
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषणावर बसलेले मनोज जरांगे तब्बल १० दिवसांपासून उपोषणावर बसले आहे. त्यांनी काहीही खाल्ले नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीव्र गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान, ते ज्या ठिकाणी उपोषणाला बसले आहे, त्या ठिकाणी आरोग्य पथक दाखल झाले असून त्यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांच्या किडणीवर परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांचा रक्तदाब देखील कमी झाला आहे. त्यांची प्रकृती खलावत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.






