Saturday, July 4, 2026
Home Blog Page 102

भोकरदन मध्ये काँग्रेसची ताकद वाढली. राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांचा काँग्रेस प्रवेश.

0
भोकरदन मध्ये काँग्रेसची ताकद वाढली. राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांचा काँग्रेस प्रवेश.

जालना : भोकरदन मध्ये निवडणुकीची रणधुमाळी उठली आहे. नगरपरिषदेच्या अनुषंगाने पार पडली जाणाऱ्या निवडणुकांच्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात असताना, लोकांमधून वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच गेली अनेक वर्ष काँग्रेसचे नेते आणि माजी भोकरदनचे माजी नगराध्यक्ष असलेले राजाभाऊ देशमुख यांच्या उपस्थित भोकरदन मधील प्रतिष्ठित व्यापारी जहीर शेठ कुरेशी यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने भोकरदन मधील काँग्रेसचे हात अजून बळकट झाल्याचे बोलले जात आहे.

जहीर शेठ कुरेशी यांच्या सोबतच उपाध्यक्ष इरफान सिद्दिकी, अजीम शेठ, एजास पठाण, रिजवान मामू, रईस पैलवान, नासेर शहा, तसेच अमेर शेख, अजमत कुरेशी, साजिद शेख, फेरोज कुरेशी, रहीम कुरेशी, आशलम शेख, शारूक शेख, हापीज कुरेशी, मुजीत कुरेशी, इरफान कुरेशी, समीर पैलवान सह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद अजून वाढल्याची चर्चा जनमानसात होताना दिसत आहे.

भोकरदन नरपरिषदेची ही निवडणूक ही भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे विरुद्ध राजाभाऊ देशमुख अशी मानली जाते.मात्र रोज काँग्रेस मध्ये होणारे जाहीर प्रवेश काँग्रेसला विजयाच्या दिशेने घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे.

एन. रघुरामन यांचा कॉलम: पॅकेजिंग पाहू नका, त्यात खोलवर जा

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  पॅकेजिंग पाहू नका, त्यात खोलवर जा


1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी किराणा सामान खरेदी करायला जाता तेव्हा काही लोक फक्त पॅकेजवर एक नजर टाकतात, तर हुशार लोक बास्केटमध्ये ठेवण्यापूर्वी हानिकारक घटक (जसे की सोडियम/मीठ) तपासतात. जर रंगीबेरंगी पॅकेजिंगवर आधारित वस्तू खरेदी करत असाल व आवडत्या स्नॅकमधील मिठाचे प्रमाण दुर्लक्षित करत असाल, तर कल्पना करा तुम्ही तुमच्या रक्तदाबाचे (बीपी) किती नुकसान केले आहे. म्हणून, सुंदर पॅकेजिंग पुरेसे नाही. साखर वा मिठाचे प्रमाण दुर्लक्षित करणे ही मोठी चूक असू शकते.

बाजारात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीबद्दल अशीच भावना येत आहे. प्रचार किती आहे? गेल्या आठवड्यात काही प्रमुख एआय कंपन्यांचे शेअर्स अचानक घसरले, जरी अलीकडेपर्यंत त्यांचे प्रभावी परिणाम होते. उदाहरणार्थ, एनव्हिडियाचे शेअर्स १० दिवसांत १०% घसरले, ज्यामुळे त्यांचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलरच्या खाली आले. मेटा शेअर्सदेखील १९% घसरले. एआय सॉफ्टवेअर कंपनी पालांटिरने गेल्या आठवड्यात ११% नुकसान सोसले.अहवालांनुसार, या विक्रीने प्रमुख टेक दिग्गजांच्या एकत्रित बाजार मूल्यातून १ ट्रिलियन डॉलर(१ लाख कोटी डॉलर) पेक्षा जास्त नुकसान झाले.

आता कंपन्या अचानक एआय महसुलावर कमी लक्ष केंद्रित करत आहेत आणि एआयमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणूक अजून वर्षानुवर्षे दूर आहे यावर अधिक भर देत आहेत. जनरेटिव्ह एआय सेवांसाठी मोठे डेटा सेंटर, अत्याधुनिक चिप्स आणि सर्व्हर रॅक आवश्यक आहेत, जे लवकर तयार करता येत नाहीत. एआय तेजीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी चिंता आहे. जनरेटिव्ह एआय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे आता मोठी क्षमता आणि महत्त्वपूर्ण जोखीम दोन्ही घेऊन येते, कारण हे क्षेत्र वेगाने वाढत आहे. परंतु अद्याप पूर्णपणे सिद्ध झालेले नाही.

