
बॉलिवूडमध्ये १९८० साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. महाभारत बनवणारे बीआर चोप्रा यांच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन बीआर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. त्या वेळच्या बड्या स्टार्सना या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं, लोकांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे रेल्वेचं मोठं नुकसानही झालं होतं.