
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी यांनी हृदयस्पर्शी आणि अश्रूपूर्ण निरोप दिला आहे. नरवाल यांचे पार्थिव दिल्लीत आणले असता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या पार्थिवाला चिकटून त्यांची पत्नी रडली. या दरम्यान ती म्हणत राहिली, “मी कसं जगणार? सात दिवसांपूर्वी १६ एप्रिल रोजी दोघांचा विवाह झाला होता. त्याच्या हाताची मेंहदी अजून कोरडीही झाली नव्हती, इतक्यात त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.