जेपी मॉर्गनसारख्या जागतिक संस्था म्हणतात की बाजारपेठ दीर्घकालीन तेजीत असेल, परंतु अनेक कंपन्या सध्या नफा मिळवू शकत नाहीत. अलीकडील एमआयटी अभ्यासात असे आढळून आले आहे की ९५% जनरेटिव्ह एआय व्यवसाय प्रकल्प मोजता नफा देऊ शकले नाहीत. हे बहुतेकदा कारण ते एक तर खराबपणे अमलात आणले गेले होते किंवा त्यांच्या अवास्तव अपेक्षा होत्या. जर बाजारात पैसे कमी असतील तर त्यामुळे बाजार क्रॅश होऊ शकतो.

व्यवस्थापन टिप

नियम सोपा आहे. जर तुम्हाला व्यवसाय आणि त्याचे दीर्घकालीन फायदे आणि तोटे पूर्णपणे समजत नसतील, तर तुम्ही त्यात गुंतवणूक करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.



Source link

तुमच्याही त्वचेवर सतत खाज येते? सावधान, असू शकते किडनीच्या आजाराचे लक्षण

0
तुमच्याही त्वचेवर सतत खाज येते? सावधान, असू शकते किडनीच्या आजाराचे लक्षण


Early Signs of Kidney Disease : किडनी आपल्या शरिरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी शरिरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्धीकरणाचे काम करत असते. ज्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राहते. म्हणूनच किडनी निरोगी राहणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा काही आजारांचे परिणाम थेट दिसून येत नाहीत. पण स्किन अॅलर्जी, डोळ्यांचा रंग यांसारख्या लक्षणांवरून आपण आजारी आहोत किंवा कोणत्या आजाराला सामोरे जात आहोत हे ओळखता येते.

Add Zee News as a Preferred Source

 

 

किडनीची कार्यक्षमता कमी होणे : 

वयानुसार शरिरातील सर्व भागांचे कार्य मंदावते.पण सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नाही. अवेळी खाणे, योग्य प्रमाणात पाणी न पिणे, धु्म्रपान यासगळ्याचा परिणाम होऊन माणसाचा जीवनकाळ कमी होत चालला आहे. जड किंवा न पचणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने ते पचण्यास कठीण जातात. यामुळे किडनीला कमी वेळात जास्त काम करावे लागते आणि किडनी कमकुवत होण्याची शक्यता असते. याचा गंभीर परिणाम होऊन जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो. 

 

 

लक्षणांची ओळख : 

शरिरावर दिसणाऱ्या काही लक्षणांवरून तुम्हाला किडनीचा आजार आहे हे ओळखता येऊ शकते. साधारणतः थकवा येणे, चेहऱ्यावर किंवा पायांवर सूज येणे, भूक न लागणे आणि रात्री वारंवार लघवी होणे अशी लक्षणे दिसून येतात. किडनीच्या आजारावर वेळीस उपचार न केल्यास आजार पुढे वाढून उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे योग्यवेळी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. जेव्हा किडनी खराब होऊ लागते तेव्हा त्याचे परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर दिसू लागतात. 

 

 

स्किन अ‍ॅलर्जी : 

किडनी योग्य प्रकारे शरीरातील रक्त डिटॉक्स करू शकत नाही तेव्हा शारिरीक आरोग्याला हानी पोहोचवतील असे पदार्थ बाहेर टाकले जात नाहीत. ज्यामुळे हे पदार्थ रक्तात मिसळले जातात आणि चेहऱ्यावर डाग येणे, पुरळ यणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय त्वचेच्या रंगामध्येही फरक जाणवतो. त्वचा आणि डोळे पिवळसर होतात जे कावीळ होण्याचे लक्षण आहे. याव्यतिरिक्त एनीमिया या आजारामुळे देखील त्वचा पिवळी पडू लागते. शिवाय स्किन अॅलर्जीमुळे त्वचेवर खाज येते आणि लाल चट्टे किंवा जखमही होते. 

 

 

किडनी निरोगी राहण्यासाठी उपाय :

1. नियमित व्यायाम करा.
2. वजन नियंत्रणात ठेवा.
3. धूम्रपान टाळा.
4.  पुरेसे पाणी प्या.
5. आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.





Source link

फलटण नगराध्यक्ष निवडणुकीची सुरुवात; जाधव पहिले उमेदवार

0
फलटण नगराध्यक्ष निवडणुकीची सुरुवात; जाधव पहिले उमेदवार

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज सुरूवात झाली असून गटनेते अशोकराव जाधव यांनी सर्वप्रथम नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. शहराच्या प्रथम नागरिकपदासाठी अर्ज करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.

गेल्या वीस वर्षांपासून फलटणच्या राजकारणात सक्रिय असलेल्या जाधव यांनी नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि गटनेते म्हणून काम करताना पाणीपुरवठा, रस्ते विकास, ड्रेनेज सुधारणा, क्रीडा संकुल उभारणी आणि नागरिक सुविधा अशा अनेक विकासकामांवर भर दिला आहे.

सरळ, प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख मिळवलेल्या जाधव यांनी अर्ज दाखल करताना “फलटणच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू करू” असे सांगितले.

,

महायुतीचा सुसाट वारू vs राजेगटाचा गुलदस्त्यातील डाव — फलटण पालिका रणांगण तापले!

0
महायुतीचा सुसाट वारू vs राजेगटाचा गुलदस्त्यातील डाव — फलटण पालिका रणांगण तापले!

फलटण प्रतिनिधी :- फलटण पालिका निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली असून उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड घालमेल सुरू आहे. एका बाजूला महायुतीचा वारू सुसाट धावताना दिसत असताना महाविकास आघाडी मात्र ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

जुन्या राजेगटातील अनेक दिग्गजांनी राजेगटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे कूच केली आहे. नुकत्याच झालेल्या सभेत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीच “मी कोणत्या पक्षात आहे हे मला देखील कळत नाही,” असे वक्तव्य करून सगळ्यांना बुचकळ्यात टाकले. दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीचे झेंडे फलटण पालिकेवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला असून मुंबईत जाऊन अनेक राजकीय हालचाली केल्या आहेत.

राजकीय सखोल डावपेच रचत आमदार रामराजेंनी सत्ता सोडायची नाही या जिद्दीने ‘सोंगट्या’ फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या अंतिम निर्णयावर अजूनही पडदा असल्याने राजेगटाची भूमिका गुलदस्त्यातच आहे.

फलटण पालिकेवर तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ निर्विवाद सत्ता टिकवून ठेवणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजवर विरोधकांना दोन अंकी आकडा गाठू दिला नाही. मलटण भागात तर माजी खासदार रणजितसिंह यांना बाणगंगा ओलांडू न देणारी ही राजकीय कोंडीही चर्चेत आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या २७–० पराभवाची महायुतीकडून मानसिक तयारी केल्याचे दिसते.

या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) असे महायुतीचे घटक पक्ष एकत्र येत प्रबळ समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजेगटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना फोडून त्यांना राष्ट्रवादीत दाखल करून नगराध्यक्षपदाची कोडी सोडवण्याचा डाव रचल्याची चर्चा आहे.

राजेगट विरुद्ध रणजितसिंह गट असा मोठा राजकीय संघर्ष पेटला असून खासदार गट सध्या चर्चेत असला तरी त्यांचा नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नाहीये. दुसरीकडे आपल्या मुलाला नगराध्यक्षपदासाठी तयार करणाऱ्या रामराजेंना गोटातील मोठ्यांनीच साथ सोडल्याने त्यांच्या गणितात खळबळ उडाली आहे.

दोन्ही गटांकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर झाले नसतानाही ‘मीच नगराध्यक्ष व्हावे’ अशी मागणी स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर व स्व. सुभाषराव शिंदे गटाकडून होत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील मतदार संपर्काचा पहिला फेरा पूर्ण केला आहे. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह यांच्या राजकीय समीकरणात चांगलाच ताण आणला असून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते ‘धनुष्यबाण’ उचलतील अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, खासदारकीला पराभव झाल्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावून कोट्यवधींचा निधी आणला. “माझा पराभव करण्यासाठी रामराजेंनी अकलूजकरांना साथ दिल्याने मला केंद्रीय मंत्रिपद गमवावे लागले,” अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. त्याची परतफेड म्हणून त्यांनी आमदारकीत राजेगटाचा पराभव केला. आता पालिकेत २७–० असा परिणाम साधण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

रामराजे देखील शांत बसणारे नाहीत. “माझा पक्ष अपक्ष आहे, पण मेंदू अजूनही पूर्वीइतकाच चालतो,” अशा शब्दांत त्यांनी संकेत दिले आहेत. एकच ‘फासा’ त्यांच्या हाती आला तरी ते सत्ता परत काबीज करू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा असून दोन्ही दिग्गज फलटणच्या रणांगणात उतरले आहेत.

