


सातारा :- पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील हजारो न्यायप्रविष्टांसाठी १७ ऑगस्ट २०२४ हा दिवस ऐतिहासिक ठरला. कोल्हापूर शहरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन होऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला. न्यायप्रविष्टांना आता मुंबई गाठण्याची कटकट संपली असून, न्यायदानाचा नवा अध्याय कोल्हापुरात सुरू झाला आहे.
या सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, तसेच मंत्रीमंडळातील अनेक मान्यवर, खासदार, आमदार, न्यायमूर्ती व विधिक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील भावनिक स्वागताने सरन्यायाधीश स्वतःही भारावून गेले.
🔹पाच दशकांपासूनची मागणी पूर्ण
कोल्हापूर सर्किट बेंचची मागणी जवळपास ५० वर्षांपासून प्रलंबित होती. वकील संघटनांचा सातत्याने पाठपुरावा, सामाजिक संघटनांचा पाठिंबा आणि नेत्यांची भूमिका यामुळे अखेर हे स्वप्न साकार झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे २०१५ पासून या कामाला गती मिळाली आणि अखेर आज न्यायदानाचे नवे दालन उघडले.
🔹सहा जिल्ह्यांना थेट लाभ
या बेंचमुळे दरवर्षी सुमारे ४० हजार खटल्यांचा निपटारा कोल्हापुरातूनच होईल. यामुळे वेळ, पैसा व श्रम यांची बचत होऊन सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
🔹खंडपीठाची नवी इमारत
शेंडा पार्क येथील २७ एकर जागेचे हस्तांतरण झाले असून, शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भविष्यात येथे भव्य खंडपीठ इमारत उभारली जाणार आहे.
🔹इतिहासाशी जोडलेले राधाबाई बिल्डिंग
राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील भाऊसिंगजी मार्गावरील राधाबाई बिल्डिंग नव्याने सज्ज होऊन न्यायालयीन कार्यवाहीसाठी सुरू झाली आहे. याच ठिकाणी लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी झाले होते, हे विशेष.
🔹सरन्यायाधीशांचा भावनिक आविष्कार
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तब्बल ३० वेळा उल्लेख केला. “शाहू महाराजांचे आमच्यावर अगणित उपकार आहेत” हे त्यांचे भावनिक उद्गार उपस्थितांना हेलावून गेले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील या यशाचे संपूर्ण श्रेय सरन्यायाधीश गवई यांनाच दिले.
🔹सर्किट बेंच लवकरच खंडपीठात रूपांतरित होणार
सध्या हे सर्किट बेंच तात्पुरत्या स्वरूपात सुरू झाले असले तरी लवकरच ते कायमस्वरूपी खंडपीठ होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

फलटण– फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रविवार, दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १२, १४, १६, १८ व २० वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धांचा शुभारंभ रविवार, दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून विविध धावण्याच्या शर्यती, लांबउडी व गोळाफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
🔹 २० वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, १६०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १८ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, १००० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १६ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १४ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
🔹 १२ वर्षांखालील गटासाठी – १०० मीटर, ३०० मीटर धावणे, लांबउडी व गोळाफेक.
स्पर्धकांनी नावनोंदणीसह प्रवेश फी ३० रुपये जमा करून आपले चेस्ट नंबर दि.२० ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत मुधोजी महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातून घ्यावेत. प्रत्येक खेळाडूस जास्तीत जास्त दोन क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेता येईल. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी –
जनार्दन पवार (मो. ९२८४७६५९९५), नामदेव मोरे (मो. ९९६००८२१२०), ॲड. रोहित अहिवळे (मो. ७४९९५३७९३७), राज जाधव (मो. ९२२६१३९६५३), तायाप्पा शेंडगे (मो. ९३२२७४८१९९), धीरज कचरे (मो. ८३९०९९१९९९), सुहास कदम (मो. ७०८३७२०५२०), सूरज ढेंबरे (मो. ८८०५७७७९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Satara Heavy Rains: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय 10 जण जखमी आहेत. 14 लाख एकर शेती पाण्याखाली गेलीय. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक (NDRF) आणि (SDRF) तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात. सातारा घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा ,उरमोडी नद्यांना पूर आलाय. सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाणी जलदगतीने भरत आहे. गेल्या 24 तासांत कोयना धरणातून तब्बल 11 वेळा विसर्गात वाढ करण्यात आली. सध्या धरणाचे सर्व दरवाजे 13 फूटांनी उघडे करून तब्बल 95 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सध्या 102 टक्के क्षमतेने भरले असून परिसरातील अनेक भाग धोक्याच्या स्थितीत आले आहेत.
