Monday, July 6, 2026
Home Blog Page 115

माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? वडिलांची प्रतिक्रिया

0



बीड : आमच्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील अशी संतप्त प्रतिक्रिया मृत महिला डॉक्टरच्या (Satara Doctor Murder) वडिलांनी दिली. सुरुवातीला मला घटनाच सांगण्यात आली नाही, मला तिच्या जवळच येऊ दिले नाही असाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देऊन फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते असं शेवटचं बोलणं झाल्याचं मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. त्या एसआयटीमध्ये महिला अधिकारी असावी आणि हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावं अशी मागणी महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली. माझ्या लेकराला कसं मोठं केलं हे मी शब्दात सांगू शकत नाही असं म्हणत तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

Phaltan Doctor Murder News : ती आत्महत्या नाही तर हत्याच, वडिलांचा आरोप

आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला. ते म्हणाले की, घटना घडण्या अगोदर आम्ही तिच्याकडे एक दिवस गेलो होतो. मात्र यातील सत्य एकच माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे.

माझ्या मुलीचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी त्रास दिला त्यांना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात खासदार-आमदार जो कोणी असो, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केला.

Phaltan Doctor Postmortem Report : शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त

फलटणमधील महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मृत डॉक्टर महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून गळफास घेऊनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान प्रशांत बनकर, गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरांचा सीडीआर पोलिसांच्या हाती लागला. मृत्यूच्या आधी गोपाळ बदनेसोबत महिला डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालं. मात्र अजून गोपाळ बदनेनं आपला मोबाईल पोलिसांना दिलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप; आता मृत डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर, नक

0



Phaltan Doctor Crime News: साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने (Phaltan Doctor Crime New) राज्यभरात मोठी खळबळ उडाली आली आहे. आता आत्महत्या करणाऱ्या तरुणी डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल (Phaltan doctor postmortem report) समोर आला आहे. रुग्णालायाकडून संबंधित मृत तरुणीचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना देण्यात आला आहे. यामध्ये मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात नसल्याचे समोर आले आहे. 

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय? (Phaltan doctor postmortem report)

  1. मृत डॉक्टरांच्या शरीरावर इतर कोणतेही आघात किंवा जखमा नाहीत.
  2. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे उघड

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती- (CDR Of Phaltan Doctor)

मृत डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती लागले आहेत. प्रशांत बनकर (Prashant Bankar) आणि निलंबित पोलीस उपनिरिक्षक गोपाल बदने (Gopal Badane) यांच्यासोबत मृत डॉक्टरचे कॉल झाल्याचे तपासात उघड झाले आहे. मृत्यूच्या आधी देखील गोपाल बदनेसोबत कॉल झाल्याचे तपासात समोर आले. गोपाल बदने केवळ मैत्री शिवाय दुसरे कोणतेही रिलेशन नसल्याचे पोलीस तपासात सांगत असल्याची माहिती आहे. हस्ताक्षर तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला फॉरेस्निक अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही.

गोपाल बदनेने मोबाईल लपवला- (PSI Gopal Badane)

अत्याचार प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (PSI Gopal Badane) याच्याबाबतीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत . फलटण येथील डॉक्टर तरुणीने हातावर गोपाळ बदने यांनी अत्याचार केला व प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती .या घटनेत पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला . पण आता या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने याने शरण येण्यापूर्वी आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. त्याचा मोबाईल अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे .

तरुणीच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट- (Phaltan Doctor Crime News)

मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली होती. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलं होतं. त्यात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलेलं. पोलीस उपनिरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता. तसंच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. 

