Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 152

“बोराटवाडीच्या मुलींचा हॉलिबॉलमध्ये डंका – तिन्ही गटांत विजेतेपदाची कमान!”

0
“बोराटवाडीच्या मुलींचा हॉलिबॉलमध्ये डंका – तिन्ही गटांत विजेतेपदाची कमान!”

साहस Times :-    जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय हॉलिबॉल मुलींच्या स्पर्धा माध्यमिक विद्यालय, म्हसोबावाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडीच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत तिन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगटातील संघानेही प्रथम क्रमांक पटकावला, तर १९ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता ठरला. विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक श्री. सदाशिव सावंत, श्री. चंद्रशेखर काळे व संघ व्यवस्थापक श्री. भीमराव खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष मा. सहकार मंत्री मा. श्री. हर्षवर्धन पाटील, संचालक उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष मनोजराव पाटील, सचिव किरणराव पाटील, प्राचार्य भीमराव आवारे, ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.

अयोध्या मंदिराचा भव्य देखावा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये – टाकाऊ वस्तूंपासून तयार, पाहण्यासाठी गर्दीचा उसळलेला उत्साह

0
अयोध्या मंदिराचा भव्य देखावा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये – टाकाऊ वस्तूंपासून तयार, पाहण्यासाठी गर्दीचा उसळलेला उत्साह

फलटण (दि. ३० ऑगस्ट २०२५) :फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी येथे यावर्षीच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरले आहे उत्तर प्रदेशातील श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिराचा देखावा.

या शाळेत दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ऐतिहासिक वा धार्मिक स्थळांची हुबेहुब प्रतिकृती उभारण्याची परंपरा आहे. मागील वर्षी येथे मनमोहन राजवाडा (श्रीमंत नाईक निंबाळकर राजघराण्याची वास्तू) याची प्रतिकृती उभारण्यात आली होती, जी पालक व नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती.

यावर्षीच्या देखाव्यात नव्याने तयार झालेल्या अयोध्या मंदिराची भव्य प्रतिकृती तसेच रामलला मूर्तीचे विराजमान विशेष आकर्षण आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा टाकाऊ वस्तूंपासून कुशलतेने साकारण्यात आला आहे.

शाळेतील सेवकवर्ग, कलाशिक्षक व शिक्षकवृंद यांनी गेल्या महिनाभराच्या मेहनतीतून हा देखावा पूर्ण केला. दरम्यान, गेले दोन दिवस पालक वर्ग तसेच फलटण व जाधववाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.

शाळेच्या प्राचार्या सौ. मीनल दीक्षित यांनी सांगितले की,

“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक व कलात्मकतेचा संगम असतो. त्यामुळे आमच्या शाळेत दरवर्षी अशा प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना कला, श्रम आणि सृजनशीलतेचा धडा दिला जातो.”

गणेश भक्त व नागरिकांनी या भव्य देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

लेखणीचा धारदार योद्धा – सचिन मोरे यांचा वाढदिवस आज”

0
लेखणीचा धारदार योद्धा – सचिन मोरे यांचा वाढदिवस आज”

फलटण :- फलटण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात अनेक दिग्गजांनी लेखणीच्या सामर्थ्याने समृद्ध परंपरा निर्माण केली आहे. त्यात आजच्या पिढीत आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्य समन्वयक आणि वरिष्ठ युवा पत्रकार सचिन संपतराव मोरे.

आज ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

लेखणीची धार – न्यायासाठी

“तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे,” हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश जीवनात उतरवणारे सचिन मोरे गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजाच्या व्यथा, वेदना मांडण्यासोबतच त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचे त्यांनी आपले ध्येय मानले आहे.

साप्ताहिकातून सुरुवात करताना तालुक्यातील छोट्या-मोठ्या घटकांना व्यासपीठ देणे, शंभरहून अधिक गावातील सामाजिक, व्यावसायिक व विकासात्मक प्रश्नांना आवाज देणे, हे त्यांच्या लेखणीचे बळ आहे.

