
[ad_1]
देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात अरुंधतीची हळद पार पडणार असून, यावेळी सगळेच जल्लोष करताना दिसणार आहे. विद्या ताई, आप्पा, यश, अनघा, गौरी, विशाखा सगळेच अरुंधतीच्या हळदीमध्ये सामील होणार आहेत. मात्र, या आनंदाच्या सोहळ्यात कांचन देशमुख सहभागी होणार नाहीये. कांचन देशमुख ही अरुंधती माजी सासू अर्थात अनिरुद्धची आई आहे. घटस्फोटानंतरही अरुंधतीने देशमुखांच्या घरातच राहावे आणि इथल्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्यात अशी कांचनची इच्छा होती. मात्र, आता अरुंधती या घरातून दुसऱ्या घरी लग्न करून जाणार, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या आहेत.
[ad_2]
Source link
