



Healthy Spices: पोटाला दुसरा मेंदू म्हटलं जातं कारण मेंदूचे आरोग्य संपूर्ण शरीराचे आरोग्य सुनिश्चित करते, त्याचप्रमाणे जर पोट खराब असेल तर संपूर्ण शरीराचे आरोग्य प्रभावित होते. म्हणूनच पोट निरोगी असणे खूप महत्वाचे आहे. सहसा मसाल्यांचा विचार केला तर असे म्हटले जाते की, मसाले आरोग्यासाठी चांगले नाहीत किंवा मसाले कमी खावेत. परंतु, आयुर्वेदात असे अनेक मसाले आहेत जे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. हे असे काही मसाले आहेत, जे खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते आणि पचन व्यवस्थित राहते. आतड्यांचे डॉक्टर सौरभ सेठी यांनी असे १० मसाले सांगितले आहेत जे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत.
हळद – औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद पोटासाठी खूप फायदेशीर आहे. ती खाल्ल्याने शरीराला दाहक-विरोधी गुणधर्म, प्रतिजैविक गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील मिळतात. हळद पचन चांगले ठेवते आणि पोटाचे आजार दूर ठेवते.
आले – आले आतड्याच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. आले आतड्याच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. आले आतड्यांमधील दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ते केवळ पचन चांगले ठेवत नाही तर पोटदुखीपासून देखील आराम देते.
बडीशेप – पोटात फुगण्याची समस्या असो किंवा गॅस तयार होण्याची समस्या असो, बडीशेप खाल्ल्याने आतड्यांसंबंधी या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
जिरे – जिरे पचन समस्या, फुगणे आणि आतड्यांशी संबंधित इतर समस्या दूर करण्यात प्रभावी आहे. जिरे (जिरे) निरोगी आतड्याच्या सूक्ष्मजीवांना समर्थन देते.
धणे – धणे बियांमध्ये आवश्यक तेले आणि आहारातील तंतू असतात जे पाचक एंजाइमची क्रिया सुधारतात. ते केवळ पोटाच्या समस्या दूर करत नाही तर यकृतासाठी देखील चांगले आहे.
सेलेरी – सेलेरी फुगणे आणि आम्लता दूर करण्यात प्रभावी आहे. सेलेरी पाणी पिणे किंवा भाजलेले सेलेरी खाल्ल्याने पोटदुखी देखील कमी होते.
काळी मिरी – काळी मिरी खाल्ल्याने केवळ पोटच नाही तर संपूर्ण शरीराला फायदा होतो. काळी मिरी पचन सुधारते आणि पोटफुगी आणि गॅसपासून आराम मिळतो.
वेलची – वेलची पोटासाठी खूप चांगली मानली जाते. ती शरीराला दाहक-विरोधी गुणधर्म देखील प्रदान करते. मळमळ होण्याची समस्या असली तरीही, वेलची खाल्ल्याने त्वरित फायदे दिसून येतात.
दालचिनी – दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्मांसह, दालचिनीमध्ये पचन गुणधर्म देखील आहेत. ते खाल्ल्याने दाह कमी होतो आणि पोटातील घाणेरडे बॅक्टेरिया काढून टाकले जातात.
मेथी – पिवळ्या मेथीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते आणि म्हणूनच ते पोटासाठी खूप चांगले असतात. ते आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


बिटकॉईन या आभासी चलनाचे मूल्य १ लाख २३ हजार डॉलरवर पोहोचले आहे. यातून जागतिक पातळीवर क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलनाला वाढलेली मागणी समोर येत आहे. याच वेळी भारतातही आभासी चलन गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यात तरुणाईचे प्रमाण पहिल्यापासून अधिक आहे. देशातील गुंतवणुकीच्या मुख्य प्रवाहात आभासी चलनाचा समावेश होऊ लागल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. हे देशात आभासी चलनाची एक परिसंस्था विकसित होत असल्याचे निदर्शक आहे. याच वेळी भारतीय गुंतवणूकदार केवळ एकाच प्रकारच्या आभासी चलनात गुंतवणूक करण्याऐवजी त्यात वैविध्य आणत आहेत. त्यातून त्यांचा परतावाही वाढल्याचे दिसून कॉईनस्वीच या आभासी चलन मंचाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.
