
तर, आज होणाऱ्या सभेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आज कितीही गैरसोय होऊ दे, जागा नाही मिळाली तरी आम्ही इथेच दटून उभे राहणार आहोत. हा आमच्या लढ्याचा एक सुवर्णक्षण आहे. सगळ्यांनीच याचे साक्षीदार व्हा. आज एकही मराठा घरी राहणार नाही. आता सरकारने भावना शून्य होऊ नये. ही वेदना जाणून १० दिवसांत आम्हाला आरक्षण द्यावं आणि आम्ही ते मिळवूनच राहणार.’ मनोज जरांगे-पाटील यांच्या आजच्या या सभेसाठी जालन्यात १५० एकरचे मैदान आणि ४०० एकरची पार्किंग राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, सकाळपर्यंतच ४०० एकरचं पार्किंग पूर्णपणे भरून गेलं आहे. अजूनही अनेक लोक या सभेच्या दिशेने रवाना होत आहेत.









