Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशInteresting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना 'या'...

Interesting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना ‘या’ गोष्टी ठाऊकच नाहीत?

Interesting GK Quix : भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता? अनेक भारतीयांना ‘या’ गोष्टी ठाऊकच नाहीत?

[ad_1]

General Knowledge Marathi : तुम्हाला कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करायची असेल, तर तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर अधिक चांगली पकड असणे महत्त्वाचे आहे. देशातील सरकारी नोकऱ्यांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षांना बसतात.

या परीक्षांसाठी उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय परीक्षा उत्तीर्ण होणे जवळपास अशक्य आहे. आजकाल प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न नक्कीच विचारले जातात. आज आम्ही तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये विचारले जाणारे अनेक प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तयारीदरम्यान तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. एवढंच नव्हे तर एक भारतीय म्हणून भारताशी संबंधीत काही गोष्टी माहिती असणे तितकेच गरजेचे आहे. 

प्रश्न उत्तराच्या रुपात हे जाणून घेणार आहोत 

प्रश्न – भारत सर्वाधिक कच्चे तेल कोणत्या देशाकडून खरेदी करतो?

उत्तरः भारत रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करतो.

प्रश्न – शरीराचा कोणता भाग जन्मानंतर येतो आणि मृत्यूपूर्वी जातो?

उत्तर – आपल्या शरीरात दात हा एकमेव अवयव आहे जो आपल्या जन्मानंतर येतो आणि बहुतेकदा म्हातारपणात तुटतो.

प्रश्न – राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस मे महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो.

प्रश्न – भारतातील लुप्तप्राय प्रजाती कोणत्या?

उत्तर : आशियाई सिंह, संगाई हिरण, नीलगिरी तहर, गोदावन, लायन टेल्ड मकाक

प्रश्न: गीर राष्ट्रीय जंगल कोठे आहे?

उत्तर – गीर राष्ट्रीय वन गुजरातमध्ये आहे.

प्रश्न – व्हिक्टोरिया मेमोरियल भारतातील कोणत्या शहरात आहे?

उत्तर – व्हिक्टोरिया मेमोरियल भारतातील सर्वात जुने शहर कोलकाता येथे आहे.

प्रश्न- गंगा ही राष्ट्रीय नदी केव्हा घोषित करण्यात आली?

उत्तर- गंगा 2008 मध्ये राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आली.

प्रश्न – भारतातील सर्वात जुना जिल्हा कोणता आहे?

उत्तर – पूर्णिया जिल्हा हा भारतातील सर्वात जुन्या जिल्ह्यांपैकी एक आहे आणि तो 1770 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने अस्तित्वात आला.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments