
India Alliance Meeting in Mumbai : उद्यापासून मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार झाली. यामध्ये आघाडीतील नेत्यांनी मोदी व भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत रक्षा बंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल, असा चिमटा त्यांनी काढला.




