Monday, July 6, 2026
Home Blog Page 122

बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

0
बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

“मत त्यालाच, जो न्यायासाठी उभा राहील – समाज मंदिराचा प्रश्न निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार!”

फलटण, दि. १५ ऑक्टोबर:  साखरवाडीतील आंबेडकरी समाजाच्या बुद्ध विहारासाठीचा लढा आता साखरवाडी संघर्ष #बुद्ध विहार हक्काचा ,वंचित बहुजन आघाडी ,ZP 2025 ,प्रकाश आंबेडकर ,दलित ओबीसी एकत्र ,मत हक्कासाठी संघर्ष ,संविधान वाचवा ,समाज मंदिर हक्कानेकेवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय व्यासपीठावरही पोहोचला आहे. २०२५ हे वर्ष संघर्षमय ठरणार, याची सुरुवातच संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रद्द होण्यापासून झाली.

ही रद्द झालेली जयंती समाजासाठी एक अपमान ठरली. कारण बाबासाहेबांची जयंती हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर समाजाच्या आत्मसन्मानाचा उत्सव असतो. समाज मंदिराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आलेल्या दिरंगाईमुळे आणि सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या दुर्लक्षामुळे हे दुर्दैवी चित्र समोर आले.

       मागणीचा केंद्रबिंदू – शासकीय जागा हवीच!

गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेला बुद्ध विहाराचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. ग्रामपंचायतीने गावठाण हद्दीत जागा नाही, असा लेखी ठराव देऊन जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे समाजाची मागणी सरळसरळ शासकीय जागेसाठी आहे – आणि ती साखरवाडीत उपलब्ध देखील आहे.

            पाच ठोस मुद्दे समाजाच्या मागणीसाठी:

  1. गावठाण जागेचा मुद्दा संपलेला आहे. आता शासकीय जागाच हवी.
  2. गट क्र. १७१९ ते १७२४ मध्ये रिक्त शासकीय जागा असून ती समाज मंदिरासाठी न्याय्य आहे.
  3. सदर जागा पूर्वी पोलीस स्टेशनसाठी राखीव होती, पण आता रिकामी आहे. नवीन पोलीस स्टेशन इतरत्र हलवले गेले आहे.
  4. आंबेडकरी समाजात उच्चशिक्षित, जाणता आणि संघटित तरुणवर्ग तयार झाला आहे, जो आता आवाज उठवत आहे.
  5. प्रस्थापित पक्षांचा फक्त मतांसाठी वापर – यावेळी दलित व ओबीसी समाज सजग, निर्णायक भूमिका घेणार.

सामाजिक लढ्याचं रूपांतर राजकीय रणधुमाळीत!

साखरवाडी–पिंपळवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

अक्षय साळवे या तरुण समाज नेत्याने जाहीर केले आहे की, “जो समाजासोबत राहील, त्यालाच सत्ता. जो न्यायासाठी लढेल, त्यालाच मत!

आगामी ZP निवडणुकीत बुद्ध विहाराच्या जागेचा मुद्दा केवळ प्रमुख नाही, तर निर्णायक ठरेल. प्रत्येक गाव, वाडी, गल्लीबोळात हा प्रश्न पोहोचवून मतदार जागृत केला जाणार आहे.

     प्रकाश आंबेडकर यांची भेट आणि राजकीय रणशिंग:

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हीच आता दलित–ओबीसी समाजासाठी पर्याय ठरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच सामान्यांचा आवाज बुलंद केला आहे, त्यामुळे या गटात इतर मागासवर्गीय समाजही वंचितसोबत येण्याची शक्यता आहे.

       लढा केवळ जागेचा नाही, तर सत्तेतील सहभागाचा आहे!

“बुद्ध विहार नाकारलं, पोलिसांकडून दडपशाही झाली, सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला – हे सगळं जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत,” असा इशारा दिला जात आहे.

    आवाज बुलंद – ध्येय स्पष्ट:

“प्रस्थापित नेत्यांचं गुलाबपुष्पाने स्वागत होणार नाही, तर लोकशाहीच्या ताकदीने उत्तर दिलं जाईल!”