नेमकं प्रकरण काय? (Phaltan Doctor Crime News)

सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री (23 ऑक्टोबर ) रुग्णालयाच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली . आत्महत्या पूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर काही मजकूर लिहिला होता. यामध्ये तिने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे म्हटले होते .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पीडित महिला डॉक्टर आणि फलटण पोलिसांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत होते .याच कारणामुळे एकमेकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर करण्यात आल्या होत्या .फलटण पोलीस अटक केलेल्या आरोपींना त्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि महाडिक यांनी सातारच्या जिल्हा आरोग्य विभागाकडे केली होती .त्यानंतर चौकशी समिती समोर पोलीस अधिकाऱ्यांवर महिला डॉक्टरने अनेक गंभीर आरोप केले होते.

संबंधित बातमी:

Satara Doctor Crime News: हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यातील फलटणमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा



Source link

श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत… हा अवयव काय काम करतो? तो फुटल्यास…

0
श्रेयसच्या पोटात Spleen फुटलं… प्राणघातक दुखापत… हा अवयव काय काम करतो? तो फुटल्यास…


Shreyas Iyer Injury What Is Spleen: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कॅच घेताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॅनमध्ये त्याला स्प्लीनला म्हणजेच प्लीहा दुखापत झाल्याचे दिसून आले. प्लीहा हे मानवी शरीरामधील लसीका संस्थेतील सर्वांत मोठे इंद्रिय असून ते उदरपोकळीच्या डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असते. म्हणजे साधारणपणे उजव्या बाजूला हृदय असते तसेच डाव्या बाजूला हृदयापेक्षा थोड्या खालच्या बाजूला प्लीहा असतं.

Add Zee News as a Preferred Source

नेमका हा अवयव काय?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मते, श्रेयसला स्प्लीनमध्ये जखम झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्याला आयसीयूमध्ये ठेवावे लागले होते. आता त्याला आयसीमधून बाहेर आणण्यात आलं असून सध्या, श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर, अनेकजण स्प्लीन म्हणजेच प्लीहा काय असतं आणि ते काय काम करतं याबद्दल सर्च करताना दिसत आहेत. स्प्लीनच्या दुखापतीच्या संभाव्य धोक्यांबद्दल अनेजण जाणून घेण्यासाठी गुगल आणि इंटरनेटची मदत घेत आहेत. याचबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे… 

हा अवयव काय काम करतो?

अमेरिकेतील क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, स्प्लीन हा शरीराच्या डाव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली आणि पोटाच्या वर स्थित एक लहान अवयव आहे. त्याला हिंदीत ‘टिली’ तर मराठीत ‘प्लीहा’ म्हणतात. प्लीहाचे प्राथमिक कार्य रक्त शुद्ध करण्याचं आहे. प्लीहा जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी (RBCs) काढून टाकते आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी नवीन पांढऱ्या रक्तपेशी तयार करते. प्लीहा हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक आवश्यक भाग आहे. ते रक्तातील बॅक्टेरिया आणि विषाणू ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते. प्लीहा रक्त साठवते आणि गरज पडल्यास शरीराला रक्त पुरवते. जेव्हा दुखापत किंवा अपघातामुळे शरीराला रक्त कमी होते तेव्हा हे राखीव रक्त उपयोगी पडते.

प्लीहा लेसरेशन म्हणजे काय?

जेव्हा एखादी व्यक्ती अचानक जोरदार आघाताने पडते किंवा पोटाला गंभीर दुखापत होते तेव्हा प्लीहाला दुखापत होऊ शकते किंवा ते फुटू शकते. प्लीहाला झालेल्या या दुखापतीला प्लीहा लेसरेशन म्हणतात. प्लीहा दुखापतीमुळे डाव्या ओटीपोटात वरच्या बाजूला तीव्र वेदना होतात. कोणीतरी पोटावर दाब टाकत असल्यासारखं वाटत राहतं. जर प्लीहा फुटला तर अंतर्गत रक्तस्त्राव होतो. अशाप्रकारचा अंतर्गत रक्तस्राव होतं ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. जर अंतर्गत रक्तस्त्राव वाढला तर रुग्णाची प्रकृती खालावून अगदी मृत्यू देखील होऊ शकतो.

जखम झाल्यावर इलाज काय?