आर. जगन्नाथन यांचा कॉलम: जदयूपेक्षा जास्त जागा जिंकून‎ भाजपने चित्र बदलून टाकले‎

0
आर. जगन्नाथन यांचा कॉलम:  जदयूपेक्षा जास्त जागा जिंकून‎ भाजपने चित्र बदलून टाकले‎


  • Marathi News
  • Opinion
  • R. Jagannathan’s Column, BJP Changed The Picture By Winning More Seats Than JDU

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎‎‎बिहार निवडणुकीच्या निकालांमधून सर्व राजकीय‎पक्षांना एक धडा शिकता येईल तो म्हणजे मतदारांना‎जास्त नकारात्मकता आणि लोकप्रिय नेत्यांवरील हल्ले‎आवडत नाहीत. निवडणुकीदरम्यान सर्वाधिक बाेलणारे‎नेते राहुल गांधी होते. त्यांनी मत चोरीबद्दल गोंधळ‎उडवला. पंतप्रधानांवर वैयक्तिक हल्ले केले. ते बिहारी‎मतदारांना सांगत होते की त्यांच्या मतांनी मतदान न‎केलेल्या व्यक्तींनाच निवडून दिले आहे. राहुल गांधींनी‎भाकीत केल्याप्रमाणे २०२० च्या विधानसभा निवडणुका‎आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर‎फार कमी मतदारांचा विश्वास असल्याने त्यांना‎जाणवले की ते अतिरेकी प्रतिक्रिया देत आहेत.‎

दुसरा मुद्दा असा की यावेळी मतदानकर्त्यांनी दिशा ‎‎अचूकपणे वर्तवली. परंतु मतदारांच्या भावनांची खोली ‎‎समजण्यात त्यांना अपयश आले. सत्य हे आहे की‎एकदा मतदाराने निर्णय घेतला की ते निर्णायकपणे एका ‎‎दिशेने जातात. या प्रकरणात महिलांचे मत – यावेळी ‎‎पुरुषांपेक्षा जास्त होते – नितीश यांच्याकडे निर्णायकपणे ‎‎गेले. महिला मतदारांत पंतप्रधानांची प्रतिमा देखील ‎‎सकारात्मक असल्याने लढाई मूलतः जातीच्या‎पलीकडे जाऊन महिला मतदारांनी ठरवली. प्रश्न असा ‎‎आहे की मतदारांनी पुन्हा एकदा अशा मुख्यमंत्रीची‎निवड का केली. अनेक वेळा सेवा केली आहे?‎उत्तरासाठी मतदारांच्या प्रेरणांचा सखोल विचार करणे‎आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट त्यांच्या मनात आली‎असेल : राज्य विकासाच्या आघाडीवर काही निकाल‎दाखवू लागले आहे. तेव्हा केंद्र सरकारशी सतत‎लढणाऱ्या विरोधी आघाडीची निवड करून सर्व फायदे‎गमावण्याचा धोका का पत्करायचा? बिहारला केंद्र‎सरकार व राज्य दोघांनाही एकाच दिशेने प्राेत्साहन‎आवश्यकता आहे. आणखी दोन गोष्टी लक्षात‎घेण्यासारख्या आहेत. प्रथम २०२० मध्ये चिराग पासवान‎यांनी नितीश विरोधी मोहीम सुरू केली तेव्हा यावेळी‎सर्व एनडीएचे सहकारी एकत्र काम करत होते. हे‎अखिल भारतीय आघाडीच्या विरुद्ध होते. त्यात काँग्रेस‎आणि राजदमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून‎दीर्घकाळापासून मतभेद होते. दोन्ही मित्रपक्ष‎वेगवेगळ्या मुद्द्यांवर भर देत होते. त्याहूनही वाईट‎म्हणजे सीमांचलमध्ये एआयएमआयएमने मुस्लिम‎मतांचा मोठा वाटा चोरला. काँग्रेसने‎एआयएमआयएमपेक्षाही कमी जागा जिंकल्या हे‎स्वतःच सांगते. प्रशांत किशोर या निवडणुकीत एक‎नवीन चेहरा होता. निवडणुकीपूर्वी त्यांना बरीच प्रसिद्धी‎मिळाली. परंतु ते वाईटरित्या अपयशी ठरले. त्यांना‎एकही जागा जिंकता आली नाही आणि‎निवडणुकीपूर्वीचे त्यांचे सर्व धाडसी अंदाज खोटे ठरले.‎या निकालांवरून असे दिसून येते की माध्यमांचे लक्ष‎मदत करत नाही. निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर अनेक‎टीव्ही आणि यूट्यूब चॅनेलवर होते. ते त्यांच्या उदयाचा‎कोणावर परिणाम होईल आणि नितीशकुमार निवडणूक‎कशी हरू शकतात हे स्पष्ट करत होते. अगदी उलट‎घडले. त्यांना माध्यमांनी चिथावणी दिली आणि ते‎त्याच्या जाळ्यात अडकले. स्वतः निवडणूक न‎लढवण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या प्रतिमेला‎काही फायदा झाला नाही. पण बिहार निवडणुकीत‎भाजपला सर्वाधिक फायदा झाला आहे. आता‎दिल्लीतील त्यांच्या युतीला त्यात जदयू एक प्रमुख‎मित्रपक्ष आहे. आता धोका नाही. जदयूवर आघाडी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎मिळवून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की नितीश‎कुमारांनंतर बिहारमध्ये आता भाजपकडेच मुख्य‎राजकीय धुरा असेल. जेडीयूपेक्षा जास्त जागा‎जिंकूनही भाजप नितीश कुमार यांना अस्थिर करू‎इच्छित नाही. कारण त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांना‎बिहारमधील अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याची संधी‎मिळते. भाजप अद्याप कोणतेही पाऊल उचलू इच्छित‎नाही. परंतु ते २०२९ मध्ये काही प्रमुख मंत्रालये आणि‎लोकसभेच्या जागांचा मोठा वाटा मागू शकते. तेजस्वी‎यांच्यासाठी गंभीर धडे आहेत. नितीश कुमारांच्या‎त्सुनामीमध्ये त्यांनी केवळ आपल्या जागा गमावल्या‎नाहीत तर निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत‎राहुल गांधींशी एकनिष्ठ राहून त्यांनी स्पष्टपणे चूक‎केली. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाला‎बाजूला ठेवावे याबद्दल त्यांना अजूनही बरेच काही‎शिकायचे आहे.‎

