
फलटण प्रतिनिधी : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संग्राम अहिवळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दि. ३१ रोजी नागरिकांसाठी मोफत ४ लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल होत असतात. ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळावा, या उद्देशाने ही वाहनसेवा सुरू करण्यात आली आहे.
या मोफत वाहनसेवेचा लाभ युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घेत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत संग्राम अहिवळे यांनी राबवलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.