प्लीहाच्या किरकोळ दुखापतींसाठी, डॉक्टर सहसा बेड रेस्ट आणि देखरेखीची शिफारस करतात. जर रक्तस्त्राव गंभीर असेल तर शस्त्रक्रिया करायला सांगतिलं जातं. या शस्रक्रियेला स्प्लेनेक्टोमी म्हणतात. या शस्त्रक्रियेत प्लीहाचा काही भाग किंवा संपूर्ण भाग काढून टाकला जातो. अशा परिस्थितीत, रुग्णाने भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्लीहा नसल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. प्लीहा शरीराला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

ऑपरेशननंतरही धोका, जीवही जाऊ शकतो

आरोग्य तज्ञ असा सल्ला देतात की, प्लीहाच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर, रुग्णाने किमान काही आठवडे कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा खेळांपासून दूर राहावे. रुग्णासाठी औषधे, निरोगी आहार आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. जर ताप, पोटदुखी किंवा थकवा यासारखी लक्षणे पुन्हा दिसून आली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. प्लीहाचा आकार लहान असू शकतो, परंतु त्याचे कार्य फार महत्त्वाचे असते. या अवयवाला झालेली कोणतीही दुखापत ही वैद्यकीय आणीबाणीच समजली जाते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.





Source link

सतर्क राहा! उपाचारावेळी दाताची कॅप थेट रुग्णाच्या फुफ्फुसात

0
सतर्क राहा! उपाचारावेळी दाताची कॅप थेट रुग्णाच्या फुफ्फुसात


अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांकडे दातावर कॅप बसवताना उपचारा दरम्यान एका रुग्णाच्या घशात गेली आहे. मुंबईतील 78 वर्षीय रुग्ण हे दंतवैद्याकडे कॅप बसवण्यासाठी गेले असता उपचारांदरम्यान कॅप चुकून श्वासनलिकेतून उजव्या फुप्फुसाच्या वायूमार्गात गेली.

Add Zee News as a Preferred Source

भूल दिल्यामुळे घसा सुन्न झाल्याने त्यांना तत्काळ त्रास जाणवला नाही; मात्र काही वेळानंतर अस्वस्थता वाढल्याने केलेल्या सीटी स्कॅनमध्ये कॅप फुप्फुसात अडकलेली आढळली. रुग्णाला तातडीने झेन रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णाच्या फुप्फुसात अडकलेली दाताची कॅप ब्रोन्कोस्कोपीद्वारे यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. डॉ. अभिजित अहुजा यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने केवळ 10 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण केली. फुप्फुसांना कोणतीही दुखापत किंवा संसर्ग नसल्याने रुग्ण दुसऱ्या दिवशी पूर्णपणे बरा होऊन घरी परतला.

रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे काय?

 जेव्हा दात किडतात आणि दात गळतात तेव्हा रूट कॅनल ट्रीटमेंट केली जाते. त्या स्पष्ट करतात की जेव्हा पोकळी किंवा परिणामी क्षय दाताच्या आतील पृष्ठभागावर पोहोचतो तेव्हा केवळ प्रभावित दातामध्येच नव्हे तर त्याच्या सभोवतालच्या भागात तीव्र वेदना, सूज आणि संवेदनशीलता निर्माण होते. यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये गंभीर संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. या समस्येवर उपचार करण्यासाठी, प्रभावित दातावर रूट कॅनल केले जाते.

रूट कॅनल

या प्रक्रियेमध्ये प्रभावित दाताभोवतीचा भाग सुन्न करणे आणि ड्रिलने कॅनल उघडणे समाविष्ट आहे. नंतर पोकळी स्वच्छ केली जाते, दातातील खराब झालेले ऊतक स्वच्छ केले जाते आणि संसर्ग टाळण्यासाठी पोकळी अँटीबायोटिक्सने भरली जाते. समस्येनुसार, ही प्रक्रिया अनेक वेळा पूर्ण केली जाऊ शकते. रूट कॅनलनंतर, दाताचा बाह्य भाग क्रॅक होण्याचा किंवा तुटण्याचा धोका असतो. म्हणून, दाताचे संरक्षण करण्यासाठी आणि तो तुटण्यापासून रोखण्यासाठी त्यावर कॅप किंवा क्राउन ठेवला जातो.