(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

QuoteImage

आता दिल्लीतील भाजपच्या‎नेतृत्वाखालील युतीस काही धाेका नाही.‎त्यात जदयू हा एक प्रमुख मित्रपक्ष आहे.‎आता धोक्यात नाही. शिवाय जदयूवर‎आघाडी मिळवून भाजपने हे स्पष्ट केले‎की नितीश कुमार यांच्यानंतर बिहारमध्ये‎तेच मुख्य राजकीय शक्ती असतील.‎

QuoteImage



Source link

फलटणमध्ये राजकीय हालचालींना वेग : राहुल पवार (आरडी) यांचा राजे गटात प्रवेश

0
फलटणमध्ये राजकीय हालचालींना वेग : राहुल पवार (आरडी) यांचा राजे गटात प्रवेश

फलटण प्रतिनिधी :- फलटण नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचाली अधिक गतीमान झाल्या आहेत. अलीकडेच राजे गटातील काही कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केल्यानंतर तयार झालेल्या परिस्थितीवर बीबी (ता. फलटण) येथील कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संयमी परंतु अर्थपूर्ण भाष्य केले.

कार्यक्रमात ते म्हणाले,
“हाताची मूठ सेल सोडल्यानंतर रिकामी राहत नाही; ती पुन्हा भरते. तसेच तरुण कार्यकर्ते कधी तयार झाले, हे तुमच्या लक्षातही आले नाही.”
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना आणखी रंग चढला.

यानंतर सोमवार पेठ, फलटण येथील नामवंत युवा कार्यकर्ता पै. राहुल रमेश पवार (आरडी) यांनी श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे आणि श्री सह्याद्री कदम यांच्या उपस्थितीत राजे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे वडील रमेश पवार तसेच बंधू रोहन पवार व सूरज पवार यांनीही गटात प्रवेश जाहीर केला.

