
घटनेबद्दल अंकित म्हणतो, “कोळी बांधवांबद्दल मला आदर आहेच, परंतु आज त्यांच्यातील माणुसकी, आत्मीयता पाहून हा आदर अधिकच वाढला आहे. मला दुखापत झाल्यानंतर हे सगळे ज्या पद्धतीने माझ्या मदतीला आले, हे पाहून मी खूपच भारावलो. या सगळ्या गोंधळात आमची चर्चा अर्धीच राहिली आणि यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणूनच उपचारानंतर मी या माझ्या बांधवाना भेटायला परत आलो. या निमित्ताने यांच्याप्रती असलेली कृतज्ञता मला व्यक्त करता आली. जशी आपुलकी त्यांनी या क्षणी माझ्याबद्दल दाखवली तसेच प्रेम ‘बाबू’वरही करा.”