साखरवाडीतील बुद्ध विहाराचा प्रश्न हा केवळ जागेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता दलित–ओबीसी समाजाच्या सन्मानाचा, आत्मभिमानाचा आणि राजकीय सहभागाचा लढा ठरत आहे. यावेळी प्रस्थापितांना सहज विजय मिळणार नाही, कारण या निवडणुकीचा केंद्रबिंदू असेल –
“सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि समाज मंदिराचा लढा!”

फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

0
फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

फलटण, : कामगार संघर्ष संघटना ही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभी राहणारी संघटना आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी संघटनेचे पदाधिकारी रात्रंदिवस अहोरात्र झटत आहेत.

आता 2025/26 च्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगार संघर्ष संघटना विविध पक्षांसोबत युती करून ताकदीने रिंगणात उतरणार आहे. फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 7 आणि 10 या भागांमध्ये आमचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष सुरजभाऊ भैलुमे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की,

ही संधी आहे सत्तेत जाऊन समाजाच्या हितासाठी थेट लढण्याची. मतदार मायबापांनी आजवर आम्हाला भरभरून साथ दिली, आणि याहीवेळी तुमचा विश्वासच आमची ऊर्जा असेल.

या निवडणुकीत कामगार संघर्ष संघटना एक मजबूत, पारदर्शक आणि लोकहितवादी प्रशासन उभं करण्याचा निर्धार घेऊन उतरते आहे.

     जाहीर आवाहन:

“मतदार दात्यांनो, तुमची साथ हवी आहे. परिवर्तनाची सुरुवात तुमच्या मताने होईल!”

✍️ – सुरजभाऊ भैलुमे

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष
कामगार संघर्ष संघटना

फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

0
फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

फलटण, : कामगार संघर्ष संघटना ही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभी राहणारी संघटना आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी संघटनेचे पदाधिकारी रात्रंदिवस अहोरात्र झटत आहेत.

आता 2025/26 च्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगार संघर्ष संघटना विविध पक्षांसोबत युती करून ताकदीने रिंगणात उतरणार आहे. फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 7 आणि 10 या भागांमध्ये आमचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष सुरजभाऊ भैलुमे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की,

ही संधी आहे सत्तेत जाऊन समाजाच्या हितासाठी थेट लढण्याची. मतदार मायबापांनी आजवर आम्हाला भरभरून साथ दिली, आणि याहीवेळी तुमचा विश्वासच आमची ऊर्जा असेल.

या निवडणुकीत कामगार संघर्ष संघटना एक मजबूत, पारदर्शक आणि लोकहितवादी प्रशासन उभं करण्याचा निर्धार घेऊन उतरते आहे.

     जाहीर आवाहन:

“मतदार दात्यांनो, तुमची साथ हवी आहे. परिवर्तनाची सुरुवात तुमच्या मताने होईल!”

✍️ – सुरजभाऊ भैलुमे

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष
कामगार संघर्ष संघटना

फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

0
फलटण नगरपालिकेत परिवर्तनाची चाहूल – कामगार संघर्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात !

फलटण, : कामगार संघर्ष संघटना ही नेहमी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभी राहणारी संघटना आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा जनतेला मिळाव्यात यासाठी संघटनेचे पदाधिकारी रात्रंदिवस अहोरात्र झटत आहेत.

आता 2025/26 च्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कामगार संघर्ष संघटना विविध पक्षांसोबत युती करून ताकदीने रिंगणात उतरणार आहे. फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 1, 2, 3, 5, 7 आणि 10 या भागांमध्ये आमचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत.

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष सुरजभाऊ भैलुमे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की,

ही संधी आहे सत्तेत जाऊन समाजाच्या हितासाठी थेट लढण्याची. मतदार मायबापांनी आजवर आम्हाला भरभरून साथ दिली, आणि याहीवेळी तुमचा विश्वासच आमची ऊर्जा असेल.

या निवडणुकीत कामगार संघर्ष संघटना एक मजबूत, पारदर्शक आणि लोकहितवादी प्रशासन उभं करण्याचा निर्धार घेऊन उतरते आहे.

