
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिदीर्तील लक्षणीय ठरलेली घटना म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून आग्र्याहून केलेली सुटका. अमोल कोल्हेंच्या शिवप्रताप गरुडझेप सिनेमातून ही ऐतिहासिक घटना पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार येत्या ९ एप्रिलला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चर वाहिनीवरुन अनुभवायला मिळणार आहे. वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाटेला जात नाहीत, पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय रहात नाहीत. सिनेमातला हा संवाद अंगावर रोमांचं आणल्याशिवाय रहात नाही. उर अभिमानाने भरुन येईल असे अनेक संवाद या सिनेमाचं बलस्थान आहे.