राहुल पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘आरडी मित्र समूह’ च्या माध्यमातून शहर व तालुक्यात मोठा युवा वर्ग सक्रिय आहे. त्यांच्या प्रवेशामुळे फलटण नगरपालिका निवडणूक तसेच फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजे गटाची ताकद वाढेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

एनडीएच्या वादळात झाकोळले ‘तेज’स्वी

0
एनडीएच्या वादळात झाकोळले ‘तेज’स्वी


ब्युरोरिपोर्ट, झी 24 तास, मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात तेजस्वी यादव यांच्याकडे आश्वासक आणि भविष्याचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. निवडणुकांच्या प्रचारात तेजस्वी यादव यांचा झंझावात पाहायला मिळाला. तरुणाईनंही तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी केली. तरुणाईचं हे वारं पाहून बिहारमध्ये सत्तांतर होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र बिहार निकालानंतर एनडीएच्या वादळात तेजस्वी यादव आणि त्यांच्या राजदला मोठा फटका बसला.

Add Zee News as a Preferred Source

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी तेजस्वी यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला मोठा धक्का दिलाय.. तब्बल 144 जागा लढवणा-या राजदला अपेक्षित यश मिळालं नाही. निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादवांकडून बिहारमध्ये सत्तांतराचा दावा करण्यात आला.. 

मात्र सुरुवाती कलांमध्ये जोरदार मुसंडी मारणा-या राजदची दुपार होता होता पार धूळदाण उडाली. या पराभवाची अनेक कारणं समोर येतायत… त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे राजदकडून सुमारे 36% उमेदवारी यादव जातीतून दिली गेली. बिहारचं राजकारण जातीय समीकरणांवर आधारित असलं तरी हा निर्णय मतदारांना ‘यादव राज’ परत येत असल्याचा संदेश देऊन गेला. 

राजदनं 144 पैकी तब्बल 52 ठिकाणी यादव उमेदवारांना रिंगणात उतरवलं. म्हणजेच 14 टक्के लोकसंख्या असलेले यादव हे राजदचे प्रमुख मतदार असले तरी इतर मागास, अति-मागास आणि सवर्ण मतदार या जातीय समीकरणामुळे महागठबंधनापासून दूर गेले. राजद म्हणजे यादवराज हा मुद्दा मतदारांच्या मनात ठसवण्यात भाजप यशस्वी ठरला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेजस्वी यादव रोजगार, महिलांसाठी योजना, पेन्शन, आणि दारूबंदीची समीक्षा अशा अनेक मोठ्या घोषणा केल्या. प्रत्येक घरात सरकारी नोकरी ही तेजस्वी यांची सर्वात मोठी घोषणा होती. मात्र याबाबत ते ब्लूप्रिंट देऊ शकले नाहीत.

या योजनांची अंमलबजावणी कशी होणार? पैसा कुठून येणार? याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नसल्यानं मतदारांमध्ये अविश्वास वाढला. तेजस्वी यादव यांनी लालूंची सामाजिक न्यायाची विचारधारा स्वीकारली. मात्र ‘जंगलराज’ छबी टाळण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पोस्टर्समध्ये लालूंच्या फोटोंना छोटं स्थान दिल्यामुळे लालूसमर्थक नाराज झाले. जागावाटपात तणाव, जाहीरनाम्यात स्वतःलाच प्राधान्य, मित्रपक्षांना दूर ठेवल्याचा फटका तेजस्वी यांना बसला. जाहीरनाम्याला तेजस्वी प्रण नाव दिल्यानं मित्रपक्ष नाराज झाले. काँग्रेसनं गॅरेंटीवर भर दिला तर तेजस्वी यांच्याकडून नोक-यांचे वायदे करण्यात आले.

महागठबंधनाच्या ‘मुस्लिम-अनुकूल’ प्रतिमेला भाजपनं अत्यंत प्रभावीपणे उचलून धरले. मुस्लिम बहुल जागांवर राजदला फायदा झाला असला तरी उर्वरित राज्यात त्याचा तोटाच जास्त झाला. वक्फ विधेयकाविषयी तेजस्वी यांच्या भूमिकेमुळेही अनेक सामाजिक घटक नाराज झाले. भाजपनं लालू यादवांच्या संसदेतल्या वक्फ विधेयकविरोधी भाषणाचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करून त्याचा पूर्ण फायदा घेतला. त्यामुळे प्रचारसभांमध्ये तेजस्वी यादव यांच्या तरुणाची गर्दी होऊनही त्याचं मतांमध्ये रुपांतर झालं नसल्याचं पाहायला मिळालं. परिणामी बिहारमध्ये सत्तास्थापनेचं तेजस्वी यादव यांचं स्वप्न अधुरंच राहिलं आहे.





