Monday, July 6, 2026
Home Blog Page 114

गुजराती पर्यटक राजस्थानमधील हॉटेलचं बिल न भरता पळाले पण..; रस्त्यावर राडा! Video पाहाच

0
गुजराती पर्यटक राजस्थानमधील हॉटेलचं बिल न भरता पळाले पण..; रस्त्यावर राडा! Video पाहाच


Gujarat Tourists Viral Video: पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी हा जगभरात कायमच चर्चेचा विषय ठरतो. कधी ऐतिहासिक ठिकाणांचं महत्त्व न समजून घेता केलेलं कृत्य तर कधी हॉटेलमध्ये घातलेला गोंधळ अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने उपद्रवी पर्यटक कायमच बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत असतात. मात्र राजस्थानमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळावर एका गुजराती कुटुंबाने केलेल्या कृत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं या पर्यटकांनी केलं काय?

राजस्थानमधील माउंट अबूजवळील सियावा येथील हॅपी डे हॉटेलमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या एका गुजराती कुटुंबाने हॉटेलच्या बिलाचे पैसे न देता पळून जाण्याचा कट रचला. विशेष म्हणजे या पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. हे पर्यटक आधी हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी भरपूर पदार्थ मागवले. नंतर ते मनसोक्त जेवले. मात्र जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी हळूच तिथून पळून जाण्याचं ठरवलं.

कसा पळ काढला?

या पाच जणांनी एक-एक करून वॉशरूममध्ये जाण्याचे नाटक केले, नंतर बाहेर पडताच कारमध्ये बसून पळून जाऊ लागले. मात्र हॉटेल मालक आणि वेटरला संशय आला आणि त्यांनी लगेच या पाच जणांचा पाठलाग केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार गुजरात-राजस्थान सीमेवरील अंबाजीकडे जाताना स्पष्टपणे दिसत होती.

वाहतूक कोंडीत अडकले अन्…

हॉटेल मालकाने ट्रॅफिकमधून गाडीचा पाठलाग केला आणि गुजरात सीमेवर पोहोचला. पोलिसांच्या मदतीने, त्या पाचही जणांना ट्रॅफिकमध्ये अकलेले असतानाच पकडण्यात आले. त्यानंतर भररस्त्यात तुफान बाचाबाची आणि राडा झाला. घाबरलेल्या पर्यटकांनी एका मित्राला फोन केला आणि बिल भरण्यासाठी ऑनलाइन मनी ट्रान्सफरची मागणी केली. शेवटी, पर्यटकांनी त्यांच्या मित्राकडे पैसे मागितले आणि बिल भरले. 

अशा पर्यटकांमुळे इतरही लोक बदनाम होतात

या पर्यटकांना हॉटेल मालकाने रंगेहाथ पकडल्यानंतर रस्त्यातच या पर्यटकांचा आणि हॉटेल मालकाचा वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या पर्यटकांनी स्वत:बरोबरच राज्याचंही नाव खराब केल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी अशा पर्यटकांमुळे सर्वसामान्य पर्यटकही बदनाम होतात असं म्हणत अशा लोकांना कठोर शिक्षा केली पाहिजे असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ तुम्हीही एकदा पाहाच…

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करुन नक्की सांगा.





Source link

World Stroke Day 2025 : स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ‘4’ संकेत, तिसऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका

0
World Stroke Day 2025 : स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ‘4’ संकेत, तिसऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका


स्ट्रोक ही अचानक उद्भवणारी गंभीर स्थिती आहे, परंतु ती बर्‍याचदा वर्षानुवर्षे चुकीच्या जीवनशैली निवडींमुळे उद्भवते. ती रोखण्यासाठी निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की अंदाजे ८० टक्के स्ट्रोक टाळता येतात, त्यासाठी दैनंदिन सवयींमध्ये फक्त काही बदल करावे लागतात. त्यांच्या आहाराकडे, ताणतणावाकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देऊन, महिला स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

Add Zee News as a Preferred Source

 

जगात दर चार मिनिटांनी एका व्यक्तीचा स्ट्रोकमुळे मृत्यू होतो. मेंदूच्या एका भागात रक्तप्रवाह खंडित झाल्यावर स्ट्रोक होतो, ज्यामुळे मेंदूच्या पेशी मरतात. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असली पाहिजे.

