
जानकी-हृषिकेशला बसला धक्का!
त्यावर सुमित्रा आई पटकन म्हणते की, ‘तिने चुकून घेतलं असेल पार्वतीचे नाव. तिला कुठे माहिती आहे की, पार्वती कोण आहे?’ सुमित्राआईच्या तोंडून हे ऐकताच आता जानकीला मोठा धक्का बसला आहे. या पार्वती बाईबद्दल सुमित्रा आईला देखील माहित आहे, हे आता जानकी आणि हृषिकेश या दोघांनाही कळणार आहे. इतके दिवस नाना सुमित्रा आईना फसवून दुसऱ्याच एका बाईबरोबर संसार करत आहेत, असं जानकी आणि हृषिकेश यांना वाटत होतं. मात्र, आता त्यांची ही शंका फोल ठरली आहे. पार्वतीचं सत्य नाना हृषिकेश आणि जानकी यांना सांगणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये कळणार आहे.