
सुभेदार कुटुंब आनंदाने डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असताना, आता त्यांच्या घरात चैतन्याची एन्ट्री होणार आहे. घरात आलेला चैतन्य सुभेदार कुटुंबाशी प्रेमाने बोलताना दिसणार आहे. यावेळी तो बोलणार आहे की,‘केवळ अर्जुनच नाही तर, तुम्ही पूर्ण कुटुंब माझ्या आयुष्याच्या एक महत्त्वाचा भाग आहात. तुमच्याशिवाय मी आयुष्यातला कुठलाच प्रवास सुरू करू शकत नाही. मात्र, आता मी माझ्या आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू करण्याचा निश्चय केला आहे आणि त्या दिशेने मी माझं पहिलं पाऊल टाकत आहे. तो तुमच्या आशीर्वादाशिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणून या प्रवासात तुम्ही मला साथ द्याल, अशी माझी अपेक्षा आहे. मी आणि साक्षी आता लवकरच साखरपुडा करणार असून, यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे’.








