
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. विरोधी पक्षाने जे पत्र दिले, ते खोटे बोल पण रेटून बोल, असे आहे. त्यांनी आरशात आपला चेहरा पहावा. विदर्भातील एकही प्रकल्पाला ज्यांनी मान्यता दिली नाही, ते आरोप करतात. आम्ही तर सर्व मान्यता आणि निधी दिला. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले, ते आम्हाला विचारतात? मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी स्थगिती दिली, ते आम्हाला विचारतात?