कोयना व्यतिरिक्त कण्हेर धरणातून 14 हजार 876 क्यूसेक, उरमोडी धरणातून 8 हजार 900 क्यूसेस, वीर धरणातून 55 हजार 800 क्यूसेक आणि धोम धरणातून 17 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. कोयना नदीवरील तांबवे आणि निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्यात गेला आहे.
पूरस्थितीचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्गावर पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धोम बलकवडी उरमोडी तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे . कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाणे उचलून 93 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपत्रात केला जात असल्याने कृष्णा व कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिर मध्ये पाणी घुसले असून आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढल्यास पाटण कराड व सांगलीला महापुराचा धोका पोचू शकतो असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे
साताऱ्यासोबतच कृष्णा नदीकाठच्या सांगली जिल्ह्यातील गावांनाही या पुराचा तडाखा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता हळूहळू राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात अचानक पाऊस वाढण्याचं कारण म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. पण, आता हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
आणखी वाचा
1 दिवसापूर्वी
आपल्या सर्वांना यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नकरायचे आहेत. आपल्याला थोडेसे अपयश आले तर माणूस निराशहोतो. आता विचार करा. यशाचे सुख ते मिळवण्यात आहे की प्रयत्नकरण्यात आहे? बहुतेक लोक म्हणतात की यश मिळाले की आनंदमिळतो.
पण आपण अपयशी ठरलो तर काय? म्हणून जेव्हा तुम्हीकोणतेही काम हाती घेता तेव्हा यश मिळाल्यानंतरच्या आनंदा एवढाआनंद प्रयत्न करतानाही असावा. अशी मानसिक तयारी करावी.आपल्याला कर्म करण्याची संधी मिळाली. हे सर्वात मोठे यश आहे. हाविजय आहे. हा आनंद आहे. जे घडेल ते घडणारच होते.
परंतु आपणपरिणामाबद्दल अति आशावादी, संशयी व घाबरतो. एक लक्षात ठेवा.आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि शिक्षण – भीतीमुळे बंद मुठीतीलबोटांतून निसटून जाते. म्हणूनच निर्भय होऊन प्रयत्न करा. कारणआपल्याला परिणाम व प्रयत्न दोन्हीचा आनंद कसा घ्यायचा हे ठाऊकआहे – हेच श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितले.


अनेकदा शरीराकडे आपलं दुर्लक्ष होतं. शरीरातील असे काही भाग असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही. अशावेळी शरीरातील काही अवयवांची होणारी चुकीची वाढ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून घातक असते. असाच एक अवयव पुरुषांच्या शरीरात असतो ते म्हणजे ‘स्तन’. ‘पुरुषांचे स्तन’ हे टेस्टिक्युलर कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि यकृत रोग यासारख्या अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जर पुरुषांना त्यांच्या छातीत किंवा शरीरात काही असामान्य बदल दिसले तर त्यांनी स्वतःची तपासणी करावी आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
डॉक्टर सूरज कुकडिया यांनी इशारा दिला आहे की, पुरुषांमध्ये छाती वाढली तर त्याचे प्रमुख कारण हे टेस्टिक्युलर कर्करोगाचे लक्षण असू शकते. जो स्तनाचा कर्करोग आणि यकृत कर्करोग असू शकतो. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले डॉक्टर सूरज कुकडिया यांनी या विषयी माहिती दिली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की पुरुषांच्या छातीशी संबंधित हे लक्षण अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
डॉक्टरांनी (संदर्भ) सांगितले आहे की, कधीकधी हे लक्षण सामान्य असते आणि त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही परंतु ते दुर्लक्षित केले जाऊ नये आणि ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे. हे लक्षण टेस्टिक्युलर कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि यकृत रोग दर्शवू शकते.
मोठे स्तन असणे म्हणजे काय?