प्रेरक वक्ता व प्रशिक्षक

सचिन मोरे हे केवळ पत्रकार नाहीत तर प्रभावी वक्ते व विक्री-विपणन क्षेत्रातील यशस्वी प्रशिक्षक आहेत. धैर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आणि दिल्ली येथे त्यांनी यशस्वी परिसंवाद घेतले आहेत. आजवर हजारो व्यवसायिकांना व वक्त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

समाजजागृतीचा ध्यास

“एक निर्धार बौद्ध आमदार” या संकल्पनेवर आधारित समाजजागृती मोहिमेदरम्यान त्यांची भाषणे समाजमाध्यमांवर गाजली होती. समाजातील प्रश्नांवर अभ्यास, चिंतन आणि योग्य तो मार्ग सुचविण्याची त्यांची शैली वेगळी आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सृजनशील संपादक, प्रेरणादायी वक्ते, समाजजागृतीचे ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व – सचिन मोरे यांना साहस Times यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये एल्गार; १ सप्टेंबरला ‘रास्ता रोको’

0
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये एल्गार; १ सप्टेंबरला ‘रास्ता रोको’

फलटण –मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीदरम्यान ओबीसींच्या हक्कांवर गदा येऊ नये, या भूमिकेसह फलटण तालुक्यात ओबीसी संघर्ष समितीने एल्गार पुकारला आहे. समितीने येत्या सोमवारी, दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नाना पाटील चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संत सावतामाळी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत समितीने स्पष्ट केले की, “आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे.” यावेळी जातनिहाय जनगणना करून मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

बैठकीत बापूराव शिंदे, भीमदेव बुरुंगले, डॉ. बाळासाहेब शेंडे, गोविंद भुजबळ, अमिरभाई शेख, शिवसेना तालुका प्रमुख पिंटू इवरे, संदीप नेवसे, मिलिंद नेवसे, दादासाहेब चोरमले, अजय माळवे, प्रा. बाळासाहेब घनवट यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

“ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असताना आम्ही शांत बसणार नाही. शासनाने कोणाच्याही मागणीसाठी ओबीसी समाजाचा बळी देऊ नये,” असा खणखणीत इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

वैद्यकीय चिकित्सेतून समाजसुधारणा – Marathi News | Krushnabai Kelavkar Medical Treatment Social Reform Ssb 93

0
वैद्यकीय चिकित्सेतून समाजसुधारणा – Marathi News | Krushnabai Kelavkar Medical Treatment Social Reform Ssb 93


डॉ. आनंदीबाई जोशी आणि डॉ. रखमाबाई राऊत यांसारख्या भारतीय स्त्री वैद्यकीय चिकित्सकांच्या योगदानाबरोबरच ते काम अधिक काळ करणाऱ्या अणि वैद्यकीय चिकित्सेतून समाजसुधारणा करणाऱ्या म्हणून डॉक्टर कृष्णाबाई केळवकर यांचे नाव अगत्याने घेतले जाते. २ सप्टेंबरच्या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांचे हे स्मरण.

भारतातील प्रारंभीच्या स्त्री डॉक्टरांपैकी एक आणि समाजसुधारणा चळवळीतही महत्त्वाचे योगदान असलेल्या डॉ. कृष्णाबाई केळवकर. १९२३ मध्ये कोल्हापूर येथे त्यांनी स्थापन केलेले ‘केळवकर वैद्यकीय केंद्र’ आज सुमारे एका शतकानंतरही वसाहतकालीन पितृसत्ताक वर्चस्व असलेल्या पाश्चात्त्य वैद्याकशास्त्रातील स्त्रियांच्या योगदानाची आठवण म्हणून उभे आहे. अलीकडच्या काळातील काही ऐतिहासिक संशोधनांमधून डॉ. आनंदीबाई जोशी आणि डॉ. रखमाबाई राऊत यांसारख्या भारतीय स्त्री वैद्यकीय चिकित्सकांच्या योगदानाची दखल घेणे शक्य झाले आहे. या अग्रणींमध्ये कृष्णाबाईंचे नावही अगत्याने घ्यावे लागते.

