
इंद्राने मिहिकाच्या लगावली कानशिलात
मिहिका मुद्दाम हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते. तिचे लग्न झालेले पाहून मिहिरला धक्का बसतो. त्याला विश्वासच बसत नाही. शेवटी मिहिकासाठी आणलेले गिफ्ट हे लग्नाचा आहेर म्हणून देऊन टाकतो. त्यानंतर इंद्रा समोर येते आणि मिहिकाच्या कानशिलात लगावते. ती मिहिकाला जाब विचारते, ‘तुला असे वाटत असेल की तुला असे का केलं विचारणारं कोणी नाही. पण मी आहे. तू मुक्ताची बहिण आहेस म्हणून मी लग्नाला तयार झाले होते. पण तू माझ्या मुलाशी चुकीचं वागलीस. तू सावनीसारखी निघालीस’ असे म्हणते.