
बालेंद्र पाल आणि अमन वर्मा अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचे प्रवचन ऐकले होते. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला.
लखनौ : मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, असं स्टेट्स (Status on WhatsApp) ठेवत दोन मित्रांनी आत्महत्या केली. या दोन मित्रांनी आत्महत्या करण्यापूर्वी ओशो यांचे प्रवचन ऐकल्याची माहिती दिली जात आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन येथे घडली.
बालेंद्र पाल आणि अमन वर्मा अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांनीही आयुष्य संपवण्याआधी ओशोंचे प्रवचन ऐकले होते. त्यानंतर दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर या दोघांचा मृत्यू झाला. बालेंद्रचा मृत्यू जागीच झाला. तर अमनची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्याने त्याच्या घरातील लोकांना फोन केला होता आणि विषारी पदार्थ खाल्ल्याची माहिती दिली.