डॉक्टर सूरज म्हणाले की, पुरुषांमध्ये मोठ्या स्तनांच्या लक्षणाला वैद्यकीय भाषेत गायनेकोमास्टिया म्हणतात. गायनेकोमास्टिया ही अशी स्थिती आहे जेव्हा मुलांचे किंवा पुरुषांच्या छातीवरील स्तन मोठे होतात. जेव्हा असे होते तेव्हा स्तनाग्र किंवा छातीत सूज आणि वेदना होऊ शकतात.
पुरुषांचे वाढणारे स्तन हे धोक्याचे लक्षण?
डॉक्टर म्हणतात की, ही समस्या खूप सामान्य आहे आणि अनेक लोकांना होते. त्यासाठी नेहमीच उपचारांची आवश्यकता नसते. परंतु कधीकधी ते गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते.
व्हिडिओ पहा
गायनेकोमास्टियाकडे दुर्लक्ष करु नका
डॉ. कुकडिया यांनी सांगितले की, गायनेकोमास्टिया हे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे ज्याकडे लक्ष दिले पाहिजे. ते यकृत रोग, टेस्टिक्युलर कर्करोग आणि अगदी स्तनाचा कर्करोग यासारख्या अनेक आजारांचे लक्षण असू शकते. अनेकदा असे मानले जाते की स्तनाचा कर्करोग फक्त महिलांना होतो, पुरुषांना नाही. डॉक्टर म्हणाले की पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या छातीत कोणतीही गाठ किंवा सूज दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
लक्षणे दिसल्यास काय करावे
डॉक्टरांनी सांगितले की, या परिस्थितीत, डॉक्टर तुमचा मागील वैद्यकीय इतिहास पाहतील, तुमची तपासणी करतील आणि गरज पडल्यास, रक्त तपासणी आणि हार्मोन प्रोफाइल सारख्या चाचण्या करू शकतात. चाचणी अहवालाच्या आधारे पुढील उपचार ठरवले जातात. परंतु हे लक्षण कधीही हलके घेऊ नका. डॉक्टरांनी सांगितले की गायनेकोमास्टियाची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये हार्मोनल असंतुलन, औषधांचे दुष्परिणाम, यकृत किंवा मूत्रपिंडाचा आजार किंवा थायरॉईड समस्या यांचा समावेश असू शकतो. जर ही लक्षणे दिसली तर न लाजता डॉक्टरांशी संपर्क साधा.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह (Mumbai) राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात धुव्वादार पाऊस (Rain) सुरू आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला असून लातूर, नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसाने मोठं नुकसान झालं असून मनुष्यहानी व जनावरेही दगावल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू झाला असून नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीही मुंबईसह महाराष्ट्रातील पूरस्थितीचा (Flood) आढावा घेतला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर, मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेचं दिसून आलं. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग देखील सुरू झाला आहे.
मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे. त्यानुसार, आज शाळा आणि महाविद्यालयांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर, लोकलसेवा खोळंबल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. मुंबईत ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा काही तास बंद राहिली. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ट्रांस हार्बर मार्गिकेवर पाणी असल्याने अनेक गाड्या या रेल्वे रुळाकर थांबल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी आणि गैरसोय झाली होती. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडाला आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे-मुंबई जाणाऱ्या अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. ज्या रस्त्यांवर पाणी साचले आहे, ते रस्ते रहदारी आणि वाहतुकीसाठी प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहेत. तसेच ठाण्यातील तलावांनी पाण्याची पातळी ओलांडली असून तलावातील पाणी रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहे. उपवन तलावाने देखील पाण्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने आसपासच्या परिसराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या उपवन तलावाकाठी दररोज पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मात्र पाण्याच प्रमाण जास्त असल्याने.ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना या ठिकाणी येण्यास बंदी घातली असून पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा परिणाम नदी नाल्यांवर झाला असून जिल्ह्यातील नदीला ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती ही पाण्याखाली गेली असून सूर्या देहर्जे वैतरणा या सर्वच नद्या दुसरीकडून व्हायला सुरुवात झाली आहे. सूर्या नदीला मोठा पूर आला असून सूर्या नदी इसारा पातळी ओलांडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नदी काठावर असलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालेय. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहतायेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. रोहा तहसीलदार व नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून फक्त अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरातील वाशिष्ठी आणि शिवनदीला पूर आल्याने पुराचे पाणी शहराच्या विविध भागांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. खेड तालुक्यात जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या नद्यांचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये तसेच बाजारपेठेत शिरले आहे. शासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे. चिपळूण शहराला आज दिवसभर पुराच्या पाण्याने वेढले होते, शहरातील शिव नदी आणि वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण, गोवळकोट, पेढे, मिरजोळी या भागातील शेतांमध्येही पुराचे पाणी दिवसभर होते. शहरातील पुराचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय.