समस्या का आणि कशा वाढू शकतात

रूट कॅनल केवळ प्रभावित दाताच्या मुळावरच नाही तर आजूबाजूच्या भागावर देखील परिणाम करते. या प्रक्रियेनंतर, केवळ प्रभावित दातावरच नाही तर आजूबाजूच्या हिरड्यांमध्ये देखील वेदना आणि सूज जाणवते. डॉक्टर काही औषधे लिहून देतात आणि उपचार केलेल्या दातावर ताण येऊ नये म्हणून काही खबरदारी घेण्याचा सल्ला देतात, जसे की फक्त मऊ पदार्थ खाणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धती आणि पेस्टने काळजीपूर्वक दात घासणे इ.

सर्व खबरदारी आणि उपचारांसह, वेदना आणि सूज सहसा एक किंवा दोन दिवसात कमी होते. कधीकधी, विविध कारणांमुळे, दात आणि हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज निर्धारित कालावधीनंतरही कायम राहू शकते.

ती स्पष्ट करतात की जर वेदना एक किंवा दोन दिवसात कमी झाली नाही तर याची अनेक कारणे असू शकतात, जसे की:

अपुरी रूट कॅनल उपचार.

रूट कॅनल नंतर खराब दंत स्वच्छतेमुळे हिरड्यांचा दाह आणि संसर्ग आणि दातांमध्ये अन्न अडकणे.

योग्यरित्या ब्रश न करणे आणि कठीण पदार्थ खाणे.

तुमच्या जीभेने किंवा हातांनी रूट कॅनल क्षेत्राला वारंवार स्पर्श करणे.

दातांमध्ये पीरियडोंटायटीस इत्यादी.

काय काळजी घ्याल? 

रूट कॅनल नंतर लगेचच नाही तर नेहमीच रूट कॅनल नंतर, उपचारित दाताची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, दात तुटण्याचा किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. काही खबरदारी पाळणे फायदेशीर ठरू शकते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

सुकामेवा, कडक आणि चिकट पदार्थ आणि उपचारित दाताजवळ जास्त गरम आणि आंबट फळे खाणे टाळा.

रूट कॅनल नंतर तुमचे तोंड बॅक्टेरियामुक्त ठेवण्याची गरज वाढते. या प्रक्रियेनंतर तुमच्या तोंडाच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. दिवसातून किमान दोनदा मऊ ब्रशने दात घासून घ्या, फ्लॉस करा आणि खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा.

रूट कॅनल नंतर, उपचारित दाताला हाताने किंवा जिभेने वारंवार स्पर्श करणे टाळा.

तुमच्या तोंडात बॅक्टेरिया वाढू नयेत म्हणून अल्कोहोल-मुक्त माउथवॉश वापरा.

तुमच्या दैनंदिन आहारात ताजी फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा, परंतु जास्त गोड आणि आंबट फळे आणि इतर पदार्थ खाणे टाळा.

तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा.

धूम्रपान आणि मद्यपान मर्यादित करा.

उपचार केलेल्या दातावर नेहमी टोपी घाला.





Source link

५० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; सुषमा अंधारे यांचे आरोप खोटे – ॲड. धीरज घाडगे

0
५० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; सुषमा अंधारे यांचे आरोप खोटे – ॲड. धीरज घाडगे

फलटण प्रतिनिधी – माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे अॅड. धीरज घाडगे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर २७७ गुन्ह्यांचे आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आज फलटण येथे अॅड. धीरज घाडगे, अॅड. नरसिंह निकम व अॅड. सचिन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

अॅड. घाडगे यांनी सांगितले की, उपविभागीय पोलीस अधीक्षक, फलटण यांनी लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही. त्यामुळे अंधारे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत.

