मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं

0
2


Udayanraje Bhosale on Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सैन्यात कोणीच मुस्लीम नव्हते, असा दावा भाजप नेते तथा राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले. यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू-मुस्लीम भेदभाव केला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तर मल्हार सर्टिफिकेटवरही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. 

उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही, असे त्यांनी म्हटले. तर नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.  

मी नॉनव्हेज खात नाही, ज्यांना खायचंय त्यांनी…

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certificate) देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस (Meat) खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. याबाबत उदयनराजे भोसले म्हणाले की, मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंची उडी 

दरम्यान, कराड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे. मी या कारखान्याचा सभासद नसलो तरी या कारखान्यात सत्तेचं केंद्रीकरण झालं असल्याचा आरोप माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता खा. उदयनराजे यांनी केलं आहे. कारखान्यात सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे होती मात्र ती मिळाली नाही. कारखान्याच्या सभासदांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं खासदार उदयनराजे यांनी सांगितला आहे. 

आणखी वाचा 

मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या

अधिक पाहा..



Source link