फलटण – महान योद्धा मल्हारराव होळकर यांच्या अद्वितीय कार्यावर आधारित “मल्हार युग” या पुस्तकाचे लेखन फलटणच्या डॉ. आम्रपाली कोकरे यांनी केले आहे. या ग्रंथात मल्हाररावांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांचे उत्कृष्ट शब्दांकन करण्यात आले आहे.
या पुस्तकाबाबत अनूप शहा यांनी विशेष कौतुक व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, “हे पुस्तक प्रत्येक घरात असले पाहिजे, जेणेकरून समाजात मल्हाररावांसारख्या धैर्यवान योद्ध्यांची प्रेरणा निर्माण होईल.”
पुस्तक लेखनासाठी डॉ. आम्रपाली कोकरे यांनी अत्यंत मेहनत घेतली असून, संकटांचा सामना करत इतिहासातील हा स्वाभिमानी योद्धा नव्या पिढीसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. अनूप शहा यांनी पुस्तक स्वीकारताना सांगितले की, “मल्हाररावांच्या पराक्रमाची ओळख करून देणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाला राष्ट्रभक्ती आणि परिश्रमाची प्रेरणा मिळेल.”