
दरम्यान, कॉंग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक्झिट पोलमधून निवडणूक निकालाबाबतचे वास्तव चित्र प्रतिबिंबीत होत नाही, असं सिंघवी यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे. यापूर्वी अनेक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींचे एक्झिट पोल हे चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलमध्ये दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला जेवढ्या ५-६ जागा दाखवण्यात येत आहे, ते पटण्यासारखे नाही. तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजप जास्तीत जास्त एक जागा जिंकेल, असं मला वाटतं. कर्नाटकात भाजप जास्तीत जास्त ८-९ जागा जिंकेल असं खुद्द भाजपचे नेते खाजगीत सांगत आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस फक्त एखाद सीट जिंकू शकेल, असं एक्झिट पोल दाखवत आहेत, जे पटण्यासारखे नाही. या तीन राज्यांमध्ये कॉंग्रेस २५ टक्के जागा जिंकेल असं मला वाटतं, असं सिंघवी म्हणाले. एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला दाखवलेला आकडा फुगवलेला वाटतो. सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएचा आकडा फुगवून सांगण्यात येत असल्याचं सिंघवी म्हणाले.