या स्त्री डॉक्टरांचे योगदान केवळ स्त्रियांच्या आरोग्यविषयक चळवळीपुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी स्वत:च्या शिक्षण आणि कार्यातून प्रस्थापित सामाजिक रूढींविरोधातही आव्हान निर्माण केले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात विविध धार्मिक-सामाजिक सुधारणा चळवळीस प्रारंभ झाला. त्यातून स्त्रिया आणि त्यावेळच्या तथाकथित अस्पृश्यांसाठी शिक्षणाची केंद्रे खुली झाली. या पार्श्वभूमीवर कृष्णाबाईंचे जीवनचरित्र त्यांच्या काळातील राजकीय-सामाजिक परिस्थितीपासून पूर्णत: वेगळे होऊन पाहता येणे शक्य नसले, तरी त्यांच्या व्यक्तित्वातील काही मुख्य गुणांकडे लक्ष वेधणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा

कृष्णाबाईंमधील जिद्द आणि धैर्यामुळे त्या सामाजिक दबावांपासून स्वतंत्र राहू शकल्या. शाहू महाराजांच्या सुधारणावादी कोल्हापूर संस्थानातील एका क्षत्रिय कुटुंबात कृष्णाबाईंचा जन्म (२६ एप्रिल १८७९) झाला, त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. शिवाय, त्यांच्या वडिलांना त्वचेवर परिणाम करणारा ‘पिंटा’ नावाचा एक दुर्मीळ संसर्गजन्य आजार जडल्याचे निदान झाले. कृष्णाबाईंची आई रखमाबाई, यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत साहाय्य करण्यासाठी प्रथम कोल्हापूर दरबारात आणि त्यानंतर ‘स्त्री प्रशिक्षण संस्थे’मध्ये अध्यापनाचे कार्य केले होते.

वसाहतवादी काळात हळूहळू वाढत असलेल्या सामाजिक चळवळींचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतील समाजसुधारकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून समाजसुधारणा चळवळीला अर्थसहाय्य केले. कृष्णाबाईंनाही शिक्षणासाठी शाहू महाराज आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्याोगपती जमशेदजी टाटा यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. कृष्णाबाईंची शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. १९०२ मध्ये कृष्णाबाई त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा भाग म्हणून डब्लिन (आयर्लंड) येथे ‘प्रसूतीशास्त्र आणि स्त्रियांचे आजार’ या विषयातील शल्यचिकित्से-संबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेल्या. त्यावेळी सरकारी निधीव्यतिरिक्त, ‘जे.एन. टाटा एंडॉवमेंट फंड’ने कृष्णाबाई आणि ‘ग्रँट मेडिकल महाविद्यालया’मधील त्यांची सहकारी पदवीधर फ्रीनी कामा यांना आर्थिक सहकार्य केले. १८९२ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फंड टाटांच्या विधायक लोकोपकाराचा पहिला उपक्रम होता. टाटा यांनी स्वत: कृष्णाबाई आणि कामा यांची निवड केली होती. सातत्याने वाढत असणारा बालमृत्युदर, स्त्री डॉक्टरांची कमतरता आणि पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेण्यास भारतीय स्त्रियांनी दाखवलेली अनिच्छा यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय स्त्री डॉक्टरांना समर्थन आणि प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी ओळखली होती.

१८९३ मध्ये कृष्णाबाईंनी पुणे येथील ‘फिमेल हायस्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केले. स्त्रीशिक्षणाला चालना देण्यासाठी ‘आर्य महिला समाजा’ने या शाळेची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त प्रवेश घेतला. जिथे त्यांनी इतर विषयांसह इंग्रजी, संस्कृत आणि गणित या विषयांचे अध्ययन केले. कृष्णाबाईंच्या वडिलांकडूनही (कृष्णाजी केळवकर) त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला पाठिंबा मिळाला. गोदुबाई देशपांडे यांच्यासह विशेष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी या संस्थेत प्रवेश घेतलेल्या कृष्णाबाई या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. ‘फर्ग्युसन महाविद्यालया’त असताना संस्थेच्या व्यवस्थापनाकडून त्यांना लिंगाधारित भेदभावाचा कसा सामना करावा लागला यासंदर्भात कृष्णाबाई आपल्या आत्मचरित्रात लिहितात.