पुणे जिल्ह्यातही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पर्यटननगरी लोणावळ्यात आज पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. अवघ्या दहा तासांत 150 मिलिमीटर पाऊस बरसलाय. सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान पावसाने विक्रमी नोंद केलीये. यंदाच्या मोसमात दहा तासांत पहिल्यांदाच पावसाने अशी बॅटिंग केलीये. घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केल्यानं अन तसा पाऊस ही बरसत असल्यानं लोणावळ्यातील सर्व शाळांना उद्या आणि परवा सुट्टी ही जाहीर केलेली आहे.
साताऱ्यातील कोयना धरण 100 टीएमसी भरले असून धरणातून 80 हजार 500 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय, पाटण तालुक्यातील नेरळे, मूळगाव, संगमनगर पूल पाण्याखाली गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम आणि कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने, कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात सहाव्यांदा कोयना धरणाचे दरवाजे उचलून 11 फुटावर नेण्यात आले आहेत. सध्या 80, हजार 500 क्युसिक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धोम धरणातून 8 हजार 659 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रात होत असून कण्हेर धरणातून 6 हजार 400 पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जात आहे. त्यामुळे कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे. पश्चिम भागातील अनेक नद्यांवरील पूल बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. पाटण तालुक्यातील मुळगाव , संगमनगर धक्का पूल त्याचबरोबर पाटण तालुक्यातील अनेक गावातील पूल पाण्यातले गेल्याने संपर्क तुटला आहे.
मराठवाड्यात 14 ऑगस्टपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये जीवितहानी देखील केली आहे. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 11 लोकांचा बळी गेला आहे. 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1154 गावांना पावसाचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील 4 लाख 38हजार 451 शेतकरी पावसामुळे बाधित झाले आहे. तसेच 3 लाख 58 हजार 370.55 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाला आहे.
नांदेडमधील लेंडी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणामध्ये वीस फूट पाणी वाढलं, जे काही नागरिक जागे होते त्यांनी गावकऱ्यांना जागं केलं. परंतु काही लोक गावात अडकली होती. त्या दुर्घटनेत गावातील चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सगळं काही होतं ते तिथेच राहिलं, त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली आहे. नांदेडमध्ये कालच्या पावसाने 5 बळी गेले असून आज 2 मृतदेह शोधण्यात आले आहेत.
मृतांची नावे
पिराजी म्हैसाजी थोटवे-वय 70
चंद्रकला विठ्ठल शिंदे- 45
ललिताबाई भोसले -60
भीमाबाई हिरामण मादाळे -65
गंगाबाई गंगाराम मादाळे-65
नांदेडमधील पूरस्थितीमुळे आणि लेडीं परिसरातील धरणग्रस्त नागरिकांची होत असलेले हाल लक्षात घेता, आआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुंबई विमानतळावरुन नांदेडला पोहोचले आहेत. तेथून मुखेड तालुक्यातील रावनगावात सर्च ॲापरेशनसाठी ते असणार आहेत. मराठवाड्यातील रावनगावात धरणाने पाणीसाठी ओलांडल्याने आणि नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावं लागले. मिठी नदीच्या पातळीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. गेल्या काही तासांमध्ये मिठी नदीची पातळी कमी झाली आहे. मात्र, येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपण सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी आणि वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला होता.
गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात 12 तालुक्यात 52.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून 15 मंडळात मुसळधार तर 10 मंडळात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सद्यस्थितीत 10 जिल्हा मार्ग बंद असून पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड-आल्लापल्ली हा राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. परिणामी तालुक्यातील 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून आपत्ती व्यवस्थापन करणारी नगरपालिकाच पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, हवामान विभागानुसार 20 तारखे पर्यंत विदर्भातील दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. 21 ऑगस्ट पासून मात्र पावसाचा जोर कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबईत पावसाचा हाहा:कार! रस्त्यावर पाणीच पाणी, लोकल सेवा ठप्प, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट