
हरयाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळत भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राकेश टिकैत म्हणाले की, आता देश आणखी खड्ड्यांमध्ये जाईल. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, अशी आशा व्यक्त केली होती. टिकैत यांनी उघडपणे काँग्रेससाठी मते मागितली नसली तरी ते काँग्रेसला पाठिंबा देत होते. त्यामुळेच हरयाणात भाजपने बहुमत मिळवताच राकेश टिकैत संतापले आहेत.