अॅड. घाडगे यांनी पुढे सांगितले की, सुषमा अंधारे यांनी केलेल्या खोट्या वक्तव्यांबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या वतीने ५० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “ही पत्रकार परिषद पीडित डॉक्टर युवतीला न्याय मिळवण्यासाठी घेतली की दिगंबर आगवणे यांच्या बचावासाठी?” तसेच त्यांनी सुचवले की सुषमा अंधारे यांनी ज्यांच्या शेजारी बसून आरोप केले, त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत हेही त्यांनी आधी तपासून पाहावे.

अॅड. घाडगे यांनी पुढे म्हटले की, त्या डॉक्टरच्या प्रकरणाशी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा काहीही संबंध नाही. आजवर एकाही ऊस मुकादमाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच नंदकुमार ननावरे यांच्या बाबतीत करण्यात आलेले वक्तव्यही चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अॅड. घाडगे यांनी आणखी स्पष्ट केले की, ‘रणजित निंबाळकर’ या नावाने फलटण तालुक्यात तब्बल २१ लोक आहेत, त्यामुळे गैरसमज झाला असावा. मात्र, खरे तथ्य म्हणजे माजी खासदार नाईक-निंबाळकर यांच्यावर कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल नाही.

शेवटी अॅड. घाडगे यांनी म्हटले की, “ज्या दिगंबर आगवणे यांच्या समर्थनार्थ सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्यावरच अनेक बँक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे खरे-खोटे जनतेसमोर स्पष्ट होईल.”

महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : तपास योग्य दिशेने सुरू – रूपाली चाकणकर

0
महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : तपास योग्य दिशेने सुरू – रूपाली चाकणकर

फलटण, प्रतिनिधी – महिला डॉक्टर आणि पोलिसांमध्ये झालेल्या परस्परविरोधी तक्रारींची चौकशी ऑगस्ट २०२५ मध्येच पूर्ण करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानुसार जानेवारी ते मार्च या काळात डॉक्टर महिलेचा संपर्क गोपाळ बदने यांच्याशी होता, तर मार्चनंतर प्रशांत बनकर यांचे कॉल तिच्या मोबाईलवर आढळले.

दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो काढण्यावरून डॉक्टर महिला आणि प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादानंतर ती डॉक्टर एका मंदिरात जाऊन बसली होती. त्यावेळी प्रशांत बनकर यांचे वडील तिला घरी घेऊन गेले, परंतु ती तेथून निघून थेट हॉटेलमध्ये गेली आणि तिथेच तिने आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाच्या तपासाची पारदर्शकता राखण्यासाठी पोलीस विभाग, फॉरेन्सिक लॅब तसेच राज्य महिला आयोग सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

त्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी आमदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विशाल खांबे तसेच महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील उपस्थित होते.

फॉरेन्सिक लॅब आणि लोकेशन डिटेक्शनच्या माध्यमातून आत्महत्या प्रकरणाची सखोल पडताळणी केली जात असून, तपासामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, असे आश्वासन रूपाली चाकणकर यांनी दिले.

तसेच शासकीय आणि अशासकीय संस्थांमधील अंतर्गत तक्रार निवारण समित्या प्रभावीपणे काम करतात की नाही, यासाठी वर्षातून किमान दोनदा या समित्यांचे ऑडिट करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: सत्संगाने निर्णय क्षमता सुधारते‎

0
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  सत्संगाने निर्णय क्षमता सुधारते‎


7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की, आपण सत्संगाला का‎उपस्थित राहावे? विशेषतः अशा वेळी जेव्हा कथांचे आयोजन व‎सत्संगाच्या कार्यक्रमांचा महापूर येतो. ज्ञानी असो वा अज्ञानी, योग्य‎असो वा अयोग्य, सत्संगाच्या बाबतीत प्रत्येकाचीच तोंडे उघडी आहेत.‎पण प्रत्येकाचे कान बंद असतात.