ब्रेन स्ट्रोकच्या गंभीर धोके आणि लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्राथमिक उद्देशाने दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिन साजरा केला जातो. स्ट्रोक हे जगभरात मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, परंतु डॉक्टरांचा असा विश्वास आहे की स्ट्रोकच्या पहिल्या 60 मिनिटांत त्याची सुरुवातीची चिन्हे ओळखल्याने जीव वाचू शकतात आणि दीर्घकालीन नुकसान कमी होऊ शकते.

स्ट्रोकच्या लक्षणांसाठी लक्षात ठेवण्याचा एक सोपा नियम आहे: “फास्ट”, ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे अचानक आणि वेगाने दिसतात. दुर्दैवाने, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे, ही समस्या आता वृद्धांपुरती मर्यादित नाही; 30 आणि 40 च्या दशकातील तरुणांमध्येही प्रकरणे वेगाने वाढत आहेत, ज्यामुळे त्वरित जागरूकता आणि त्वरित कारवाई करणे महत्वाचे आहे.

चेहऱ्यावर लकवा मारणे 

स्ट्रोकचे पहिले आणि सर्वात दृश्यमान लक्षण म्हणजे चेहऱ्यावरचा लटकाव. जर चेहऱ्याची एक बाजू अचानक कमकुवत किंवा लटकावलेली वाटत असेल तर ती एक चेतावणी चिन्ह आहे. रुग्णाला हसण्यास सांगा. जर हास्य अर्धवट किंवा असमान दिसत असेल किंवा तोंडाच्या कोपऱ्यातून लाळ वाहू लागली असेल तर ते स्ट्रोकचे लक्षण असू शकते. ही लक्षणे दिसू लागताच सतर्क रहा.

हात कमकुवत होणे

दुसरे चिन्ह तुमच्या हातांशी संबंधित आहे. जर एखाद्या व्यक्तीचे हात किंवा हात अचानक सुन्न किंवा कमकुवत झाले तर हे आणखी एक मोठे धोक्याचे असू शकते. त्यांना दोन्ही हात एकाच वेळी वर करण्यास सांगा. जर एक हात स्वतःहून खाली पडला किंवा उचलण्यास खूप कठीण झाला तर ते मेंदूला रक्तपुरवठा थांबला आहे असे सूचित करते. जर तुम्हाला ही स्थिती दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मेंदूच्या समस्या 

हे सर्वात महत्वाचे लक्षण आहे आणि कधीही दुर्लक्ष करू नये. जर एखाद्या व्यक्तीला अचानक बोलणे कठीण वाटले, तोतरे झाले (तोतरे झाले), किंवा सर्वकाही समजले पण बोलता येत नसेल, तर हे मेंदूच्या गंभीर नुकसानाचे स्पष्ट लक्षण आहे. या लक्षणाला झोप येणे किंवा चिंता समजू नका; अशा परिस्थितीत, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काय कराल?

जर तुम्हाला वर नमूद केलेल्या तीन लक्षणांपैकी कोणतेही (चेहरा, हात, बोलणे) दिसले तर क्षणभरही वाया घालवू नका. ‘टी’ म्हणजे ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा. स्ट्रोकनंतरच्या पहिल्या काही मिनिटांना ‘गोल्डन अवर’ म्हणतात. या काळात जितक्या जलद उपचार केले जातील तितके रुग्णाच्या जगण्याची आणि कायमचे अपंगत्व कमी होण्याची शक्यता जास्त असते.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

फलटणनगरपरिषद : जनतेचा चेहरा म्हणून विकास काकडे सर चर्चेत!

0
फलटणनगरपरिषद : जनतेचा चेहरा म्हणून विकास काकडे सर चर्चेत!

फलटण (प्रतिनिधी):फलटण नगरपरिषद निवडणुकीचा रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. या प्रभागात सध्या एक नाव सर्वत्र चर्चेत आहे — विकास वसंतराव काकडे सर. सामाजिक कार्य, शिक्षण, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका पाहता, मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.

सामाजिक बांधिलकीचा पक्का पाया
राजे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे विकास काकडे सर हे साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष असून, त्यांनी रक्तदान शिबिर, पाठ्यपुस्तक वाटप, महापुरुष जयंती उत्सव, शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजकार्याची ठसठशीत छाप उमटवली आहे.

कोविड काळात मदतीचा आधारस्तंभ
कोविडच्या संकटात त्यांनी गरीब कुटुंबांना धान्य वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच ताथवडा आश्रमशाळा व वृद्धाश्रमातील नागरिकांना सहाय्य देत सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता समितीचे सदस्य म्हणून अनेकांना न्याय मिळवून दिला.

शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव
श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि मुधोजी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. शिक्षक पतसंस्था व सहकारी संस्थांमध्ये व्हाइस चेअरमन पद भूषवताना त्यांनी पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार केला. सध्या ते सातारा सहकार बोर्डाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

विचार, संस्कृती आणि साहित्य यांची जपणूक
हिंदी राष्ट्रभाषा प्रचारक म्हणून पुणे हिंदी प्रचारक संस्थेचा पुरस्कार मिळवणारे काकडे सर यांनी 1991 मध्ये फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मृती शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करून समाजजागृतीचा पाया रचला.

राजघराण्याशी जिव्हाळ्याचं नातं
श्रीमंत रामराजे, रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी काकडे सर यांचे अतूट संबंध असून, राजे गटाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख पक्की झाली आहे. अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये ते नेतृत्व करीत आले आहेत. चळवळीत सक्रिय सहभाग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी दलित, बहुजन आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखालीच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजेंची प्रतिमा मिरवणूक काढण्याचा मान भगवान बुद्ध जयंती महोत्सव समितीला मिळाला.

जनतेतून उमेदवारीची मागणी
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांमध्ये विकास काकडे सरांविषयी विश्वास, आदर आणि आपुलकी आहे. त्यांच्या तळागाळातील कार्यामुळे, सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे आणि अभ्यासू नेतृत्वामुळे जनतेतूनच त्यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक राजकारणात त्यांच्या सारख्या अनुभवी, शैक्षणिक आणि सामाजिक जाणिवा असलेल्या नेतृत्वाच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: इंटरनेटला नाकारू नका, पण‎ त्याचा वापर काळजीपूर्वक करा‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  इंटरनेटला नाकारू नका, पण‎ त्याचा वापर काळजीपूर्वक करा‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pt. Vijayshankar Mehta’s Column, Don’t Reject The Internet, But Use It Carefully

23 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आज जागतिक अशांततेचे सर्वात जास्त उल्लेख केलेले कारण‎म्हणजे डिजिटल मीडिया आणि इंटरनेट आहे. आज जगभर त्याला‎चालना मिळाली आहे. आज आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन आहे.‎इलेक्ट्रॉनिक संदेशांची देवाणघेवाण प्रथम दोन संगणकांमध्ये झाली‎आणि १९९० पर्यंत त्यात क्रांती घडली. जरी जग बदलले असले आणि‎बदलाबरोबर ते अधिक अशांत झाले असले तरी इंटरनेटने त्यात‎महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्याचे फायदे हानीपेक्षा जास्त आहेत.‎काही जण म्हणतात की इंटरनेटने शांती आणली आहे, परंतु ही शांती ट्रम्प‎यांच्या प्रयत्नांसारखी आहे. महाभारत काळात तीन लोकांनी शांतीचा‎प्रयत्न केला. विदुराचे प्रयत्न पुण्यपूर्ण होते, परंतु ते प्रत्यक्षात येऊ शकले‎ नाहीत.

भीष्म आणि द्रोणांचे प्रयत्न राजसी होते, परंतु तेदेखील अपूर्ण‎राहिले. धृतराष्ट्र आणि कर्णाचे प्रयत्न तामसी होते आणि त्याचे परिणाम‎सर्वांना भोगावे लागले. इंटरनेटदेखील अशाच प्रकारे शांती प्रदान करते :‎ते शांती आणते असे दिसते, परंतु त्याऐवजी ते अशांतता आणते. तथापि,‎इंटरनेट नाकारता कामा नये, परंतु त्याचा वापर करताना सावधगिरी‎बाळगली पाहिजे.



Source link

सह्याद्री ते श्रीलंका, आता थायलंड – बौद्ध वारशाचा शोध अखंड सुरूच :- सुरज जगताप

0
सह्याद्री ते श्रीलंका, आता थायलंड – बौद्ध वारशाचा शोध अखंड सुरूच :- सुरज जगताप

साहस Times :- या वर्षीपासून त्यांनी राज्याच्या सीमा ओलांडून इतर राज्यांतील बौद्ध स्थळांचा परिचय समाजाला करून देण्यास सुरुवात केली असून, या उपक्रमाला समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच मालिकेत यंदाच्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीलंकेचा पहिला आंतरराष्ट्रीय बौद्ध अभ्यास दौरा त्यांनी यशस्वीरीत्या आयोजित केला. या दौऱ्याला देखील अभ्यासक आणि बौद्ध धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यानंतर जून महिन्यात सांची अभ्यास दौरा तसेच महाराष्ट्रातील आद्य पितळखोरे लेणी येथे अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सांची अभ्यास दौरा आयोजित होत आहे.