     जाहीर आवाहन:

“मतदार दात्यांनो, तुमची साथ हवी आहे. परिवर्तनाची सुरुवात तुमच्या मताने होईल!”

✍️ – सुरजभाऊ भैलुमे

सातारा जिल्हा युथ अध्यक्ष
कामगार संघर्ष संघटना

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम एस एस सी  स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत जल्लोषात यश!

0
श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम एस एस सी  स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत जल्लोषात यश!

फलटण प्रतिनिधी :- 13 व 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, एस.एस.सी., जाधववाडी, फलटण येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत, विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

🏅 विजयी विद्यार्थी – मुले :

  1. कबी खान – भालाफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष), थाळीफेक (द्वितीय क्रमांक)
  2. अमन निकाळजे – थाळीफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष)
  3. श्रेयश भोसले – भालाफेक (प्रथम क्रमांक, 17 वर्ष), गोळाफेक व थाळीफेक (तृतीय क्रमांक)
  4. श्रेयश ढेकळे – भालाफेक व 800 मी. धावणे (द्वितीय क्रमांक, 17 वर्ष)
  5. प्रणय जगताप – 100 मी. धावणे (द्वितीय क्रमांक, 17 वर्ष)
  6. मधुसूदन जाधव – थाळीफेक (तृतीय क्रमांक, 14 वर्ष)

🏅 विजयी विद्यार्थिनी – मुली :

  • 4×100 मी. रिले – प्रथम क्रमांक
    • श्रेया पवार, अनुष्का नाईक निंबाळकर, श्रावणी पिंगळे, मनस्वी गायकवाड, तनिष्का भगत
  • स्मिता माने – थाळीफेक (प्रथम क्रमांक, 19 वर्ष), गोळाफेक (द्वितीय क्रमांक)
  • श्रावणी पिंगळे – गोळाफेक (तृतीय क्रमांक, 14 वर्ष)

या गौरवप्राप्त यशाबद्दल मा. श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर (माजी सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद), चेअरमन श्री. रघुनाथराजे निंबाळकर, सचिव श्री. संजीवराजे निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, फलटण क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, प्राचार्या प्रा. अंजुम शेख, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशात प्रा. अंजुम शेख, सुहास कदम सर, परविन मुलाणी मॅडम आणि इतर शिक्षकवर्ग व पालकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीचे महत्त्वाचे योगदान आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार,’सन्नाटा’वरुन राज ठाकरेंनाही टोला

0



सातारा : राज्यातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगात जाऊन आयुक्तांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. तसेच, मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात येईपर्यंत निवडणुका पुढे ढकला अशी मागणीच विरोधकांनी केली आहे. त्यावर, आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्र्‍यांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांची ही महा कन्फ्यूजन आघाडी असून पराभव दिसू लागल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच, अशा पद्धतीची मागणी करत, असे प्रकारचे वक्तव्य महाविकास आघाडीकडून (MVA) केलं जात आहेत, असे शिंदेंनी म्हटले. तसेच, पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या पॅकेटवरुनही विरोधकांना टोला लगावला.

महायुती जिंकणार याची खात्री विरोधकांना झालीय. विधानसभेत झालेल्या पराभव पराभवामुळे विरोधकांची मानसिकता खचली आणि निवडणुकांना सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळेच, निवडणुका पुढे ढकला, अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीकडून केलं जात आहे. सगळे एकत्र आल्यामुळे जिंकण्याची खात्री विरोधकांना पटली पाहिजे होती. मात्र, जिंकण्याची खात्री नसल्यामुळे महायुती जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे, त्यामुळेच अशी मागणी केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटले.

महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या तेव्हा निवडणूक आयोग चांगला होता, त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, निवडणूक आणि ईव्हीएम मशीन सुद्धा चांगली होती आणि आता हरल्यानंतर निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत आहेत. ईव्हीएम मशिनची प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, ही आमच्या महायुतीच्या काळात किंवा इंडियाच्या काळात सुरू झालेली नाही, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या यशानंतरही सर्वत्र सन्नाटा, असे म्हटले. त्यावरुन, एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. सन्नाटा आमच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे, हे सगळे लोक कन्फ्यूज झालेले आहेत. हे लोक सगळे एकत्र येतात तेव्हा जिंकण्याची खात्री पटली पाहिजे, पण निवडणूक पुढे ढकला म्हणतात म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही, असे म्हणत राज ठाकरेंनाही शिंदेंनी टोला लगावला. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकतीने उतरणार आहे आणि आम्ही 2.5 ते 3 वर्षांमध्ये कामं केलेलं आहे. विकासाचे लोकाभिमुख काम सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. आमच्या लाडक्या बहिणी विरोधकांना या ठिकाणी चारीमुंड्या चित करतील, असेही शिंदेंनी म्हटले.

उद्धव ठाकरेंचा फोटो लावलाय ना, चांगलय

दरम्यान, शिवसेना उबाठा पक्षाकडून पूरग्रस्तांना मदतीचे कीट दिले जात आहेत. या कीटवर उद्धव ठाकरेंचा फोटो लावल्यासंदर्भात एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, उद्धव ठाकरे यांचा फोटो लावलाय ना, चांगलं आहे मला काही अपेक्षेप नाही, असे शिंदेंनी म्हटले. दरम्यान, पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतकीटवर एकनाथ शिंदेंच्या फोटोवरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. त्यावरुन, शिंदेंना उपरोधात्मक टीका केली.

हेही वाचा

भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं; मैथिलीचं वय अन् इंस्टावर किती फोलोअर्स?

आणखी वाचा



Source link

दिवाळीत काचेसारखी नितळ त्वचा हवीय? ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 सोप्या टिप्स

0
दिवाळीत काचेसारखी नितळ त्वचा हवीय? ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 सोप्या टिप्स


सण आपल्याला आनंद देतात. दिवाळी म्हटलं की, त्याची सुरुवात खूप आधीपासून होते. अगदी साफसफाईपासून  ते फराळापर्यंत सगळ्याच गोष्टी दमवणाऱ्या असतात. या सगळ्यानंतर दिवाळीत अनेक पाहुण्यांना भेटी द्यायच्या असतात. एवढंच नव्हे तर सध्या दिवाळी पार्टीचा देखील ट्रेंड आहे. अशावेळी ऐन दिवाळीत आपला ग्लो कमी होतो. चेहरा सुकल्यासारखा आणि कोमेजलेला दिसतो. असं म्हणून म्हणून नेमकं काय करालं? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर  यांनी सांगितल्या खास टिप्स. 

Add Zee News as a Preferred Source

स्वतःला हायड्रेट ठेवा 

सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे स्वतःला हायड्रेट ठेवणं. कोणताही सण असो किंवा दैनंदिन दिवस स्वतःला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही डिहायड्रेट झालात तर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि निस्तेज त्वचेला सामोरं जावं लागेल. त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची त्वचा देखील तजेलदार राहील. 

केळं न चुकता खा 

ऋजुता दिवेकरने सांगितलेला आणखी एक पर्याय म्हणजे न चुकता दररोज केळं खा. दिवाळीत अनेक पार्टी होतात. अशावेळी पार्टीला जाण्यापूर्वी केळं खाणं पसंत करा. केळं प्रीबायोटिक आहे. त्यामुळे पचनाला नक्कीच मदत होते. सणासुदीला आपण वेळीअवेळी खातो. अशावेळी पचनाचा त्रास होऊ नये म्हणून केळ्याचा वापर करावा. यामुळे तुम्हाला जड वाटणार नाही. 

ताकात हा पदार्थ घालायला विसरु नका 

दिवाळीत आजारी पडू नये म्हणून ऋजुता दिवेकरने ताक पिण्याचा सल्ला दिला आहे. या ताकात सैंदव मीठ, जीरं आणि चिमुटभर हिंग घालायला विसरु नका. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच यामुळे चेहरा अगदी कोरियन लोकांसारखा चमकेल. 

ऋजुता दिवेकरचा व्हिडीओ 

FAQ 

त्वचा चमकदार कशी ठेवावी याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

चमकदार त्वचेसाठी हायड्रेशन किती महत्त्वाचे आहे?

