
तसेच व्यापाऱ्यांची देखील गैरसोय झाली. नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे भागात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबीवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. छोटे दुकानदार, व्यावसायिक आणि कामगार वर्गाला या पावसाचा फटका बसला. या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.





