
‘७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेले अजित पवार, ईडीनं ज्यांच्यावर अनेक धाडी घातल्या ते प्रताप सरनाईक, ईडी ज्यांना अटक करायला निघाली होती ते भावना गवळी, हसन मुश्रीफ अशी किती नावं घ्यायची? मुद्दा नैतिकतेचाच असेल तर भाजपनं ज्यांच्यासोबत मिळून सरकार बनवलंय. मग तो शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल. हे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. मग नवाब मलिक यांच्यावरच हल्ले का,’ अशी विचारणा राऊत यांनी केली.







