Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशOperation Sindoor : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी सर्व तयारी झाली होती, पण...नौदलाचा...

Operation Sindoor : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी सर्व तयारी झाली होती, पण…नौदलाचा खुलासा

Operation Sindoor : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी सर्व तयारी झाली होती, पण…नौदलाचा खुलासा

[ad_1]

Operation Sindoor Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप 26 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढाईत 6 – 7 मे रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अर्तंगत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं. ऑपरेशन सिंदूर अतर्गंत भारतीय सैनिकांनी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी 11 मे 2025 ला तिन्ही दलांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोहीमेबद्दल सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिलंय. भारताने फक्त नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या 30 ते 40 जवान आणि अधिकाऱ्यांना ठार केलं आहे, असं सांगण्यात आलं. त्यासोबत कराची बंदराबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे. (Operation Sindoor All preparations were made to attack Karachi port but the signal Navy disclosure dgno)

‘कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी सर्व तयारी…’

नौदलाचे महासंचालक नौदल ऑपरेशन्स (डीजीएनओ) व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘भारतीय नौदल 9 मे च्या रात्री पाकिस्तानच्या सागरी सीमेत प्रवेश करून त्यांचे लष्करी तळ आणि कराची बंदरासारखे प्रमुख तळ उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्णपणे तयार केली होती आणि नौदल फक्त सरकारच्या आदेशांची वाट पाहत आहे.’ व्हाइस अ‍ॅडमिरल प्रमोद म्हणाले की, भारतीय नौदलाकडे इतकी ताकद आहे की ते हे सर्व सहजपणे करू शकतं. त्याच वेळी, डीजीएनओ प्रमोद यांनी इशारा दिला की ‘जर पाकिस्तानने एकही चुकीचे पाऊल उचललं तर त्याला माहित आहे की आमची प्रतिक्रिया काय असेल?’

’96 तासांत अरबी समुद्रात अनेक शस्त्रे डागली’

पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले, ’22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यांनंतर, भारतीय नौदलाचे कॅरियर बॅटल ग्रुप, भूपृष्ठीय दल, पाणबुड्या आणि एव्हिएशन अॅसेट्स ताबडतोब पूर्ण लढाईच्या तयारीत समुद्रात तैनात करण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या 96 तासांच्या आत अरबी समुद्रात अनेक शस्त्रांचा वापर करून केलेल्या गोळीबारात आम्ही समुद्रात रणनीती आणि प्रक्रियांची चाचणी घेतली आणि त्यात सुधारणा केल्या.

भारतीय नौदलाचे तैनात

ते पुढे म्हणाले, ‘आमचे सैन्य उत्तर अरबी समुद्रात निर्णायक आणि प्रतिबंधात्मक स्थितीत तैनात आहे. आमच्या निवडलेल्या वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आहे. भारतीय नौदलाच्या तैनातीने पाकिस्तानी नौदल आणि हवाई दलांना बचावात्मक स्थितीत राहण्यास भाग पाडले. बहुतेक बंदरांच्या आत किंवा किनारपट्टीच्या अगदी जवळ, ज्यावर आम्ही सतत लक्ष ठेवत होतो. आमचा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून संतुलित, प्रमाणबद्ध, आक्रमक नसलेला आणि जबाबदार आहे. आम्ही म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानच्या कोणत्याही शत्रुत्वाच्या कृतीला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदल समुद्रात तैनात आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments