
‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. आज तर अरुंधतीच्या निष्काळजीपणामुळे मनूला शाळेतून घरी घेऊन जाण्यास कुणीही नव्हते. ते पाहून आशुतोष चिडतो.