‘‘… आम्हा मुलींना वर्गाच्या एका कोपऱ्यात शिक्षकांच्या बाजूला बसायला जागा दिली जात असे. आमच्या सभोवताली वेताचे पडदे असत. ‘पर्दा’प्रथेत त्या पडद्याच्या पलीकडे बसणाऱ्या स्त्रियांना काय वाटत असेल याचा तेव्हा मला जवळून अनुभव आला. आमच्यासाठी वेगळा जिना ठेवलेला असे. या सर्व दक्षतेची खरं तर काहीच गरज नव्हती हे ओघाने नंतर लक्षात आलेच. आमच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आमच्या प्रती असलेल्या वागणुकीबद्दल तक्रार करण्याचा प्रसंग कधी आलाच नाही. हेच पडदे पुढच्या सत्रात अदृश्य होण्याचे कदाचित हे एक कारण असू शकेल.’’ लिंगभेदावर आधारित वेगळेपणाच्या या पद्धती अनावश्यक आणि अन्यायकारक आहेत, अशी त्यांची ठाम भूमिका होती. मात्र तरीही त्यामुळे स्वत:च्या सहाध्यायांना (मुख्यत: पुरुष) वाईट वागणूक देण्याची अथवा त्यांच्याबद्दल संशय बाळगण्याची गरज त्यांना कधीही वाटली नाही. त्यांच्या वडिलांनी मात्र या अन्यायी प्रथेविरुद्ध महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती.

हेही वाचा

‘फर्ग्युसन महाविद्यालया’तील अनुभवांनी कृष्णाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली. १८९५ मध्ये पहिल्या श्रेणीत पदवीधर झाल्यानंतर कृष्णाबाईंमध्ये त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक भूमिकेबद्दलची स्पष्ट जाणीव विकसित झालेली दिसते. त्यांनी मुंबईच्या (तेव्हाच्या बॉम्बे) ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’मध्ये प्रवेश घेतला. त्यासोबतच प्रार्थना समाजाचे कायमस्वरूपी सभासदत्व स्वीकारले.

१९०१ मध्ये नव्यानेच वैद्यकीय प्राशिक्षण पूर्ण केल्यानंतर कृष्णाबाई कोल्हापुरात स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी ‘अल्बर्ट एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये स्त्री विभागाच्या प्रमुख म्हणून स्त्रिया आणि मुलांसाठी सहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. पाश्चिमात्य वैद्याकशास्त्रात एम.डी.पदवी मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री डॉ. आनंदीबाई जोशी यांचा क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्यानंतर कृष्णाबाईंची त्यांच्या जागी वर्णी लागली.

कृष्णाबाईंनी कोल्हापुरात प्रसूतिसेवा विकसित करण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली १९०३ ते १९२३ या काळात ‘मातृत्व आणि बालकल्याण प्रणाली’त आमूलाग्र बदल घडून आला. कृष्णाबाईंनी सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसूतिपद्धती आणि अर्भकांची काळजी घेण्याबद्दल जनजागृती करण्याचे काम केले. त्यांनी ‘निरोगी बाळ जन्माला यावे म्हणून आईवडिलांनी घ्यावयाची काळजी’, ‘निषिद्ध गर्भारपण’, ‘लागोपाठच्या बालकांमध्ये किमान किती वयाचे अंतर असावे’ अशा शीर्षकांसह विविध लेख प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्याची कोल्हापूर संस्थानासोबतच मुंबई परिसरात, इतरत्रही प्रशंसा होऊ लागली. १९०८ मध्ये भारतातील सार्वजनिक सेवेतील योगदानाबद्दल ब्रिटनच्या राजाकडून ‘कैसर-ए-हिंद’ (रौप्य) ही पदवी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कार्याचे वर्णन करताना ‘हिंदी पंच’ हे तत्कालीन आंग्ल-गुजराती नियतकालिक लिहिते, ‘केवळ कृष्णाबाईंचे औषध आणि त्यांची शस्त्रक्रियेची सुरीच रोगांना बरे करत नाही तर त्यांचे गोड स्मितहास्य आणि त्यांचे मृदू उपचारही रोगांना तितकेच लवकर बरे करतात.’ त्यांच्या कार्याची अशी योग्य दखल घेण्यामधून त्या तत्कालीन मुंबई परिसरातील स्त्री डॉक्टरांच्या तरुण पिढीसाठीही प्रेरणास्थान बनल्या.

