
मोदी-शहा यांनी शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत, उलट ते अत्यंत क्रूरपणे राबविले. परिणामी राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप शेतकरी नेते, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केला आहे. जीएसटी कायद्याने शेतकऱ्यांची लूट केली. आयातीच्या धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हिंदू-मुस्लिम जातीयवाद असे द्वेषाचे वातावरण निर्माण केल्यामुळे पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात आले असल्याचे हबीब म्हणाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कुणाला मत द्यायचे हे ठरवण्यापेक्षा कुणाला पाडायचे हेच माझ्या हातात आहे. म्हणून मी कोणाला मत द्यायचे नाही, एवढेच ठरवू शकतो, असं हबीब म्हणाले.




