
सरकारने मराठवाडा वैधानिक महामंडळाला मंजूर केलेला २० हजार कोटींचा निधी अजून दिलेला नाही, समृद्धी, शक्ती महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, अनेक माता-भगिनीचे सरकारी पेन्शनचे पैसे वेळवर जमा होत नाहीत, आणि आता ही लाडकी बहीण योजना आणली आहे. मी योजनेवर टीका करत नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांना दाखले काढायला अडचण येत आहे. सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेतो म्हणाले पण आज ११ महिने झाले तरी गुन्हे मागे घेतलेले नाही.