
आदित्य ठाकरे यांनी केंद्रात एनडीए सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की,नव्यानेच’एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना आहे.सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच.







