नात्याने पोलीस-विद्यार्थिनींचा स्नेहबंध

0
राखीच्या नात्याने पोलीस-विद्यार्थिनींचा स्नेहबंध

फलटण : शहरातील विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूल, फरांदवाडीच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी पोलीस बांधवांशी भावनिक बंध दृढ केले. आज, दिनांक ९ ऑगस्ट रोजी, इयत्ता ५ वी आणि ६ वीच्या एकूण ४८ विद्यार्थिनींनी फलटण शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलिसांना स्वतःच्या हस्ते राख्या बांधल्या.

वर्गशिक्षिका पूजा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने पोलीस ठाण्यातील वातावरण भारावून गेले होते. रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा अनुभव घेताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद स्पष्ट जाणवत होता.

पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे पोलिस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते आणखी दृढ होते.”

यावेळी फलटण शहर पोलिसांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थिनीला बिस्कीट पुडा आणि पेन्सिल भेट म्हणून देण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पोलिस ठाण्यातर्फे शाळा, विद्यार्थिनी आणि शिक्षकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

मुंबईसाठी पुन्हा ‘मराठा मोर्चा’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

0
मुंबईसाठी पुन्हा ‘मराठा मोर्चा’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फलटण : मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा उभारण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्धार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यात फलटण येथे मराठा समाजाच्या बैठकीत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. “ओबीसींच्या हक्कासाठी लढणार म्हणजे मराठ्यांसाठी लढणार नाही, असा अर्थ होतो. मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्यात दंगल घडली तर त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार असतील,” असा इशारा त्यांनी दिला.

जरांगे पाटील म्हणाले, “29 तारखेला आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार आणि तेही ओबीसीतूनच घेणार. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून मोठी ताकद मुंबईत येणार आहे, तर मराठवाडा-विदर्भही मागे राहणार नाही.”

त्यांनी भाजपवरही थेट हल्ला चढवला. “देवेंद्र फडणवीस हे भाजप संपवायला निघाले आहेत. मराठा मंत्र्यांना घोटाळ्यात क्लीनचीट मिळत नाही, सर्व पक्षातील मराठा नेते संपवण्याचा डाव सुरू आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी ‘पॉवर ॲक्शन कमिटी’ तयार करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

ओबीसी आणि मराठा समाजात ऐक्य राखत, “फडणवीसांना अद्दल घडवू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. “गोव्याला ओबीसी नेत्यांना बोलावून मराठ्यांविरोधात कान भरले जात आहेत. मात्र, आमच्यात दंगल होणार नाही. पण जर झाली, तर जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असेल आणि त्याचा फटका केंद्र सरकारलाही बसेल,” असा इशारा त्यांनी दिला.

देवाभाऊ ओवाळणीत 1500 नको.. लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, वाईत रक्षाबंधनाला म

0


Satara: एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळण्यास सुरुवात झाली असताना साताऱ्यातील वाईमध्ये लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. या पत्रात देवभाऊ ओवाळणीत 1500 नको तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या अशी मागणी त्यांनी केलीय.  

दरम्यान, मागील 22 दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलाय.यात महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे रक्ताने पत्र लिहीत न्यायाची ओवाळणी मागितलीय

नेमकं प्रकरण काय ?

मागील 22 दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी हा लोक मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर असलेल्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी लाडक्या बहिणींनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे.

रक्षाबंधनाची भेट दीड हजार रुपये नको प्रेशर बंद करा आम्हाला न्याय द्या अशी भावनिक साद यावेळी वाईतील महिलांनी केली आहे..या पार्श्वभूमीवर महिलांनी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनोखी मागणी केली. “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,” असा भावनिक संदेश त्यांनी पत्रातून दिला. 

लाडक्या बहिणीचे जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात 

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जातो. जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं होतं त्याप्रमाणं जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 

आणखी वाचा



Source link