तुलसीदासांनी भगवान शिव यांचे‎म्हणणे उद््धृत केले आहे, ‘बिनु सतसंग न हरिकथा,तेहि बिनु मोह न‎भाग। मोह गएँ बिनु रामपद, होइ न दृढ़ अनुराग.’ सत्संगाशिवाय‎हरिकथा ऐकता येत नाही. त्याशिवाय मोह दूर होत नाही आणि मोह दूर‎झाल्याशिवाय भगवान रामाच्या चरणांबद्दल प्रेम नाही.

आजच्या‎पिढीच्या भाषेत समजले असा याचा अर्थ असा की, सत्संग योग्यरीत्या‎ऐकल्याने आपली निर्णयक्षमता सुधारेल आणि चांगले परिणाम‎मिळतील. चार गोष्टी लक्षात ठेवून सत्संग ऐका. कथेतील आकडेवारी‎तुमच्या जीवनाशी जोडा. संदेशाचे मूल्यांकन करा. तुम्ही कोणताही‎विचार करा, तो श्रद्धेने घ्या आणि वेळेनुसार संकल्प केला तर सत्संग‎आपली निर्णय घेण्याची क्षमता निश्चितच वाढवेल.‎



Source link

भारतातील सर्वात मोठी कंपनी Tata Motors चे नाव बदलले; 80 वर्षात चौथ्यांदा…

0
भारतातील सर्वात मोठी कंपनी Tata Motors चे नाव बदलले; 80 वर्षात चौथ्यांदा…


Tata Motors Demerger:  भारतातील सर्वात विश्वासार्ह ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने नाव बदलले आहे. 80 वर्षांच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय कंपनीने जोडला आहे. 13 ऑक्टोबर 2025 रोजी कंपनीचे नाव बदलण्याची अधिकृत घोषणा केली.  “टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड” असे  नाव असणार आहे. कपंनीने या नाव बदलासह दोन कंपन्यांचे विभाजन केले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

टाटा समूहाच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसायांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये विभाजित करण्याच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक भाग आहे. प्रवासी वाहने, एसयूव्ही, इलेक्ट्रिक वाहने आणि जग्वार लँड रोव्हर हे नवीन संस्था, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPVL) द्वारे हाताळले जातील, तर ट्रक, बस आणि पिकअप सारखी व्यावसायिक वाहने TML कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेड (ज्याचे लवकरच नाव टाटा मोटर्स लिमिटेड असे ठेवले जाईल) द्वारे हाताळली जातील.

25 ऑगस्ट 2025 आणि 10 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्या आदेशांद्वारे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मुंबई खंडपीठाने मंजूर केलेल्या टाटा मोटर्सच्या या विलयीकरणाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे. 14 ऑक्टोबर 2025 च्या रेकॉर्ड डेटला टाटा मोटर्सचे शेअर्स असलेल्या शेअरधारकांना आता दोन्ही नवीन युनिट्समध्ये (प्रवासी वाहन आणि व्यावसायिक वाहन कंपन्या) प्रत्येकी एक शेअर मिळेल. टाटा मोटर्सचा इतिहास पाहिला असताप्रत्येक नाव बदल एकाच विचाराने प्रेरित झाला आहे: कालांतराने त्यांच्या व्यवसायाची दिशा स्पष्टपणे परिभाषित करते.

1945 मध्ये भारताच्या औद्योगिक भविष्याचे स्वप्न पाहणारी कंपनी टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड म्हणून सुरुवात झाली. 1960 मध्ये भारत औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असताना, त्याचे नाव टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड (टेलको) असे ठेवण्यात आले. सन 2000 मध्ये कंपनीने अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित केले आणि स्वतःचे नाव टाटा अभियांत्रिकी लिमिटेड ठेवले. 2003 मध्ये एक महत्त्वाचा टप्पा, जेव्हा टेल्कोचे नाव टाटा मोटर्स लिमिटेड असे ठेवण्यात आले.  आता 2025 मध्ये , टाटा मोटर्सने स्वतःला दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभागले आहे.  ज्यामुळे प्रत्येक विभागाला त्याच्या क्षमतेनुसार भरभराटीची संधी मिळते.