१९२२ मध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर कृष्णाबाईंना त्यांच्या सार्वजनिक सेवेत प्रबळ राजकीय पाठिंबा देणारा हात उरला नाही. पुरुषी वर्चस्व असलेल्या नोकरशाहीत त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला. परिणामत: त्यांनी त्यांच्या वैद्यकीय सार्वजनिक सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र त्यानंतरही त्यांनी खासगी पातळीवर त्यांची सेवा चालूच ठेवली. त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हापूर येथे ‘केळवकर वैद्यकीय केंद्रा’ची स्थापना केली. या संस्थेशी त्या दीर्घकाळ सलगभन होत्या.

नंतरच्या काळात जरी स्त्रियांसाठी उच्च शिक्षणामधील संधीमध्ये हळूहळू वाढ होत असली, तरी वैद्यकीय क्षेत्रांसहित इतर अनेक क्षेत्रांमध्ये जातिधारित आणि लिंगाधारित भेदभावाचे प्रमाण लक्षात घेता आज एकविसाव्या शतकातही सामाजिक सुधारणेची आवश्यकता टिकून राहिली आहे. मे २०१९ मध्ये पायल तडवी या एका आदिवासी समाजातून आलेल्या महत्त्वाकांक्षी स्त्रीरोगतज्ज्ञ मुलीने आत्महत्या केली. मुंबईतील ‘नायर रुग्णालयामध्ये’ मध्ये वैद्यकीय विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तिला स्त्री सहकाऱ्यांकडून जातिधारित छळाचा सामना करावा लागल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप होता. तिची व्यावसायिक कामगिरी समाजातील अंगभूत असमानतेला आणि अन्यायाला मागे टाकू शकली नाही. धर्म-जात-लिंग वर्चस्व असलेल्या या समाजात अजूनही स्त्रियांना समानतेने वागवले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

२ सप्टेंबर १९६१ मध्ये निधन पावलेल्या कृष्णाबाईं- सारख्या प्रारंभीच्या स्त्री डॉक्टरांच्या उल्लेखनीय कार्याचे स्मरण करण्यातून व्यापक पातळीवर आपण आपल्या भारतीय वैद्यकीय व्यवसाय आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सामाजिक सुधारणेच्या अपूर्ण कार्याकडेही लक्ष वेधले जातेच. त्यामधूनच पुन्हा जाति-धर्म-लिंगाधारित विषमतेला आव्हान देण्याचे मार्ग नव्याने निर्माण होतील.

(लेखिका बीआयटीएस लॉ स्कूल, मुंबई येथे इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत.)

अनुवाद अनिकेत लखपती – aniketlakhpati98@gmail.com

मृण्मयी साटम -satam924@gmail.com





Source link

कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण

0
कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण


फलटण : मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांचे निधन झाले.आज त्यांचे अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रम होता.आज दिनांक 29/08/2025 रोजी अस्थि संकलन करुन प्रवाही पाण्यात विसर्जन केले जाणार होते. पण या पारंपारिक प्रथेला फाटा देऊन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या बौद्ध धम्मातील विज्ञानवादी दृष्टिकोन व पर्यावरण संवर्धन व रक्षणाचा विचार ऐकून अस्थि विसर्जन प्रवाही पाण्यामध्ये न करता कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या अस्थी त्यांच्याच रानात मिसळून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ बोधिवृक्ष पिंपळ व आंब्याचे झाड लावून त्यांच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. यावेळी उपस्थित असणारे हिंगणगाव मधील ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका व या अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन विधीसाठी आलेले नातेवाईक व आप्तेष्ठ यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांच्या माध्यमातून विज्ञानवादी दृष्टिकोन व पर्यावरण रक्षणाविषयी धम्म उपदेश केला.त्यांनी जग हे अनित्य असून आपल्या कुटुंबातील जिवलग व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या स्मृती म्हणून वृक्षारोपण करून येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा विचार मांडला. त्यांच्या या विचाराला पाठिंबा देत सर्व कुटुंबीयांनी हा निर्णय घेऊन पर्यावरण रक्षणाचा व संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी धीरज बजरंग काकडे, सूरज भीमराव काकडे, सागर जगदीश बागडे, ताराचंद बापूराव काकडे, अभिजीत प्रकाश कांबळे
गणेश संतोष जगताप, ॲड.सरेंद्र सरतापे, विशाल राजेश काकडे, सुरज भीमराव काकडे हे वृक्षारोपण करते वेळी उपस्थित होते.

“फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याचे काम मोबदल्याविना – रामराजेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव”

0
“फलटण-दहिवडी मार्गावरील रस्त्याचे काम मोबदल्याविना – रामराजेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव”

फलटण :- फलटण-दहिवडी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आता राजकीय पातळीवर गेला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

कोळकी ते दुधेभावी या मार्गावरील शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू झाल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही कारवाई केल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

याबाबत काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्या अनुषंगाने आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सविस्तर माहिती दिली आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले.

रामराजे यांनी स्पष्ट केले की, “मी लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण तालुक्यातील सराईत गुन्हेगार टोळीवर कडक कारवाई – दोन वर्षांसाठी हद्दपारी

0
फलटण तालुक्यातील सराईत गुन्हेगार टोळीवर कडक कारवाई – दोन वर्षांसाठी हद्दपारी

फलटण : – फलटण तालुक्यात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी आणि दरोड्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीवर अखेर कडक कारवाई करण्यात आली आहे. स्वप्नील उर्फ बाळू सुरेश जाधव (वय 24) आणि निखील उर्फ काळू सुरेश जाधव (वय 25, दोन्ही रा. तावडी, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत संपूर्ण सातारा जिल्हा व लगतच्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

प्रशासनाची जलद कारवाई

टोळीवर जबरी चोरी, दरोडा, चैन स्नॅचिंग यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. वारंवार अटक आणि प्रतिबंधक कारवाई होऊनही ही टोळी गुन्हेगारी थांबवत नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता आणि कडक कारवाईची मागणी होत होती.

फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह यांच्या प्रस्तावावरून पोलिस अधीक्षक सातारा तथा हद्दपार प्राधिकरण मा. तुषार दोशी यांनी सुनावणी घेऊन आदेश जारी केला.

कारवाईमागील तपास व पुरावे

तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आर. धस यांनी चौकशी केली. सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व त्यांचे पथक – पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, बापू धायगुडे व जितेंद्र टिके – यांनी आवश्यक पुरावे सादर केले.

सणासुदीच्या काळात वाढीव सतर्कता

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाचा मंगलमय उत्सव आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये

0
गणेशोत्सवाचा मंगलमय उत्सव आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये

फलटण – पारंपरिक उत्साह, भक्तीभाव आणि आनंदाचा संगम अनुभवायला मिळाला, जेव्हा आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर व बिरदेवनगर शाखांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात पार पडले.

सकाळपासूनच शाळेच्या परिसरात आनंदी व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण हॉल सुंदर सजावट व रंगीत रांगोळ्यांनी खुलून गेला होता. विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात बाप्पाचे स्वागत केले.

मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनी औक्षण केले, तर शाळेचे सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. महाआरती, भजने आणि ढोल-ताशांचा गजर वातावरण अधिकच मंगलमय करणारा ठरला.

शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, सेंटर हेड सुचिता जाधव मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गुळ-उकडीच्या मोदकांचा प्रसाद वाटण्यात आला.

या उत्सवातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील परंपरांचे महत्त्व, एकात्मतेची प्रेरणा व भक्तीचा अनुभव घेतला. शाळेच्या दोन्ही शाखांतील हा अविस्मरणीय सोहळा मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे अधिक प्रभावी ठरला.

‘ऑपरेशन सिंदूर’,शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर प्रहार, नागपुरातील पुरीच्या गणपतींचे वादग्रस्त देखावे चर्चेत – Marathi News | Nagpur Puri Ganpati Decoration Highlighted Operation Sindoor And Farmer Suicides Criticizing Central And State Governments Sud 02

0
‘ऑपरेशन सिंदूर’,शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर प्रहार, नागपुरातील पुरीच्या गणपतींचे वादग्रस्त देखावे चर्चेत – Marathi News | Nagpur Puri Ganpati Decoration Highlighted Operation Sindoor And Farmer Suicides Criticizing Central And State Governments Sud 02



‘ऑपरेशन सिंदूर’,शेतकरी आत्महत्यांवरून सरकारवर प्रहार, नागपुरातील पुरीच्या गणपतींचे वादग्रस्त देखावे चर्चेत – Marathi News | Nagpur Puri Ganpati Decoration Highlighted Operation Sindoor And Farmer Suicides Criticizing Central And State Governments Sud 02 – Latest Nagpur News at Loksatta.com





Source link