
कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याशिवाय अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल, जेणेकरून हंगामी बदलांचा परिणाम न होता पिके घेता येतील. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पिकांच्या ३२ जाती tसोडण्यात येणार आहेत. एक कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीची योजना आणणार. कडधान्ये, तेलबिया आणि मत्स्यशेतीच्या बाबतीत देशाला स्वावलंबी कसे करता येईल यावर आता आमचे लक्ष असेल, असे ते म्हणाले. ग्रामीण स्तरावरही रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे सीतारमन म्हणाल्या.