पाणी पिण्यामुळे त्वचा लवचिक राहते, कोरडेपणा कमी होतो, विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि लवचिकता वाढते. हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे, विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा तुम्ही जास्त गोड आणि तळलेले पदार्थ खाण्याची शक्यता असते.

पार्टीपूर्वी केळी खाल्ल्याने माझ्या त्वचेला फायदा होतो का?

हो, केळीमध्ये बी६ सारखे जीवनसत्त्वे भरपूर असतात, जे पचन सुधारतात, ऊर्जा पातळी वाढवतात आणि चांगला मूड राखतात. पार्टीपूर्वी केळी खाल्ल्याने तुम्हाला अन्नाचा आनंद घेता येतो आणि त्वचा चमकदार राहते.

ताक पिण्याचे काय फायदे आहेत?

ताक आम्लता कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. काळे मीठ, जिरे आणि हिंग घालल्याने हे फायदे वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही ताजेतवाने आणि दुसऱ्या दिवसासाठी तयार दिसता.

रात्री उशिरा पार्टीनंतर त्वचा तजेलदार कशी ठेवाल?

थोडे काळे मीठ, जिरे आणि चिमूटभर हिंग घालून एक ग्लास चाळ प्या. हे पेय तुम्हाला रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमधून बरे होण्यास आणि तुमची त्वचा ताजी दिसण्यास मदत करेल.

सणासुदीच्या काळात चमकणारी त्वचा राखण्यासाठी टिप्स काय आहेत?

हायड्रेटेड रहा, पार्ट्यांपूर्वी केळी खा आणि रात्री उशिरा होणाऱ्या कार्यक्रमांनंतर चाळ प्या. या सोप्या टिप्स तुम्हाला सणासुदीच्या काळातही चमकणारी त्वचा राखण्यास मदत करू शकतात.





Source link

फलटण नगरपालिकेतील कार्याचा ठसा, रामराजेंचा विश्वास आणि सामाजिक कार्यातील पत्नीची भक्कम साथ

0
फलटण नगरपालिकेतील कार्याचा ठसा, रामराजेंचा विश्वास आणि सामाजिक कार्यातील पत्नीची भक्कम साथ

फलटण (प्रतिनिधी) — हरीष काकडे हे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यात पत्नीची भक्कम साथ असल्यामुळेच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यात यश मिळवले आहे. दिव्यांगांसाठी शासकीय निधी मिळवून देणे, पेन्शन सुरू करून देणे अशा महत्वाच्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

न्यायहक्कासाठी मोर्चे, आंदोलने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग असून नगरसेवक सनी (दादा) अहिवळे यांच्यासह त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

या कार्याची दखल घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरीष काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या संधीचा उपयोग करत काकडे यांनी बौद्ध व मागासवर्गीय समाजाच्या समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगळवार पेठेतील मतदारांना प्रभावीत करून, सनी अहिवळे यांच्या सहकार्याने उमेदवारासाठी लक्षणीय लीड मिळवण्यातही ते यशस्वी ठरले.

आज मंगळवार पेठेतील नागरिक हरीष काकडे यांच्या पत्नीच्या माध्यमातून, काकडे यांना फलटण नगरपालिकेत संधी मिळेल का याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या कामाची पारदर्शकता व लोकहिताचे दृष्टिकोन पाहता ही संधी त्यांना मिळावी अशी जनतेत भावना आहे.

फलटणच्या राजकारणात महिला नेतृत्वाची नवी आशा – प्रभाग 3 मधून पूनम भोसले यांची उमेदवारी चर्चेत

0
फलटणच्या राजकारणात महिला नेतृत्वाची नवी आशा – प्रभाग 3 मधून पूनम भोसले यांची उमेदवारी चर्चेत

फलटण (प्रतिनिधी): फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्र. 3 मधून पूनम सुनिल भोसले यांना राजे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. पूनम भोसले या सुप्रसिद्ध युवा नेते, पत्रकार आणि क्रिकेटपटू शक्ती उर्फ अशोक भोसले यांच्या चुलती असून, भोसले कुटुंबाचा राजकीय वारसा आणि सामाजिक कार्याचा ठसा त्यांच्या उमेदवारीवर स्पष्टपणे उमटतो आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पूनम भोसले या रामराजे समर्थक म्हणून सक्रिय आहेत. त्यांनी महिलांचे सक्षमीकरण, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच परिसरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यातून त्यांनी प्रभागात चांगला जनसंपर्क आणि विश्वास निर्माण केला आहे.