नवीन रचना, नवीन दृष्टी

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडमध्ये कार, एसयूव्ही, ईव्ही आणि लक्झरी जेएलआर ब्रँड्स असतील. टाटा मोटर्स लिमिटेड (नवीन युनिट) मध्ये ट्रक, बस आणि व्यावसायिक वाहने तयार करेल. टाटाचे विलय हे एका नवीन युगाची सुरुवात आहे. प्रवासी वाहन विभाग देशाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्राचे नेतृत्व करेल, तर व्यावसायिक वाहन विभाग भारताच्या पायाभूत सुविधांसाठी महत्वाची कामगिरी बजावेल. 

FAQ

1 टाटा मोटर्सने नाव कशासाठी बदलले आहे?
टाटा मोटर्सने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी नाव बदलण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे बदल प्रवासी आणि व्यावसायिक वाहन व्यवसायांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये विभाजित करण्याच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. यामुळे प्रत्येक विभागाला त्याच्या क्षमतेनुसार भरभराटीची संधी मिळेल.

2 टाटा मोटर्सचे नवीन नाव काय आहे?
 कंपनीचे नवीन नाव “टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड” (TMPVL) असे ठेवण्यात आले आहे. व्यावसायिक वाहन विभागाची कंपनी TML कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेड असेल, ज्याचे लवकरच नाव टाटा मोटर्स लिमिटेड असे बदलले जाईल.

3  डिमर्जर म्हणजे काय आणि ते कधी सुरू झाले?
 डिमर्जर म्हणजे कंपनीला दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणे. टाटा मोटर्सचे डिमर्जर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मुंबई खंडपीठाने २५ ऑगस्ट २०२५ आणि १० सप्टेंबर २०२५ रोजी मंजूर केले. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे.

 





Source link

आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती

0



सातारा : फलटण (Satara) उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर (Doctor) आत्महत्येने महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून डॉक्टर महिलेनं आपलं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस (Police) अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केले आहेत. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना, मृत महिला डॉक्टर आणि आरोपी यांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होतं, असा खळबळजनक दादा पोलीस अधिक्षकांनी केला आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला, तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत, दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. सध्या प्राथमिक पीएम रिपोर्ट मिळाले असून फायनल पीएम रिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काही नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटलं. मयत डॉक्टर या ज्यावेळेस हॉटेलमध्ये गेली, त्यावेळेस ती एकटी होती. हे सीसीटीव्हीमध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासला असता, कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही. तरीसुद्धा ती हॉटेलवर का गेली या गोष्टींचा पूर्ण तपास करण्यात येईल, अशी माहिती देखील दोषी यांनी दिली.

आरोपी अन् मृत डॉक्टर महिलेचे वारंवार चॅटिंग

या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असं दिसत आहे की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं. डॉक्टर महिला ही आरोपींच्या संपर्कामध्ये होती, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.

आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी बदनेच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. मात्र, स्वतः हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी शरण येताच रात्री दीड वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी करत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवती डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचे व घरमालकाचा मुलाग प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते.

हेही वाचा

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; दिपालीचे आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

 

आणखी वाचा



Source link

Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय

0
Colon cleansing remedies : बद्धकोष्ठतेचा जुना त्रास, आतड्यांमधील मल खेचून बाहेर काढेल प्रेमानंद महाराजांचा ‘हा’ उपाय


निरोगी शरीर राखण्यासाठी, पोट स्वच्छ ठेवणे आणि शरीर हलके ठेवणे महत्वाचे आहे. बद्धकोष्ठता किंवा पोटदुखी मनाला चिडचिडे बनवू शकते आणि कोणत्याही कामात रस कमी करू शकते. कोणत्याही प्रकारच्या पोटदुखीला हलके घेऊ नये, कारण बहुतेक आजार येथूनच उद्भवतात. जर तुम्ही जड जेवण खाल्ले तर तुम्ही ही सवय ताबडतोब सोडून द्यावी. आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज जी म्हणतात की जड अन्न पचवणे कठीण असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता सारख्या समस्या उद्भवतात. पोटदुखी शरीर आणि मन दोन्ही कमकुवत करते.