आभासी चलन वापरणाऱ्या २ कोटी ग्राहकांच्या माहितीच्या आधारे दुसऱ्या तिमाहीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यातून देशातील आभासी चलन गुंतवणुकीत होणारे मोठे बदल, शहरनिहाय होणारी कमीजास्त गुंतवणूक, जास्त परतावा मिळविणारी शहरे, गुंतवणूकदारांचा स्वभाव आदी बाबी समोर आल्या आहेत. देशातील एकूण आभासी चलन गुंतवणुकीत तीन महानगरांचा सर्वाधिक २६.६ टक्के वाटा आहे. त्यात दिल्ली १४.६ टक्के, बंगळुरू ६.८ टक्के आणि मुंबई ५.२ टक्के आहे. देशातील आभासी चलन गुंतवणुकीत सर्वाधिक ७५.६१ टक्के गुंतवणूकदार कोलकत्यातील आहेत. याच वेळी जयपूर, लखनौ आणि पाटणा यांसारख्या शहरांमधूनही आभासी चलनाचा स्वीकार वाढला आहे. यातून महानगरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्येही आभासी चलनाचा होणारा विस्तार आणि त्याबाबत निर्माण होत असलेली जागरूकता दिसून येत आहे.
आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील व्यक्तींचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण अधिक आहे. एकूण गुंतवणूकदारांमध्ये या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ७१.७ टक्के आहे. त्यात २६ ते ३५ वयोगटातील गुंतवणूकदारांचे प्रमाण ४४.४ टक्के असून, १८ ते २५ वयोगटातील गुंतवणूकदारांचे प्रमाण २७.३ टक्के आहे. मात्र, महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण कमी आहे. एकूण गुंतवणूकदारांमध्ये केवळ १२.०२ टक्के महिला आहेत. त्यामुळे आगामी काळात महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण वाढण्यास भरपूर वाव असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
भारतीय गुंतवणूकदार हे प्रामुख्याने ब्लू-चिप आणि लार्ज-कॅप चलन प्रकाराला प्राधान्य देत आहेत. कारण हे चलन प्रकार स्थिर आहेत. त्यातही पहिल्या स्तरावरील आभासी चलनांना मागणी जास्त आहे. कारण या आभासी चलनांकडे स्वत:ची चलन व्यवहार यंत्रणा असते. याचवेळी चलन व्यवहारासाठी त्रयस्थ यंत्रणांचा वापर करणाऱ्या दुसऱ्या स्तरावरील आभासी चलनांकडे ओढा कमी आहे. पहिल्या स्तरावरील आभासी चलनांचा वाटा गुंतवणुकीत ३५.५२ टक्के आहे. याच वेळी डीफाय म्हणजेच विकेंद्रित वित्तीय व्यवस्था आणि गेमिंग प्रकारातील आभासी चलनांनाही गुंतवणूकदारांकडून मागणी वाढताना दिसून येत आहे.