या शृंखलेतील पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे डिसेंबर महिन्यातील थायलंड आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा. या अभ्यास दौऱ्यामध्ये थाई स्थापत्यकला आणि शिल्पकलेवर भारतीय स्थापत्यशिल्पकलेचा झालेला प्रभाव बारकाईने अभ्यासला जाणार आहे.

या दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अभ्यासकांनी खालील दिलेल्या लिंकद्वारे व्हॉट्सअ‍ॅप समूहात सामील व्हावे. अधिक माहिती समूहात दिली जाईल.

👉 थायलंड अभ्यास दौऱ्याची लिंक :
https://chat.whatsapp.com/FGnTawHIEZ449qRgcUwZwZ?mode=wwt

      सूरज रतन जगताप – लेणी अभ्यासक
सह्याद्री ते श्रीलंका, आता थायलंड – बौद्ध वारशाचा शोध अखंड सुरूच!

फलटण तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाला दोन कोटींचा निधी मंजूर

0
फलटण तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाला दोन कोटींचा निधी मंजूर

फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे तालुक्यातील महत्त्वाच्या धार्मिक व नैसर्गिक स्थळांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

खासदार मा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला. आमदार पाटील यांनी सांगितले की, “तालुक्यातील सर्व धार्मिक स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा संकल्प आहे आणि मंजूर झालेल्या कामांना लवकरच सुरुवात होईल.”

मंजूर कामांमध्ये गोखळी येथे निरा नदीवरील घाट बांधकाम व विकासासाठी ४० लाख रुपये, सोमथळी येथे हनुमान मंदिर परिसरात शेड बांधकाम व विकासासाठी ३० लाख रुपये, नाईकबोमवाडी येथे तातमगिरी देवस्थान व्यास ऋषी समाधी स्थळापर्यंत पायऱ्या बांधकामासाठी २५ लाख रुपये, फलटण येथे श्रीकृष्ण डोह विकासासाठी ४० लाख रुपये, कोरेगाव भावेनगर येथे घुमाई देवी मंदिर ओढ्यावर झुलता पूल बांधण्यासाठी २० लाख रुपये, कोरेगाव चौवनेश्वर येथे चौणेश्वर मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकामासाठी १० लाख रुपये, कोरेगाव सोळशी येथे शनि देवस्थान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुधारनेसाठी १५ लाख रुपये आणि कोरेगाव विकले येथे जोगमट परिसरात संरक्षण भिंत बांधण्यासाठी २० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

एकूण दोन कोटी रुपयांचा हा निधी मंजूर झाल्याने फलटण-कोरेगाव मतदारसंघातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास होऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे.

फलटण तालुक्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार

0
फलटण तालुक्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुढाकार

फलटण (प्रतिनिधी) – राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्याला तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

या निधीतून तालुक्यातील विविध गावांमध्ये समाजमंदिर, रस्ते, अभ्यासिका, विहार, स्मशानभूमी, संविधान भवन आणि शौचालय यांसारखी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे ग्रामीण वस्तीतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळून जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

फलटण तालुक्यातील मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे आहेत –
१) तडवळे वाघोली येथे तक्षशिला नगर येथे अभ्यासिका बांधणे – १० लाख रुपये
२) पिंपोडे बुद्रुक येथे बौद्ध विहार संरक्षण भिंत व व्यासपीठ बांधणे – १० लाख रुपये
३) निरगुडी येथे लोंढे वस्ती ओढ्यावरील पूल बांधणे – २० लाख रुपये
४) दालवडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
५) गुणवरे येथे दलित वस्तीतील रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
६) आसू येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
७) साखरवाडी येथे पेविंग ब्लॉक बसवणे – १० लाख रुपये
८) खामगाव येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
९) सांगवी येथे जगताप वस्तीवरील रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१०) तरडगाव येथे समाजमंदिर बांधणे – १० लाख रुपये
११) गिरवी येथे मातंग समाजासाठी स्मशानभूमी बांधणे – १० लाख रुपये
१२) निंभोरे येथे संविधान भवन बांधणे – २० लाख रुपये
१३) सालपे येथे रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१४) आळजापूर येथे मसुगडे वस्ती रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१५) राजाळे येथे ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे – १० लाख रुपये
१६) निंबळक येथे वस्ती रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१७) सुरवडी येथे रस्ता सुधारणा – १० लाख रुपये
१८) सस्तेवाडी येथे हनुमान नगर येथे शौचालय बांधणे – १० लाख रुपये

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, “फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा जो शब्द मी जनतेला दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.”