अलीकडेच वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आलेले शक्ती भोसले हे युवकांमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीचा प्रभाव पूनम भोसले यांच्या कार्यातही प्रकर्षाने दिसून येतो. भोसले परिवाराने फलटणच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात केलेले योगदान नागरिकांच्या लक्षात राहिले आहे.

पूनम भोसले यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्र. 3 मध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हं दिसत आहेत. विरोधकांच्या गोटात खळबळ माजली असून, जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

“सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे” ही संकल्पना साकार करणाऱ्या पूनम भोसले यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखवला, तर महिलांना राजकारणात नवसंजीवनी मिळू शकते, असे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यशैलीवर श्रद्धा ठेवून पूनम आणि शक्ती भोसले हे पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी राहिले आहेत.

संपूर्ण फलटण शहर आता प्रभाग क्र. 3 मध्ये एक अनुभवसंपन्न, ऊर्जावान आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या महिला नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे.


पूनम भोसले यांची उमेदवारी केवळ एक राजकीय पाऊल नसून, सामाजिक कार्यातून उदयास येणाऱ्या नेतृत्वाची ओळख ठरते. हे नेतृत्व प्रभाग 3 मध्ये सकारात्मक बदल घडवू शकते, अशी जनतेत भावना आहे.

जीवनशैलीत योग्य बदल केल्यास टाळता येईल स्तन कर्करोगाचा धोका, नेमकं काय करालं?

0
जीवनशैलीत योग्य बदल केल्यास टाळता येईल स्तन कर्करोगाचा धोका, नेमकं काय करालं?


स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा कर्करोग आहे.राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (NCRP) आणि संबंधित अहवालांनुसार स्तनाच्या कर्करोगाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या एकुण कर्करोगांपैकी सुमारे २६% प्रकरणे केवळ स्तनाच्या कर्करोगाची असतात. 2019ते 2023 या 5 वर्षांत राज्यात स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 28% नी वाढ झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत घटकांवर नियंत्रण ठेवता येते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ज्या महिला नियमितपणे शारीरिकरित्या सक्रिय राहतात, त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका 10% ते 25% पर्यंत कमी होतो. व्यायामाचा अभाव हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. नियमित व्यायाम केल्याने केवळ वजन नियंत्रणात राहत नाही, तर ते हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, नियमित मध्यम व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचा धोका 10% ते 25% पर्यंत कमी होतो.

डॉ ज्योती मेहता सांगतात की, स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असला तरी, तो पूर्णपणे अनियंत्रित नाही. योग्य जीवशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींपासून दूर राहिल्यास, आपण या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र, जीवनशैलीत बदल करण्यासोबतच चाळीशीनंतर नियमितपणे मॅमोग्राफी आणि स्वतः स्तनांची तपासणी करणे आवश्यक आहे. स्तन कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी योग्य जीवनशैली हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे, हे प्रत्येक महिलेला माहित असणे गरजेचे आहे.

योग्य जीवनशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींपासून दूर राहिल्यास, आपण या कर्करोगापासून दूर राहू शकतो. हाच एक सर्वात प्रभावी उपाय आहे.औषधोपचारांपेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक परिणामकारक ठरतात. दैनंदिन जीवनात लहान पण सातत्यपूर्ण बदल जसे की दररोज चालणे, ताजे आणि घरच्या अन्नाचे सेवन करणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि पुरेशी झोप घेणे हे दीर्घकाळ आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात. स्तन कर्करोग टाळण्यासाठी “योग्य जीवनशैली” हा सर्वात महत्त्वाचा आणि खात्रीशीर उपाय मानला जातो.





Source link