
Yavatmal Accident यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. दिवसभराचे काम संपवून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. एका भरधाव वेगात असलेल्या एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही कार आर्णि येथील तहसीलदारांची असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. अपघातानंतर वाहनचालक मदत न करता घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.