यंदा आभासी चलनात सर्वाधिक गुंतवणूक मे महिन्यात झाली. त्यातही ९ ते १२ मे या कालावधीत जास्त गुंतवणूक झाली. यामागे जागतिक पातळीवरील मोठी तेजी कारणीभूत होती. अमेरिका, ब्रिटन आणि चीनने त्यावेळी व्यापार शुल्क कपातीची घोषणा केल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यातून जागतिक पातळीवर व्यापार तणाव कमी झाला. याचाच परिणाम होऊन आभासी चलन व्यवहारांत मोठी वाढ झाली होती. यामुळे जागतिक पातळीवरील घडामोडींचा मोठा परिणाम देशातील आभासी चलन व्यवहारांवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आभासी चलनामध्ये बिटकॉईनला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. एकूण गुंतवणुकीत बिटकॉईनचा वाटा ६.५ टक्के आहे. त्याखालोखाल डॉजकॉईनचा वाटा किंचित कमी असून, तो ६.४९ टक्के आहे. इथिरियमचा वाटा ५.२ टक्के आहे. आभासी चलन वर्गवारीचा विचार करता मीम कॉईन्सचा वाटा एकूण गुंतवणुकीत १३.२ टक्के असून, त्यात डॉजकॉईन आघाडीवर आहे. त्यानंतर शिबू इनू आणि पेपे यांना पसंती मिळत आहे. सर्वाधिक व्यवहार होणारे आभासी चलन बिटकॉईन हे असून, एकूण व्यवहारांमध्ये त्याचा वाटा ७.२ टक्के आहे. त्याखालोखाल रिपल (एक्सआरपी) आणि इथिरियमचा वाटा प्रत्येकी ४.२ टक्के आहे.
sanjay.jadhav@expressindia.com


नागपूर : मी विद्वान नाही. योगायोगाने मला डॉक्टरेट मिळाली. मुळात मी त्या डॉक्टरेटच्या लायकीचाच नाही आणि म्हणूनच मी माझ्या नावासमोर डॉक्टर लावत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे विषय कोणताही असला तरी त्यावर स्पष्टपणे भाष्य करण्यास ते कधीच टाळत नाहीत. आताही त्यांनी मानद डॉक्टरेट मिळाल्यानंतर नावासमोर डॉक्टर लावून मिरवणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
महान भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री विष्णू गणेश भिडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी व्हीएनआयटीच्या मुख्य सभागृहात भिडे स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी गडकरी बोलत कोते. महाराष्ट्र विज्ञान अकादमी, मौतिकशास्त्र परमोशन ट्रस्ट, व्हीएनआयटी आणि भिडे कुटुंबियांच्या वतीने आयोजित केले जाणारे हे १८ वे व्याख्यान होते. भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर यांनी ‘विज्ञान आणि ज्ञानाचा शाश्वत सातत्य’ या विषयावर व्याख्यान दिले.
अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे प्रा. प्रेमलाल पटेल व प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. व्यासपीठावर व्हीएनआयटीचे माजी संचालक डॉ. प्रमोद पडोळे, व्हीएनआयटीचे भौतिकशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. व्ही. के. देशपांडे होते. विविध क्षेत्रातील नामांकिताना अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट दिली जाते. आणि मग स्वतःच्या नावासमोर ही डॉक्टरेट पदवी लावून लोक मिरवतात. पात्रता नसतांनाही मिळालेली ही मानद डॉक्टरेट पदवी नावासमोर लावण्यासाठी आपण लायक आहोत का हे सुद्धा पाहिले जात नाही.
मानद पदवी समोरच्या विद्यापीठाने दिली तरी नावासमोर ती लावायची की नाही हा सर्वस्वी निर्णय आपलाच असतो. मात्र, लोकांना ती नावासमोर लावून धन्यता मिळवायची असते. मात्र, स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांना ते मान्य नाही. त्यांनाही ही मानद डॉक्टरेट मिळाली आहे, पण ते स्पष्टपणे नावासमोर ती पदवी लावण्यास नकार देतात. भिडे स्मृती व्याख्यानमालेत ते स्पष्टच म्हणाले की, ती पदवी नावासमोर लावण्याची माझी पात्रताच नाही. कारण ती मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि मी तेवढा विद्वान नाही. ही मानद पदवी मिळणे हा निव्वळ योगायोग आहे. त्याचा आणि माझ्या बुद्धिमत्तेचा काहीच संबंध नाही. गडकरींसारखे ही बाब स्पष्टपणे मान्य करणारा व्यक्ती कुणीही सापडणार नाही. त्यांच्या या कानपिचक्या मानद डॉक्टरेट नावासमोर लावून मिरवणाऱ्यांना कळणार का, हाच खरा प्रश्न आहे.