या योजनेमुळे फलटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा विकास होऊन सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतीस चालना मिळणार आहे.

Research: ‘टक्कल पडण्यावर सापडला उपाय; 21 दिवसांत मिळतील जाड, उडणारे केस’, शास्त्रज्ञांचा दावा!

0
Research: ‘टक्कल पडण्यावर सापडला उपाय; 21 दिवसांत मिळतील जाड, उडणारे केस’, शास्त्रज्ञांचा दावा!


Hair Growth Serum: तैवानच्या संशोधकांनी एक रब-ऑन सीरम विकसित केलंय, ज्यामुळे टक्कल पडलेल्या उंदरांना फक्त तीन आठवड्यात नवीन केस वाढू लागले. या शोधात केस प्रत्यारोपणाचे आणि महागड्या उपचारांचे दिवस संपवण्याची क्षमता आहे. या शोधामुळे केसगळतीच्या पारंपरिक उपचारांना मागे पडू शकतात. कारण यात शस्त्रक्रिया किंवा महागड्या थेरपीची गरज नाहीय. उंदरांच्या प्रयोगातून मिळालेल्या यशाने मानवी चाचण्यांचा मार्ग मोकळा झालाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

प्रेरणा कशी मिळाली?

त्वचेला किरकोळ जखम किंवा जळजळ झाल्यास ‘हायपरट्रायकोसिस’ निर्माण होते, ज्यामुळे त्या भागात असामान्य केसवाढ होते,  असे संशोधकांना आढळले. याच निरीक्षणावरून त्यांनी केसांच्या मूळांपर्यंत पोहोचणाऱ्या यंत्रणेचा शोध घेतला आणि सीरमची निर्मिती केली.

उंदरांवरील प्रयोग यशस्वी 

टक्कल असलेल्या उंदरांच्या त्वचेवर सौम्य उत्तेजक (सोडियम डोडेसिल सल्फेट) लावल्यावर रोगप्रतिकारक पेशी सक्रिय झाल्या. त्यांनी त्वचेखालील चरबी ऊतकांना सिग्नल दिले, ज्यामुळे फॅटी अॅसिड सोडले गेले. हे अॅसिड सुप्त केसकूपांच्या स्टेम सेल्सना ‘जागे’ करून नवीन रोमांचा उगवतात, असे आढळले. 

सीरमचे गुपित घटक

जळजळ टाळणाऱ्या या सीरममध्ये दोन मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आहेत. म्हणजेच ऑलेइक आम्ल आणि पाल्मिटोलिक आम्ल आहे. हे घटक मानवी चरबीत आणि ऑलिव्ह, अवोकॅडो तेलांसारख्या वनस्पती तेलांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतात. उंदरांवर थेट लावल्यास ते पारंपरिक उत्तेजकाइतकेच प्रभावी आणि सुरक्षित  असल्याचे संशोधक सांगतात.

मानवी वापराकडे वाटचाल

संशोधकांनी सीरमचे पेटंट घेतले असून आता क्लिनिकल ट्रायल्सची तयारी सुरू आहे. यशस्वी झाल्यास हे सीरम ओव्हर-द-काउंटर उत्पादन म्हणून बाजारात येईल. अनुवांशिक, हार्मोनल किंवा वयामुळे होणाऱ्या टक्कलवर हा उपाय क्रांतिकारी ठरू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

वैज्ञानिक महत्त्व

या शोधामुळे सौंदर्यासोबतच स्टेम सेल सक्रियतेच्या नव्या यंत्रणेचा उलगडा झालाय. त्वचेच्या निसर्गातील ‘रिपेअर’ प्रक्रियेचा वापर करून केसगळती थांबवणे शक्य झाल्यास जगभरातील लाखो लोकांना स्वस्त, सोपा पर्याय मिळू शकणार आहे.

भविष्यात काय? 

मानवी चाचण्या 1-2 वर्षांत सुरू होऊ शकतात. यश मिळाल्यास दाट केस मिळवणे स्वप्न राहणार नाही. मात्र सुरक्षितता आणि दीर्घकालीन परिणाम तकाय होतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. असे असले तरी हा शोध सौंदर्य उद्योगाला नवे वळण देणारा ठरेल. 

