
महाविकास आघाडीपेक्षा आम्हाला मतं जास्त
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाचं त्यांनी विभागवार विश्लेषण केलं. महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी भाजप आणि महायुतीला मिळालेली मतं खूपच जास्त आहेत. मुंबईतही भाजपला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मतं मिळाली आहेत, तर आम्हाला २६ लाख मतं मिळाली आहेत, असं ते म्हणाले. राज्यात आमच्या अनेक जागा अगदी थोड्या फरकानं पडल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला या निकालाचा मानसिक फायदा नक्की होईल, पण तळागाळात आमचा पक्ष अजूनही मजबूत आहे. आम्ही आमच्या त्रुटी दूर करून पुन्हा एकदा लोकांपुढं जाऊ, असं फडणवीस म्हणाले.






