
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी अनंतनाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करत सुमारे १७५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या चार दिवसांपासून अनंतनाग पोलीस, लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि इतर यंत्रणांची संयुक्त पथके जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात घेराव घालून शोध मोहीम राबवत आहेत. या कारवाईचा एक भाग म्हणून जिल्हाभरात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. कडक दक्षता घेऊन दिवसरात्र शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी कारवायांना मदत करणारे सपोर्ट नेटवर्क नष्ट करण्यासाठी आतापर्यंत सुमारे १७५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.