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)

FAQ 

१. तैवानच्या सीरममुळे टक्कल पडलेल्या उंदरांना केस कसे वाढले?

सीरममध्ये ऑलेइक आम्ल आणि पाल्मिटोलिक आम्ल हे दोन फॅटी अॅसिड आहेत. हे त्वचेखालील चरबी ऊतकांना सक्रिय करतात, ज्यामुळे सुप्त केसकूपांच्या स्टेम सेल्स जाग्या होऊन २१ दिवसांत नवीन केस उगवतात.

२. हा सीरम कसा वेगळा आहे आणि त्याची प्रेरणा काय?

हा सीरम जळजळ न करता काम करतो, ज्यात शस्त्रक्रिया किंवा महागड्या उपचारांची गरज नाही. प्रेरणा ‘हायपरट्रायकोसिस’मधून मिळाली – त्वचेला किरकोळ जखम झाल्यास असामान्य केसवाढ होते, याच यंत्रणेचा वापर केला आहे.

३. मानवी वापर कधी होईल आणि त्याचे भविष्य काय?

सीरमचे पेटंट घेतले असून १-२ वर्षांत क्लिनिकल ट्रायल्स सुरू होतील. यशस्वी झाल्यास ओव्हर-द-काउंटर उत्पादन म्हणून बाजारात येईल आणि अनुवांशिक-हार्मोनल टक्कलवर क्रांतिकारी उपाय ठरेल.





Source link

माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? वडिलांची प्रतिक्रिया

0



बीड : आमच्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील अशी संतप्त प्रतिक्रिया मृत महिला डॉक्टरच्या (Satara Doctor Murder) वडिलांनी दिली. सुरुवातीला मला घटनाच सांगण्यात आली नाही, मला तिच्या जवळच येऊ दिले नाही असाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देऊन फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते असं शेवटचं बोलणं झाल्याचं मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. त्या एसआयटीमध्ये महिला अधिकारी असावी आणि हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावं अशी मागणी महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली. माझ्या लेकराला कसं मोठं केलं हे मी शब्दात सांगू शकत नाही असं म्हणत तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

Phaltan Doctor Murder News : ती आत्महत्या नाही तर हत्याच, वडिलांचा आरोप

आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला. ते म्हणाले की, घटना घडण्या अगोदर आम्ही तिच्याकडे एक दिवस गेलो होतो. मात्र यातील सत्य एकच माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे.

माझ्या मुलीचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी त्रास दिला त्यांना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात खासदार-आमदार जो कोणी असो, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केला.

Phaltan Doctor Postmortem Report : शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त

फलटणमधील महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मृत डॉक्टर महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून गळफास घेऊनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान प्रशांत बनकर, गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरांचा सीडीआर पोलिसांच्या हाती लागला. मृत्यूच्या आधी गोपाळ बदनेसोबत महिला डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालं. मात्र अजून गोपाळ बदनेनं आपला मोबाईल पोलिसांना दिलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप; आता मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, नक

0



Phaltan Doctor Crime News: साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने (Phaltan Doctor Crime New) राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे. आता आत्महत्या करणाऱ्या तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल (Phaltan doctor postmortem report) समोर आला आहे. रुग्णालायाकडून संबंधित मृत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. यामध्ये मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नसल्याचे समोर आले आहे. 

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय? (Phaltan doctor postmortem report)

  1. मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत.
  2. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे उघड

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती- (CDR Of Phaltan Doctor)

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांत बनकर (Prashant Bankar) आणि निलंबित पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने (Gopal Badane) यांच्यासोबत मृत डॉक्टरचे कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत्यूच्या आधी देखील गोपाल बदनेसोबत कॉल झाल्याचे तपासात समोर आले. गोपाल बदने केवळ मैत्री शिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती आहे. हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेस्निक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

गोपाल बदनेने मोबाईल लपवला- (PSI Gopal Badane)

अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badane) याच्याबाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत . फलटण येथील डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला व प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती .या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला . पण आता या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .

तरुणीच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट- (Phaltan Doctor Crime News)

मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली होती. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं होतं. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलेलं. पोलीस उपनिरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता. तसंच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. 

नेमकं प्रकरण काय? (Phaltan Doctor Crime News)

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली . आत्महत्या पूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता. यामध्ये तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते .याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या .फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती .त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते.

संबंधित बातमी:

Satara Doctor Crime News: हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा



Source link