1 दिवसापूर्वी
वाढते बिल आणि महागाईमुळे पैसा आपली सर्वात मोठी चिंता बनत आहे याकडे तुम्ही लक्ष दिले का? हे १००% खरे आहे असे दिसून आले. लोक प्रवास करताना किंवा त्यांच्या वर्कस्टेशनच्या मागे उभे असताना त्यांच्याकडे पाहा. आपल्या फोनवर एका टॅपवर बँकिंग आणि गुंतवणूक अॅप्स उपलब्ध असल्याने आपल्यापैकी बरेच जण दिवसातून अनेक वेळा आपले आर्थिक खाते तपासत असतात. उदाहरणार्थ- पावसाळ्यात लहरी हवामानामुळे आपण हवामानाचे अहवाल तपासतो. तसेच याबाबतही घडत आहे. तरुणांना त्यांच्या नियंत्रणाबाहेरील बाह्य घटकांचा सामना करावा लागत असल्याने त्यांना अधिक आर्थिक दबावांना तोंड द्यावे लागते. म्हणजे बाजारातील अनिश्चितता, नोकरीची सुरक्षा, कर्ज आणि वाढत्या घरांच्या किमतींसारखे दैनंदिन खर्च. आजकाल आपल्यापैकी बहुतेक जण आपला वेळ चिंता करण्यात घालवतात! अमेरिकेत झालेल्या अलीकडील सर्वेक्षणानुसार नोकरी गमावणारे तरुण दिवसातून किमान ४.५ तास पैशाची चिंता करण्यात घालवतात. लक्षात ठेवा, हे अर्धवेळ नोकरी करण्यासारखे आहे.पाहणीनुसार इंटरनेटमुळे तरुणांना अधिक माहिती उपलब्ध असल्याने सोशल मीडियामुळे ते सतत जगाशी स्वतःची तुलना करत असतात. अधिक माहिती असणे चांगले असले तरी माहितीने भरलेले असणे कधी कधी ताण निर्माण करू शकते. हा विषय इतका गंभीर आहे की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३६% लोकांनी त्यांच्या आर्थिक चिंतांमुळे झोपू शकत नसल्याचे सांगितले. जनरेशन-जी दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल विचार करतात तर मिलेनियल्स आणि जनरेशन-एक्स बहुतेकदा झोपण्यापूर्वी किंवा रात्री ८ ते ११ वाजेच्या दरम्यान पैशाबद्दल चिंता करतात.पैशाचा ताण प्रेरणा देतो का? दीर्घकालीन ध्येय निर्माण करण्यास आणि साध्य करण्यास या तणावाची मदत होत असल्यास उत्तर हो असेल. परंतु ते भूतकाळातील चुका, गमावलेल्या संधींची आठवण करून देत असल्यास ते फक्त निराशेकडे नेईल, उपायांकडे नाही. आपण विसरतो की पैसा हे एक अंतहीन चक्र आहे. म्हणून पैशाचे व्यवस्थापन करणे आणि ते निर्माण करण्यास मदत करण्यासाठी एक लहान पाऊल उचलणे हळूहळू पैशाशी संबंधित चिंता दूर करेल.
व्यवस्थापन टीप :
तुम्हीही तुमचा बहुतेक वेळ पैशाबद्दल चिंता करण्यात घालवता का? हे लक्षात ठेवा. चिंता केल्याने तुमचे बिल भरणार नाही. उलट या वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. लवकर बचत सुरू करा. सातत्याने बचत करा आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक करा. आणि नंतर परिणाम पाहा. या सोप्या पद्धतींनी तुम्हाला दिसेल की तुमचे पैसे वेगाने वाढतील. तुमच्या चिंता आपोआप दूर होतील.