राज ठाकरेंनी ट्विट केले आहे की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात.पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, केक, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. आपली भेट हिच माझ्यासाठी भेट आहे ! सकाळी ८:०० ते १२:०० ह्या वेळेतच मी उपस्थित असेन.