Add Zee News as a Preferred Source

पोट कसे स्वच्छ करावे? पोटात साचलेली घाण शेकडो आजारांना जन्म देते. महाराजांनी गॅस, आम्लता, आतड्यांसंबंधी घाण आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटाच्या आजारांवर काही उपाय (संदर्भ) सुचवले आहेत, जे तुम्ही तुमच्या आयुष्यात वापरून पहावेत.

उठल्यावर काय कराल?

महाराज जे यांनी स्पष्ट केले की तुमचा सकाळचा दिनक्रम तुमचे आरोग्य ठरवतो. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, उठल्यावर प्रथम देवाचे स्मरण करा आणि नंतर कोमट पाणी प्या. तुमच्या क्षमतेनुसार, वज्रासनात बसून अर्धा लिटर, एक लिटर किंवा तुम्हाला शक्य तितके पाणी हळूहळू प्या.

कोमट पाणी पिण्याचे फायदे

महाराजजींनी स्पष्ट केले की अशा प्रकारे पाणी पिल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण मऊ होते आणि ती बाहेर काढणे सोपे होते, पचन सुधारते. पाणी पिल्यानंतर थोडे चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हवे असल्यास, तुम्ही थोडा वेळ विश्रांती देखील घेऊ शकता. दररोज ही सोपी सवय राखल्याने बद्धकोष्ठता, वायू आणि जडपणासारख्या समस्या दूर होतात आणि साधकाला भक्ती साधनावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

हलके आणि सात्विक अन्न खा

महाराजजींनी स्पष्ट केले की अन्नाचा उद्देश केवळ पोट भरणे नाही तर शरीराला चैतन्य प्रदान करणे आहे, म्हणून कमी, हलके आणि सात्विक अन्न खाणे सर्वोत्तम मानले जाते. जड आणि समृद्ध अन्न पचनसंस्थेवर भार टाकते, बद्धकोष्ठता निर्माण करते आणि मनाला आळस आणि तमसाकडे घेऊन जाते.

उपवास आणि पातळ मूग डाळ

महाराजजींनी स्पष्ट केले की जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही दोन किंवा तीन दिवस हलके उपवास करू शकता, फळे खाऊ शकता किंवा फक्त पातळ मूग डाळ खाऊ शकता. यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीराला अंतर्गत संतुलन राखण्यास मदत होते. तसेच, जड, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ टाळा.

कोमट दुधात त्रिफळा पावडरसह 1 चमचा सायलियम हस्क मिसळून झोपण्यापूर्वी घेणे खूप फायदेशीर मानले जाते. सायलियम हस्कमधील विरघळणारे फायबर आतड्यांमध्ये पाणी शोषून घेते. ज्यामुळे मल मऊ आणि जड होतो, ज्यामुळे ते सहजपणे बाहेर पडते. त्रिफळा पावडर पचनसंस्थेला मजबूत करते, आतडे स्वच्छ करते आणि नियमित आतड्याची हालचाल राखते.

नियम पाळा

महाराजजींनी स्पष्ट केले की एक नियम नेहमी लक्षात ठेवावा की साधकाने आपले अर्धे पोट अन्नासाठी, एक चतुर्थांश पाणीासाठी आणि उरलेले चतुर्थांश हवेसाठी रिकामे ठेवावे, कारण हे संतुलन शरीरात ऊर्जा राखते आणि भक्तीची शक्ती विकसित करते.





Source link