Source link

राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा ‘सितारा’ करतो

0



सातारा: बिहार विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला असून भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. भाजपकडून महाराष्ट्रातही या विजयाचं सेलिब्रेशन सुरू असून आता राज्यातील नगरपालिका, महापालिका निवडणुकांची (Election) तयारी सुरु झाली आहे. एकीकडे या निवडणूक निकालाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit bichukale) यांनी सातारा (Satara) नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभा रेसमध्ये धावणारे साताऱ्याचे कवी मनाचे नेते बिग अभिजीत बिचुकले आता नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यासाठीच, सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज त्यांनी दाखल केला. 

नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून अर्ज भरण्याची मुदत अवघे काही दिवस उरली आहे. साताऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत बिचुकले यांनी नामनिर्देशन पत्र भरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. नगरपालिका ही माझी मातृ संस्था आहे, मी माझी सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांचा प्रचार करत होतो म्हणून काही लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करून मला कामावरून काढलं, एवढा मोठा अन्याय माझ्यावर झाला आहे. सातारा नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली बाहेर काढायची आहेत, साताऱ्यातील खड्डे आणि बागांची दुरावस्था मी बघत आहे. गेल्या 25 वर्षे नगरपालिकेत काम करत असताना आणि लोकसभा विधानसभा निवडणूक लढत असताना आपलं प्रेम मिळालं, असे बिचुकले यांनी म्हटलं. दरम्यान, माझ्या पदरात नगराध्यक्षपद टाका तुमच्या साताऱ्याचा सितारा करून टाकतो, असेही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं. 

उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचा उमेदवार कोण?  (Udayanraje bhosale satara)

दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या आघाडीच्यावतीने मुलाखती पार पडल्या आहेत. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या. यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन कायम असल्याचे सांगत कमळ चिन्हावर ही नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली, त्यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. दरम्यान, यावेळी खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याची मिश्कील टिप्पणी करत या प्रश्नाला बगलही दिली होती. मात्र, अद्यापही या आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरलेला नाही. 

हेही वाचा

Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

 

आणखी वाचा



Source link

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला रंग – उमेदवारांमध्ये आयाराम-गयारामची लगबग

0
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीला रंग – उमेदवारांमध्ये आयाराम-गयारामची लगबग

फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आली आहे. अजून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसला, तरी शहरात राजकीय हालचालींनी तापमान वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार गट बदलत असल्याने त्यांचं गणित बिघडले आहे. काही दिवसांपासून तयारीला लागलेले कार्यकर्ते आता संभ्रमात पडले आहेत.

रामराजेंचा गड, रणजितसिंहांचे आव्हान
गेल्या 30 वर्षांपासून फलटण नगरपरिषदेवर आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांची सत्ता आहे. पण यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांना टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. दोन्ही गटांकडून बैठका, सभा आणि प्रचाराचे सत्र सुरू आहे.

महायुतीत नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच
महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन मोठे नेते प्रयत्न करत असून, कोणाला उमेदवारी मिळणार याकडे फलटणकर जनतेचे लक्ष लागले आहे.

रामराजेंकडे उमेदवारांची मोठी रांग
रामराजे यांनी स्वतः इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या गटात उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी ठरवताना त्यांना अडचण येऊ शकते. काही सहकाऱ्यांनी विरोधी गटात प्रवेश केला असला तरी, राजेंकडे अजूनही प्रबळ उमेदवारांची मोठी फौज आहे.

अनिकेतराजे की नवखा उमेदवार?
राजे गटातून युवराज अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मात्र, शेवटच्या क्षणी श्रीमंत रामराजे नवख्या चेहऱ्याला संधी देतील, अशीही चर्चा आहे. सध्या ते बाहेरगावी असून ते फलटणमध्ये परतल्यावरच गटाची खरी निवडणूक रणनीती ठरणार आहे.

आयाराम-गयारामचा खेळ अजूनही सुरू
एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याचे सत्र अजूनही थांबलेले नाही. उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस येईपर्यंत या हालचाली सुरू राहतील असे दिसते. खरे चित्र शेवटच्या क्षणीच स्पष्ट होणार आहे.